शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांनो, तुमच्या वीजपंपाचे तोडलेले कनेक्शन जोडले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

जिल्ह्यात कृषिपंपासाठी १६ तास भारनियमन व केवळ ८ तास वीजपुरवठा केला जात आहे. परंतु हा ८ तासातील वीजपुरवठाही याेग्यप्रकारे व नियमित हाेत नाही. महावितरणच्या वेळापत्रकानुसार अनेकदा रात्री वीज दिली जाते. परंतु हिस्त्र प्राण्यांच्या भीतीत शेतकरी रात्री केव्हा पिकाला पाणी देणार हा प्रश्न आहे. यासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ज्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची देयके थकीत हाेती, अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला हाेता. ऐन उन्हाळी पीक शेतात डाेलत असतानाच महावितरणने पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांसमाेर पिकाला पाणी देण्याचे माेठे संकट उभे ठाकले हाेते. परंतु १५ जानेवारी राेजी विधानसभेत शेतकऱ्यांच्या वीज कपातीवर माेठा गदाराेळ आला. अखेर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांचे पीक निघेपर्यंत वीज पूर्ववत केली जाईल, अशी घाेषणा दिली. या घाेषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा तर मिळाला, परंतु किती शेतकऱ्यांची वीज पूर्ववत झाली? ज्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्यात आली त्यांना शेतकऱ्यांना खराेखरच वीज कनेक्शन जाेडून देण्यात आले काय? जर कनेक्शन जाेडून देण्यात आले नाही तर केव्हा जाेडून देण्यात आले नाही तर केव्हा जाेडणार असा सवाल आहे.

दिवसाही वीज ठेवा

जिल्ह्यात कृषिपंपासाठी १६ तास भारनियमन व केवळ ८ तास वीजपुरवठा केला जात आहे. परंतु हा ८ तासातील वीजपुरवठाही याेग्यप्रकारे व नियमित हाेत नाही. महावितरणच्या वेळापत्रकानुसार अनेकदा रात्री वीज दिली जाते. परंतु हिस्त्र प्राण्यांच्या भीतीत शेतकरी रात्री केव्हा पिकाला पाणी देणार हा प्रश्न आहे. यासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

आदेश पोहोचेपर्यंत आणखी किती जणांची वीज कापणार? 

कृषिपंपाची वीज जाेडणी पूर्ववत करुन देण्याबाबत ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत मंगळवारी घाेषणा केली. परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी अद्याप याची अंमलबजावणी झाली नाही. आम्हाला वरिष्ठांकडून तसे निर्देश आले नसल्याचे स्थानिक कर्मचारी सांगतात.  त्यामुळे आदेश पाेहाेचेपर्यंत आणखी किती जणांची वीज कापणार, हा प्रश्न आहे.

काय आहेत मंत्र्यांचे आदेशकृषिपंपाची देयके थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज पुन्हा तीन महिन्यांपर्यंत कापली जाणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांची वीज कापली आहे. त्या शेतकऱ्यांची जाेडणी तीन महिन्यांसाठी केली जाईल, अशी घाेषणा ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत दिली.

शेतकऱ्यांना दिलासा

शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे सत्ताधारी नेहमीच सांगतात. परंतु त्यादृष्टीने याेजना तसेच हितकारक नियमाची अंमलबजावणी केली जात नाही. माझ्याकडे दाेन कृषिपंपाचे कनेक्शन आहे. रब्बी हंगामात लाईनमनने माझ्या कृषिपंपाची वीज खंडित केली. तेव्हापासून मला पिके घेण्यास अडचणी आल्या. उसनवार घेऊन मी दाेन्ही ठिकाणची थकीत देयके भरली.- एक शेतकरी

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती