शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज परतफेडीचे भूत शेतकऱ्यांच्या ‘मानगुटीवर’

By admin | Updated: March 23, 2016 00:41 IST

वित्तीय वर्षाचा हिशेब चोख करण्याचा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. वर्षभरातील आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद करणे...

मार्च एंडिंगचा शेतकऱ्यांना धसका : बँकांचा कर्ज वसुलीचा तगादा, निसर्गाच्या चक्रव्यूव्हात अडकला पोशिंदागिरीधर चारमोडे भंडारावित्तीय वर्षाचा हिशेब चोख करण्याचा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. वर्षभरातील आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद करणे या दिवसी होतो. शेतकऱ्यांसोबतच, नोकरदारवर्ग सुद्धा धावपळ करतात. परंतु या महिन्यात सर्वाधिक धास्ती भरते ती शेतकरी व शेतमजूर वर्गात. कर्जाचा निपटारा करण्यासाठी बँक, पतसंस्था बचत गट, सावकार कर्ज वसुलीचा तगादा लावतात. त्यामुळे तूर्त शेतकरीवर्गाने धसका घेतल्याचे दिसून येत आहे.जगाचा पोशिंदा अशी बिरूदावली असली तरी शेतकरी हा समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक आहे. वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करून रक्ताचे पाणी करून बँका व इतर ठिकाणाहून कर्ज काढून जमीन कसतो. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा, रोगराई, गारपीट यामुळे शेतकरी कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहे.शेतमालाला योग्य भाव न मिळणे, व्यापारी, दलाल यांच्याकडून होणारी लूट, फसवणूक, शेती विरोधी धोरण, पीक विम्याचा खेळखंडोबा यामुळे तर शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. खरीपाचे पीक हे प्रमुख पीक असते व त्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची वर्षभराची लेनदेन चालते. परंतु सालाबादाप्रमाणे याहीवर्षी तुटपुंज्या पावसामुळे व शेवटच्या क्षणी रोगराईमुळे अपेक्षेपेक्षाही फारच कमी उत्पादन झाले. शेतकरी, हितचिंतक व इतरही शासनाकडे मदतीसाठी ओरडतच राहिले. पण नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेतकरी लालफितशाही व उदासीन शासनपद्धतीमुळे, शासकीय मदतीपासून वंचितच राहिला. यामध्ये भर पडली ती सहकारी बँकेच्या पत्राने. जिल्हा मध्यवर्ती बँकेने गावागावात, सार्वजनिकस्थळी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीचे एक प्रकारे आवाहन करून तगादाच लावला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील एकही गाव ५० पैसेपेक्षा कमी आणेवारीचा नाही. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी कर्जाची वसुली जमा करणे आवश्यक झाले आहे. या पत्रामुळे दुष्काळ जाहीर करण्याचे उरली सुरली आशा सुद्धा आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड केल्याशिवाय पर्यायच नाही. अन्यथा पुढील वर्षीचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.खरीपाबरोबरच रब्बीने सुद्धा दगा दिला. अवकाळी पाऊस, गारपीट याने होती नव्हती शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली आहे. कर्जाचा भरणा करायचा कसा हा तर प्रश्न आहेच. परंतु थकीत झाल्यास त्यावरील व्याज व पुढील हंगामासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून हाही प्रश्न तेवढाच शेतकऱ्यांना भेडसावत आहे.३१ मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करण्यासाठी, शेतकरी सधन नातेवाईकांकडे हात पसरत आहेत. परंतु आल्या पावलीच वापस यावे लागते. कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकरी विविध, कधी नव्हे असे आकडेमोड करीत आहेत. परंतु काही एक शक्य होताना दिसत नाही. येणारे लग्नसराईचा खर्च, घरदुरुस्तीचा खर्च, आरोग्याचा, शिक्षणाचा खर्च कुठून करायचा हे सगळे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत असून कर्जपरतफेडीचा भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला, एवढे मात्र निश्चित आहे.