शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषिपंपात शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

करडी येथील दोन शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात वीज जोडणीसाठी महावितरणकडे डिमांड भरले होते. मात्र महावितरणकडून शेतकऱ्यांना विजेची जोडणी देण्यात आली नाही. उलट सौर पंपाचे कनेक्शन देवून फसवणूक करण्यात आली आहे. ऐन रबी हंगामात सौरपंप गत दोन महिन्यांपासून बंद पडल्याने सौरपंप दुरुस्तीसाठी कंत्राटदाराकडून टाळाटाळ होत आहे.

ठळक मुद्देरबी हंगाम संकटात : दोन महिन्यांपासून शेतकरी त्रस्त, कंत्राटदाराकडून टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी-पालोरा : शासनाकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महावितरणतर्फे सौर कृषीपंपाची योजना राबविण्यात येते. मात्र करडी येथे दोन वर्षांपासून सौर कृषीपंपासह वीज जोडणीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.करडी येथील दोन शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात वीज जोडणीसाठी महावितरणकडे डिमांड भरले होते. मात्र महावितरणकडून शेतकऱ्यांना विजेची जोडणी देण्यात आली नाही. उलट सौर पंपाचे कनेक्शन देवून फसवणूक करण्यात आली आहे. ऐन रबी हंगामात सौरपंप गत दोन महिन्यांपासून बंद पडल्याने सौरपंप दुरुस्तीसाठी कंत्राटदाराकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे करडी पालोरा परिसरातील असंख्य शेतकरी महावितरण कार्यालयाच्या कामकाजाने त्रस्त झाले आहेत.दोन वर्षांपासून महावितरणकडे डिमांड भरुनही शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी ही पिके शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. डिमांड भरतांना महावितरणकडून जोडणी देण्याचे आश्वासन मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसणवार करुन रबी हंगामातील विविध पिकांची पेरणी केली होती. मात्र ऐन हंगामात पिकांना पाणी मिळेनासे झाल्याने पिके वाळू लागली आहेत.महावितरण कार्यालय कंत्राटदाराकडे बोट दाखवित आहेत. मात्र ज्या एजन्सीकडे कृषी पंपाचा ठेका दिला होता. तो ठेकेदार शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही. त्यामुळे कंत्राटदार आणि महावितरणच्या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.सदर प्रकाराविषयी करडी येथील विद्युत अभियंत्याना शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, तुम्ही कंत्राटदारांना सांगा, ते दुरुस्ती करुन देतील अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास विद्युत कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पालोरा येथील सरपंच महादेव बुरडे यांनी दिला आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत.करडी परिसरातील शेतकऱ्यांना त्रास कमी व्हावा म्हणून शेतकऱ्यांचे डिमांड आपण उपविभागीय अभियंता कार्यालय मोहाडी येथे पोच केले. सौरपंप बंद पडल्यास शेतकऱ्यांना आॅनलाईन तक्रारीची सुविधा आहे.- संजय भुते, कनिष्ठ अभियंता शाखा करडीआपणाकडे एकही ग्राहकांनी सौर पंप बंद असल्याचे कळविलेले नाही. परंतु लोकांच्या तक्रारीवरुन सौरपंपाशी संबंधित वरिष्ठांशी बोलून पुढील निर्णय घेण्यात येईल.- सुनील माहुर्ले, उपविभागीय विद्युत अभियंता, मोहाडी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती