शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाअभावी शेतकऱ्यांची दैनावस्था

By admin | Updated: December 21, 2015 00:33 IST

स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांचे स्वप्न आजही अपूर्ण असून सिंचनाअभावी वर्षानुवर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत जीवन जगत आले.

हरितक्रांतीचे स्वप्न कधी होणार पूर्ण ? : शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुचसंजय साठवणे साकोलीस्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांचे स्वप्न आजही अपूर्ण असून सिंचनाअभावी वर्षानुवर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत जीवन जगत आले. ओल्या दुष्काळापापेक्षा आजवर कोरड्या दुष्काळाचेच शेतकऱ्यांची दैनावस्था केली आहे. शासनाचे दिशाहीन नियोजन राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, व्होटबमकची राजनीती, प्रकल्पनिर्मितीतील दिरंगाई, भ्रष्टाचार निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी लाचारीचे जीवन जगत आहे. शेतकरी आत्महत्या यातूनच जन्माला आले. हा एक भाग असून नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आले. कालच लवारी येथील एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीपाची व रब्बीची पेरणी खोळंबते. वेळेवर पाणी उपलब्ध नसल्याने पेरणी रोवणी व इतर मशागतीची कामे वेळेवर होत नाही. कामे खोळंबतात व इतर नियोजनही बिघडते. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. तुटपुंज्या पाण्यामुळे पिकांची उत्पादकता गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होतो. अल्प उत्पादनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. हजारो हेक्टर शेतजमीन ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ओलीताची सोय नसल्याने बऱ्याचदा एका पाण्यासाठी शेतकऱ्याला हातचा पिकाला मुकावे लागते. पाऊस पडतो खरा, पण सक्षम यंत्रणेअभावी तो येतो तसा जातो. पाणी अडविण्याचे व साठविण्याचे साधन अपुरे आहेत.शासन शेतकऱ्यासाठी सिंचनाविषयी विविध योजना राबवितो. सिंचनासाठी विहिरी बंधारे, धरणे यावर कोट्यवधीचा खर्च होतो. पण प्रत्यक्षात त्याचा लाभ खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यापर्यंत पोहचताना दिसत नाही. पीक घेताना शेतकरी आपआपल्या पद्धतीने सर्वोतोपरी प्रयत्न करतो. पाणी, खते, बि बियाणे रोगराई किडींचा प्रादुर्भाव मनुष्यबळ पैसा या व इतर बाबी शेती करताना महत्वाच्या ठरतात. मात्र पाणी वगळता इतर बाबीची पूर्णता करताना शेतकरी तिळमात्रही मागे हटत नाही. रक्ताचे पाणी करून अहोरात्र मेहनत करून पोटच्या गोळ्याप्रमाणे पिकाची काळजी घेतो. मात्र शेवटी पावसासाठी हतबल होतो. त्यामुळे शेतकऱ्याला पूर्णत: निसर्गावरच अवलंबून राहावे लागते.शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनवायचे असेल तर सिंचन सुविधा निर्माण करणे, वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मोठमोठे तलाव, मालगुजारी तलाव, खासगी तलाव, बोळ्यांचे खोलीकरण करणे, साठवण क्षमता वाढविणे, जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणणे अत्यंत महत्वाचे आहे.पूर्वीच्या काळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करणारे तलाव आज दहा एकराला सिंचनाची सोय करू शकत नाही ही परिस्थिती आहे.तालुक्यातील प्रकल्पांची अवस्था साकोली तालुक्यात मागील २० वर्षापासून निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र या २० वर्षात या प्रकल्पाचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत पूर्ण होण्यासाठी किती वर्ष लागतील हे शासनालाच ठाऊक. हा प्रकल्प पूर्ण झाल्यस तालुक्यातील २३ गावातील शेतीचा सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो तर भीमलकसा प्रकल्पासारख्या कामाला अजूनही सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे साकोली तालुक्यात सध्यातरी सिंचनाची सोय नाही आहे. ती अवलंबून आहे जिल्हातील फक्त तलावाच्या भरवशावर व निसर्गावर.