शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

शेतकऱ्यांना फसविले धानाच्या वाणाने

By admin | Updated: November 17, 2014 22:47 IST

शेतकऱ्यांच्या साधेपणाचा लाभ घेत धान बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना फसविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एका धानपिकाचे वाण १५०-१६० दिवसांचे असून खरेदी करतेवेळी केवळ

पालांदूर(चौ.) : शेतकऱ्यांच्या साधेपणाचा लाभ घेत धान बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना फसविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एका धानपिकाचे वाण १५०-१६० दिवसांचे असून खरेदी करतेवेळी केवळ १२०-१२५ दिवसाचे असल्याचे सांगितले. यामुळे पालांदूर परिसरातील नापिकी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.शेतकरी बियाणे कृषी केंद्रातून खरेदी करतो. खरेदी करतेवेळी कंपनी जसे सांगेल तसे कृषिकेंद्रमालक शेतकऱ्यांना सांगतो. शेतकरी विश्वास ठेवून मागेल ती किंमत देवून बियाणे खरेदी करतो. मात्र हे बियाणे कधी भेसळ तर कधी हलके, भारी लागून शेतकऱ्यांची ‘वाट’ लावतात. अशाच प्रकार खैरी-कवडसी येथील गोपाल मेश्राम या शेतकऱ्यासोबत घडला. सहा एकरात हलके धान म्हणून एका वाणाचे धान लावले. मात्र झाले उलटेच. धान १५०-१६० दिवसाचे लागल्याने संपूर्ण शेतातील धान पाण्याविना सुकले. शेतकऱ्याकडे पक्के खरेदी बिल असून पंचनामासुद्धा केला असून कंपनीच्या विरोधात कृषिविभागाकडे न्याय मागितला आहे. उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांना विचारणा केली असता शेतकऱ्यांनी संगठीतपणे निर्धाराने कंपनीच्या विरोध ग्राहकमंचात न्याय मागता येऊ शकते, असे सांगितले. शेतकऱ्यांनी कंपनीशी संपर्क केला असता केवळ बियाणाची मूळ रक्कम म्हणजे ५ किलोचे ३५० रूपये परत करण्याची तयारी दर्शविली. (वार्ताहर)