शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

सौर कृषिपंपात शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

करडी येथील दोन शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात वीज जोडणीसाठी महावितरणकडे डिमांड भरले होते. मात्र महावितरणकडून शेतकऱ्यांना विजेची जोडणी देण्यात आली नाही. उलट सौर पंपाचे कनेक्शन देवून फसवणूक करण्यात आली आहे. ऐन रबी हंगामात सौरपंप गत दोन महिन्यांपासून बंद पडल्याने सौरपंप दुरुस्तीसाठी कंत्राटदाराकडून टाळाटाळ होत आहे.

ठळक मुद्देरबी हंगाम संकटात : दोन महिन्यांपासून शेतकरी त्रस्त, कंत्राटदाराकडून टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी-पालोरा : शासनाकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महावितरणतर्फे सौर कृषीपंपाची योजना राबविण्यात येते. मात्र करडी येथे दोन वर्षांपासून सौर कृषीपंपासह वीज जोडणीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.करडी येथील दोन शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात वीज जोडणीसाठी महावितरणकडे डिमांड भरले होते. मात्र महावितरणकडून शेतकऱ्यांना विजेची जोडणी देण्यात आली नाही. उलट सौर पंपाचे कनेक्शन देवून फसवणूक करण्यात आली आहे. ऐन रबी हंगामात सौरपंप गत दोन महिन्यांपासून बंद पडल्याने सौरपंप दुरुस्तीसाठी कंत्राटदाराकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे करडी पालोरा परिसरातील असंख्य शेतकरी महावितरण कार्यालयाच्या कामकाजाने त्रस्त झाले आहेत.दोन वर्षांपासून महावितरणकडे डिमांड भरुनही शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी ही पिके शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. डिमांड भरतांना महावितरणकडून जोडणी देण्याचे आश्वासन मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसणवार करुन रबी हंगामातील विविध पिकांची पेरणी केली होती. मात्र ऐन हंगामात पिकांना पाणी मिळेनासे झाल्याने पिके वाळू लागली आहेत.महावितरण कार्यालय कंत्राटदाराकडे बोट दाखवित आहेत. मात्र ज्या एजन्सीकडे कृषी पंपाचा ठेका दिला होता. तो ठेकेदार शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही. त्यामुळे कंत्राटदार आणि महावितरणच्या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.सदर प्रकाराविषयी करडी येथील विद्युत अभियंत्याना शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, तुम्ही कंत्राटदारांना सांगा, ते दुरुस्ती करुन देतील अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास विद्युत कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पालोरा येथील सरपंच महादेव बुरडे यांनी दिला आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत.करडी परिसरातील शेतकऱ्यांना त्रास कमी व्हावा म्हणून शेतकऱ्यांचे डिमांड आपण उपविभागीय अभियंता कार्यालय मोहाडी येथे पोच केले. सौरपंप बंद पडल्यास शेतकऱ्यांना आॅनलाईन तक्रारीची सुविधा आहे.- संजय भुते, कनिष्ठ अभियंता शाखा करडीआपणाकडे एकही ग्राहकांनी सौर पंप बंद असल्याचे कळविलेले नाही. परंतु लोकांच्या तक्रारीवरुन सौरपंपाशी संबंधित वरिष्ठांशी बोलून पुढील निर्णय घेण्यात येईल.- सुनील माहुर्ले, उपविभागीय विद्युत अभियंता, मोहाडी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती