शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: June 17, 2016 00:41 IST

पवनी तालुक्यात या वर्षाला शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून रब्बी पिकामध्ये कांद्याला योग्य पसंती देवून सर्वात जास्त गोसे प्रकल्पालगत असलेल्या

उत्पादन खर्च जास्त, हमी भाव कमी : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथाप्रकाश हातेल चिचाळ पवनी तालुक्यात या वर्षाला शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून रब्बी पिकामध्ये कांद्याला योग्य पसंती देवून सर्वात जास्त गोसे प्रकल्पालगत असलेल्या चिचाळ परिसरात ७०० ते ८०० एकर जागेमध्ये कृषी मार्गदर्शकांच्या माध्यमातून कांदा पिकाची लागवड करण्यात आली.आता कांदे खोदणीला सुरुवात करायची एवढ्यात निसर्ग कोपला. बळीराजावर शेवटचा झटका देवून पिकाचे अतोनात नुकसान केले. काही शेतकऱ्यांनी कसेबसे कांदे खोदून बाजारपेठेत आणले असता कांद्याचा भाव कवडीमोल म्हणजे ४ ते ५ रुपये भावाने कांदा व्यापाऱ्यांना द्यावे लागले.जेव्हा शेतकऱ्यांचा माल विकायचा असेल तेव्हा मात्र शासन मुग गिळून गप्प राहाते. म्हणजे शेतकऱ्याला निसर्गाचीही भिती आणि व्यापाऱ्याचीही भिती. शेतकऱ्यांनी करावे तरी काय? निसर्गाच्या कचाट््यात अनेक कांदा उत्पादक शेतकरी सापडला गेला. चिचाळ परिसरात फार मोठे कांद्याचे नुकसान झाले. चिचाळ, पाथरी, आकोट, वासेळा, गोसे गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या घराचे छत उडाले, कवेलू फुटले. संबंधीत अधिकाऱ्याला सुचना दिल्यानंतर अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमदार यांनी चिचाळला भेट देवून पंचनामे केले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घराला भेट देवून पंचनामा केले. परंतु दोन महिने उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला नाही. कांदा उत्पादन शेतकऱ्याला खर्च जास्त उत्पादन कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या गडद छायेत फसला गेला. या जगाच्या पोशिंदयाला कर्जाच्या बेळीतून काढणार कोण? शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार? यांच्या शेतमालाला योग्य भाव केव्हा मिळणार? असे अनेक प्रश्न बुध्दीजीवी करीत आहेत. पवनी तालुक्यात कोणत्याही प्रकारची मोठी कंपनी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले, गाव सोडून शहराकडे जात असतात. शेती व्यवसाय नेहमीच तोट्याचे असल्याने शेतीकडे नविन पिढीचा कल बदल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. कांद्याचा भाव कमी असल्याने मजुर, गाडीभाडा, यामध्येच शेतकऱ्यांचे पैसे खर्च होत असतात. शेवटी तेलही गेले, तुपही गेले आणि हाती धुपाटणे राहिले अशी परिस्थिती तालूक्यातील बळीराजाची झाली आहे. बळीराजाला जिवंत ठेवायचे असेल तर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील विविध समस्या शासन दरबारी लावून धराव्यात, पवनी तालुक्यात एम आय डी.सी प्रोजेक्ट कारखानदारी, छोटे मोठे शेतीला पुरक उद्योग धंदे आणावे लागतील. तरच तालुक्यातील शेतकरी राजा सुखावेल. तालुक्यातील गारपिटग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.