शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

शेतकऱ्यांनो, तुमच्या वीजपंपाचे तोडलेले कनेक्शन जोडले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

जिल्ह्यात कृषिपंपासाठी १६ तास भारनियमन व केवळ ८ तास वीजपुरवठा केला जात आहे. परंतु हा ८ तासातील वीजपुरवठाही याेग्यप्रकारे व नियमित हाेत नाही. महावितरणच्या वेळापत्रकानुसार अनेकदा रात्री वीज दिली जाते. परंतु हिस्त्र प्राण्यांच्या भीतीत शेतकरी रात्री केव्हा पिकाला पाणी देणार हा प्रश्न आहे. यासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ज्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची देयके थकीत हाेती, अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला हाेता. ऐन उन्हाळी पीक शेतात डाेलत असतानाच महावितरणने पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांसमाेर पिकाला पाणी देण्याचे माेठे संकट उभे ठाकले हाेते. परंतु १५ जानेवारी राेजी विधानसभेत शेतकऱ्यांच्या वीज कपातीवर माेठा गदाराेळ आला. अखेर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांचे पीक निघेपर्यंत वीज पूर्ववत केली जाईल, अशी घाेषणा दिली. या घाेषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा तर मिळाला, परंतु किती शेतकऱ्यांची वीज पूर्ववत झाली? ज्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्यात आली त्यांना शेतकऱ्यांना खराेखरच वीज कनेक्शन जाेडून देण्यात आले काय? जर कनेक्शन जाेडून देण्यात आले नाही तर केव्हा जाेडून देण्यात आले नाही तर केव्हा जाेडणार असा सवाल आहे.

दिवसाही वीज ठेवा

जिल्ह्यात कृषिपंपासाठी १६ तास भारनियमन व केवळ ८ तास वीजपुरवठा केला जात आहे. परंतु हा ८ तासातील वीजपुरवठाही याेग्यप्रकारे व नियमित हाेत नाही. महावितरणच्या वेळापत्रकानुसार अनेकदा रात्री वीज दिली जाते. परंतु हिस्त्र प्राण्यांच्या भीतीत शेतकरी रात्री केव्हा पिकाला पाणी देणार हा प्रश्न आहे. यासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

आदेश पोहोचेपर्यंत आणखी किती जणांची वीज कापणार? 

कृषिपंपाची वीज जाेडणी पूर्ववत करुन देण्याबाबत ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत मंगळवारी घाेषणा केली. परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी अद्याप याची अंमलबजावणी झाली नाही. आम्हाला वरिष्ठांकडून तसे निर्देश आले नसल्याचे स्थानिक कर्मचारी सांगतात.  त्यामुळे आदेश पाेहाेचेपर्यंत आणखी किती जणांची वीज कापणार, हा प्रश्न आहे.

काय आहेत मंत्र्यांचे आदेशकृषिपंपाची देयके थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज पुन्हा तीन महिन्यांपर्यंत कापली जाणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांची वीज कापली आहे. त्या शेतकऱ्यांची जाेडणी तीन महिन्यांसाठी केली जाईल, अशी घाेषणा ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत दिली.

शेतकऱ्यांना दिलासा

शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे सत्ताधारी नेहमीच सांगतात. परंतु त्यादृष्टीने याेजना तसेच हितकारक नियमाची अंमलबजावणी केली जात नाही. माझ्याकडे दाेन कृषिपंपाचे कनेक्शन आहे. रब्बी हंगामात लाईनमनने माझ्या कृषिपंपाची वीज खंडित केली. तेव्हापासून मला पिके घेण्यास अडचणी आल्या. उसनवार घेऊन मी दाेन्ही ठिकाणची थकीत देयके भरली.- एक शेतकरी

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती