शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: June 17, 2016 00:41 IST

पवनी तालुक्यात या वर्षाला शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून रब्बी पिकामध्ये कांद्याला योग्य पसंती देवून सर्वात जास्त गोसे प्रकल्पालगत असलेल्या

उत्पादन खर्च जास्त, हमी भाव कमी : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथाप्रकाश हातेल चिचाळ पवनी तालुक्यात या वर्षाला शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून रब्बी पिकामध्ये कांद्याला योग्य पसंती देवून सर्वात जास्त गोसे प्रकल्पालगत असलेल्या चिचाळ परिसरात ७०० ते ८०० एकर जागेमध्ये कृषी मार्गदर्शकांच्या माध्यमातून कांदा पिकाची लागवड करण्यात आली.आता कांदे खोदणीला सुरुवात करायची एवढ्यात निसर्ग कोपला. बळीराजावर शेवटचा झटका देवून पिकाचे अतोनात नुकसान केले. काही शेतकऱ्यांनी कसेबसे कांदे खोदून बाजारपेठेत आणले असता कांद्याचा भाव कवडीमोल म्हणजे ४ ते ५ रुपये भावाने कांदा व्यापाऱ्यांना द्यावे लागले.जेव्हा शेतकऱ्यांचा माल विकायचा असेल तेव्हा मात्र शासन मुग गिळून गप्प राहाते. म्हणजे शेतकऱ्याला निसर्गाचीही भिती आणि व्यापाऱ्याचीही भिती. शेतकऱ्यांनी करावे तरी काय? निसर्गाच्या कचाट््यात अनेक कांदा उत्पादक शेतकरी सापडला गेला. चिचाळ परिसरात फार मोठे कांद्याचे नुकसान झाले. चिचाळ, पाथरी, आकोट, वासेळा, गोसे गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या घराचे छत उडाले, कवेलू फुटले. संबंधीत अधिकाऱ्याला सुचना दिल्यानंतर अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमदार यांनी चिचाळला भेट देवून पंचनामे केले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घराला भेट देवून पंचनामा केले. परंतु दोन महिने उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला नाही. कांदा उत्पादन शेतकऱ्याला खर्च जास्त उत्पादन कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या गडद छायेत फसला गेला. या जगाच्या पोशिंदयाला कर्जाच्या बेळीतून काढणार कोण? शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार? यांच्या शेतमालाला योग्य भाव केव्हा मिळणार? असे अनेक प्रश्न बुध्दीजीवी करीत आहेत. पवनी तालुक्यात कोणत्याही प्रकारची मोठी कंपनी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले, गाव सोडून शहराकडे जात असतात. शेती व्यवसाय नेहमीच तोट्याचे असल्याने शेतीकडे नविन पिढीचा कल बदल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. कांद्याचा भाव कमी असल्याने मजुर, गाडीभाडा, यामध्येच शेतकऱ्यांचे पैसे खर्च होत असतात. शेवटी तेलही गेले, तुपही गेले आणि हाती धुपाटणे राहिले अशी परिस्थिती तालूक्यातील बळीराजाची झाली आहे. बळीराजाला जिवंत ठेवायचे असेल तर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील विविध समस्या शासन दरबारी लावून धराव्यात, पवनी तालुक्यात एम आय डी.सी प्रोजेक्ट कारखानदारी, छोटे मोठे शेतीला पुरक उद्योग धंदे आणावे लागतील. तरच तालुक्यातील शेतकरी राजा सुखावेल. तालुक्यातील गारपिटग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.