शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: May 9, 2016 00:36 IST

गारपिटीमुळे कांद्याची वाढ झाली नाही. भाव मिळत नसल्याने पिकाला लागलेला खर्चही निघाला नाही.

कवडीमोल दर : अवकाळी पावसाचा फटका, कर्जाचा बोजा, शासनाने हमी भाव देण्याची गरजपवनी : गारपिटीमुळे कांद्याची वाढ झाली नाही. भाव मिळत नसल्याने पिकाला लागलेला खर्चही निघाला नाही. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात असून बँका, सावकार यांचे कर्ज, कृषी केंद्राची उधारी देणे कठीण झाले आहे. लग्न सोहळे व अन्य प्रसंगही स्थगित ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे यावर्षी कांद्याने गृहिणींच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्याच डोळ्यांत पाणी आणल्याचे चित्र आहे.तालुक्यातील गावांत पूर्वीपासून पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते. यामुळे या परिसरात कांद्याचे विक्रमी पीक घेण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागत होती. कांद्याचे उत्पादन होवो अथवा न होवो काही शेतकरी पूर्वीपासून कांद्याचे पीक वर्षानुवर्षे घेत आहेत. दोन-तीन वर्षापूर्वी शेतकरी या परिसरात एकरी १०० ते ११० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेत होते. तेवढ्या पिकावर शेतकऱ्यांचा कांदा पिकाला लागलेला खर्च निघून नफा मिळत होता. यामुळे शेतकरी समाधानी होता; पण मागील वर्षापासून शेतकऱ्याला लागलेला खर्च निघत नसून तोटा येत आहे.नैसर्गिक आपत्ती, वाढते रासायनिक खताचे दर, वाढती मजुरी, कांदा बियाचे वाढलेले दर व कांदा पिकाला कवडीमोल मिळणारा भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्याची स्थिती आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड करण्यासाठी १६०० ते १८०० रुपये पायली या भावाने कांद्याचे बियाणे विकत घेतले. सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात वाफे तयार करून रोपे तयार केली. कांदे रोपाची लागवड करण्याकरिता शेताची मशागत करून शेणखत फेकणे, एकरी तीन-तीन पोते पोटॅश व सुपर फॉस्पेटची रासायनिक खते फेकणे, डिसेंबर ते जानेवारी महिन्यात रोपांची वाफ्यात पाणी सोडून महिला मजुरांकडून त्याचे रोपण केले जातात. यानंतर खते व मशागतीचा मोठा खटाटोप करूनही शिल्लक उरत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी उत्पादित नवीन कांद्याला चार रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे नुकसान सोसावे लागत असल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)