शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: June 17, 2016 00:41 IST

पवनी तालुक्यात या वर्षाला शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून रब्बी पिकामध्ये कांद्याला योग्य पसंती देवून सर्वात जास्त गोसे प्रकल्पालगत असलेल्या

उत्पादन खर्च जास्त, हमी भाव कमी : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथाप्रकाश हातेल चिचाळ पवनी तालुक्यात या वर्षाला शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून रब्बी पिकामध्ये कांद्याला योग्य पसंती देवून सर्वात जास्त गोसे प्रकल्पालगत असलेल्या चिचाळ परिसरात ७०० ते ८०० एकर जागेमध्ये कृषी मार्गदर्शकांच्या माध्यमातून कांदा पिकाची लागवड करण्यात आली.आता कांदे खोदणीला सुरुवात करायची एवढ्यात निसर्ग कोपला. बळीराजावर शेवटचा झटका देवून पिकाचे अतोनात नुकसान केले. काही शेतकऱ्यांनी कसेबसे कांदे खोदून बाजारपेठेत आणले असता कांद्याचा भाव कवडीमोल म्हणजे ४ ते ५ रुपये भावाने कांदा व्यापाऱ्यांना द्यावे लागले.जेव्हा शेतकऱ्यांचा माल विकायचा असेल तेव्हा मात्र शासन मुग गिळून गप्प राहाते. म्हणजे शेतकऱ्याला निसर्गाचीही भिती आणि व्यापाऱ्याचीही भिती. शेतकऱ्यांनी करावे तरी काय? निसर्गाच्या कचाट््यात अनेक कांदा उत्पादक शेतकरी सापडला गेला. चिचाळ परिसरात फार मोठे कांद्याचे नुकसान झाले. चिचाळ, पाथरी, आकोट, वासेळा, गोसे गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या घराचे छत उडाले, कवेलू फुटले. संबंधीत अधिकाऱ्याला सुचना दिल्यानंतर अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमदार यांनी चिचाळला भेट देवून पंचनामे केले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घराला भेट देवून पंचनामा केले. परंतु दोन महिने उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला नाही. कांदा उत्पादन शेतकऱ्याला खर्च जास्त उत्पादन कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या गडद छायेत फसला गेला. या जगाच्या पोशिंदयाला कर्जाच्या बेळीतून काढणार कोण? शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार? यांच्या शेतमालाला योग्य भाव केव्हा मिळणार? असे अनेक प्रश्न बुध्दीजीवी करीत आहेत. पवनी तालुक्यात कोणत्याही प्रकारची मोठी कंपनी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले, गाव सोडून शहराकडे जात असतात. शेती व्यवसाय नेहमीच तोट्याचे असल्याने शेतीकडे नविन पिढीचा कल बदल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. कांद्याचा भाव कमी असल्याने मजुर, गाडीभाडा, यामध्येच शेतकऱ्यांचे पैसे खर्च होत असतात. शेवटी तेलही गेले, तुपही गेले आणि हाती धुपाटणे राहिले अशी परिस्थिती तालूक्यातील बळीराजाची झाली आहे. बळीराजाला जिवंत ठेवायचे असेल तर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील विविध समस्या शासन दरबारी लावून धराव्यात, पवनी तालुक्यात एम आय डी.सी प्रोजेक्ट कारखानदारी, छोटे मोठे शेतीला पुरक उद्योग धंदे आणावे लागतील. तरच तालुक्यातील शेतकरी राजा सुखावेल. तालुक्यातील गारपिटग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.