शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
3
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
4
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
5
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
6
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
7
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
8
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
9
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
10
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
11
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
12
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
13
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
14
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
15
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
16
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
17
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
18
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
19
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील धान कापणीचे शेतकरी नावच घेईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:20 IST

पावसाने दगा दिल्याने उद्ध्वस्त झालेला शेतातील धान कापणीची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. मजुरी अंगावर बसण्याच्या भीतीने शेतकरी कापणीचे नावच घेत नाही. जिल्हाभरात शेकडो हेक्टरवर धान कापणीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने मध्यम दुष्काळ घोषित करताना भंडारा जिल्ह्यात दुजाभाव केल्याने यंदा शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : मजुरी अंगावर बसण्याची भीती

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पावसाने दगा दिल्याने उद्ध्वस्त झालेला शेतातील धान कापणीची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. मजुरी अंगावर बसण्याच्या भीतीने शेतकरी कापणीचे नावच घेत नाही. जिल्हाभरात शेकडो हेक्टरवर धान कापणीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने मध्यम दुष्काळ घोषित करताना भंडारा जिल्ह्यात दुजाभाव केल्याने यंदा शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहे.भंडारा जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पावसाअभावी धान शेती नेस्तनाबूत होत आहे. मात्र दरवर्षी त्याच उमेदीने शेतकरी शेतात रोवणी करतात. यंदाही सुरुवातीला शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रोवणी केली. मध्यंतरी समाधानकारक पाऊसही झाला. पंरतु आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली ती कायमची. वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे धानपिक शेतातच वाळून गेले. ९० टक्के सिंचनाचा दावा करणाऱ्या प्रशासनाने प्रकल्पाचे पाणी योग्यवेळी धानासाठी सोडले नाही. परिणामी जिल्ह्याभरातील शेकडो हेक्टरवरील धान शेतातच वाळला. शेतात जावून बघीतल्यास धानाच्या लोंब्या भरल्या नसल्याचे दिसून येते. हाती काहीच पीक येणार नाही, मजूरी अंगावर बसेल अशी शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळे साकोली तालुक्यासह जिल्ह्याभरातील शेतात धानाचे पीक उभे आहे. निम्न प्रतीचा धान काढण्याची ही वेळ आहे. परंतु बहुतांश शेतकरी पिकाची अवस्था पाहून धान काढण्याच्या मानसिकतेत दिसत नाही.आधीच कर्जाचा डोंगर त्यात मजूरीचेही पैसे अंगावर कशाला बसून घ्यायचे असा सवाल थेट शेतकरी करीत आहे. धान कापूनही घरी काय तणस न्यायचे काय? असे शेतकरी म्हणत आहे. एकंदरीत यंदा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे गडद सावट आहे. मात्र शासनाने मध्यम दुष्काळ घोषीत करताना केवळ तीन तालुक्यांचा समावेश केला. त्यामुळे शेतकऱ्यात रोष व्यक्त होत आहे. शासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.मध्यम दुष्काळाच्या घोषणेत दुजाभावशासनाने राज्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित केला. त्यात भंडारा जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्याचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान साकोली तालुक्यात असताना शासनाने केवळ पावसाच्या आकडेवारीवरुन तीनच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. खरे तर संपूर्ण जिल्हाच दुष्काळाच्या यादीत अपेक्षीत आहे. मात्र अद्यापपर्यंत शासनाने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही.सिंचन प्रकल्प ठरले पांढरा हत्ती ?जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरले आहे. साकोली तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद प्रकल्पाचे काम सुरु आहे. यावर्षी या प्रकल्पाचे पाणी सावरबंध, कुंभली, खंडाळा, शिवनीबांध या तलावात सोडण्यात आले. मात्र तेही समाधानकारक नाही. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतर प्रकल्पाची असून हे प्रकल्प शेतकऱ्यासाठी पांढरा हत्ती ठरले.