शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

कर्ज परतफेडीचे भूत शेतकऱ्यांच्या ‘मानगुटीवर’

By admin | Updated: March 23, 2016 00:41 IST

वित्तीय वर्षाचा हिशेब चोख करण्याचा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. वर्षभरातील आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद करणे...

मार्च एंडिंगचा शेतकऱ्यांना धसका : बँकांचा कर्ज वसुलीचा तगादा, निसर्गाच्या चक्रव्यूव्हात अडकला पोशिंदागिरीधर चारमोडे भंडारावित्तीय वर्षाचा हिशेब चोख करण्याचा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. वर्षभरातील आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद करणे या दिवसी होतो. शेतकऱ्यांसोबतच, नोकरदारवर्ग सुद्धा धावपळ करतात. परंतु या महिन्यात सर्वाधिक धास्ती भरते ती शेतकरी व शेतमजूर वर्गात. कर्जाचा निपटारा करण्यासाठी बँक, पतसंस्था बचत गट, सावकार कर्ज वसुलीचा तगादा लावतात. त्यामुळे तूर्त शेतकरीवर्गाने धसका घेतल्याचे दिसून येत आहे.जगाचा पोशिंदा अशी बिरूदावली असली तरी शेतकरी हा समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक आहे. वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करून रक्ताचे पाणी करून बँका व इतर ठिकाणाहून कर्ज काढून जमीन कसतो. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा, रोगराई, गारपीट यामुळे शेतकरी कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहे.शेतमालाला योग्य भाव न मिळणे, व्यापारी, दलाल यांच्याकडून होणारी लूट, फसवणूक, शेती विरोधी धोरण, पीक विम्याचा खेळखंडोबा यामुळे तर शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. खरीपाचे पीक हे प्रमुख पीक असते व त्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची वर्षभराची लेनदेन चालते. परंतु सालाबादाप्रमाणे याहीवर्षी तुटपुंज्या पावसामुळे व शेवटच्या क्षणी रोगराईमुळे अपेक्षेपेक्षाही फारच कमी उत्पादन झाले. शेतकरी, हितचिंतक व इतरही शासनाकडे मदतीसाठी ओरडतच राहिले. पण नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेतकरी लालफितशाही व उदासीन शासनपद्धतीमुळे, शासकीय मदतीपासून वंचितच राहिला. यामध्ये भर पडली ती सहकारी बँकेच्या पत्राने. जिल्हा मध्यवर्ती बँकेने गावागावात, सार्वजनिकस्थळी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीचे एक प्रकारे आवाहन करून तगादाच लावला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील एकही गाव ५० पैसेपेक्षा कमी आणेवारीचा नाही. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी कर्जाची वसुली जमा करणे आवश्यक झाले आहे. या पत्रामुळे दुष्काळ जाहीर करण्याचे उरली सुरली आशा सुद्धा आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड केल्याशिवाय पर्यायच नाही. अन्यथा पुढील वर्षीचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.खरीपाबरोबरच रब्बीने सुद्धा दगा दिला. अवकाळी पाऊस, गारपीट याने होती नव्हती शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली आहे. कर्जाचा भरणा करायचा कसा हा तर प्रश्न आहेच. परंतु थकीत झाल्यास त्यावरील व्याज व पुढील हंगामासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून हाही प्रश्न तेवढाच शेतकऱ्यांना भेडसावत आहे.३१ मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करण्यासाठी, शेतकरी सधन नातेवाईकांकडे हात पसरत आहेत. परंतु आल्या पावलीच वापस यावे लागते. कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकरी विविध, कधी नव्हे असे आकडेमोड करीत आहेत. परंतु काही एक शक्य होताना दिसत नाही. येणारे लग्नसराईचा खर्च, घरदुरुस्तीचा खर्च, आरोग्याचा, शिक्षणाचा खर्च कुठून करायचा हे सगळे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत असून कर्जपरतफेडीचा भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला, एवढे मात्र निश्चित आहे.