शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बपेऱ्यातील शेतकऱ्यांना न्यायाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:42 IST

चुल्हाड (सिहोरा) : बावणथडी व वैनगंगा नदीच्या संगम तीरावर असणाऱ्या बपेरा गावातील बागायतदार शेतकऱ्यांना न्यायच मिळाला नाही. नैसर्गिक आपत्ती ...

चुल्हाड (सिहोरा) : बावणथडी व वैनगंगा नदीच्या संगम तीरावर असणाऱ्या बपेरा गावातील बागायतदार शेतकऱ्यांना न्यायच मिळाला नाही. नैसर्गिक आपत्ती झाली असताना युती व महाविकास आघाडी शासनाने मदतीचा हात देताना लक्ष घातले नाही. लोकप्रतिनिधींनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले नाही. यामुळे शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित झाले आहेत. यामुळे लोकप्रतिनिधी व सरकारच्या विरोधात गावांत आक्रोश आहे. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत हेक्टरी आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

वैनगंगा, बावणथडी नद्याचे काठावर असणाऱ्या बपेरा गावांत पुराचे पाणी शिरत असल्याचा प्रकार नवीन नाही. पावसाळ्यात नदीला पूर येताच सर्वात प्रथम बपेरा गावाला फटका बसत आहे. दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनाच्या यादीत असणाऱ्या घरातही पाणी शिरत आहे. प्रथम टप्प्यात १२५ घराचे पुनर्वसन झाले आहे. या वरून पुराच्या पाण्याची भीषणता लक्षात येत आहे. उर्वरित १६९ घराचे पुनर्वसन अडले आहे. लोकप्रतिनिधी व शासन बेजबाबदार वागल्याने उर्वरित पुनर्वसित कुटुंबातील लोकांना न्याय मिळाला नाही. युती शासनाच्या कार्यकाळात साधी चर्चा झाली नाही. दरम्यान, नदीच्या वाढत्या पात्राने आधी शेतकऱ्यांचे बागायती शेती गिळंकृत केलेल्या आहेत. नदीत असणाऱ्या विहिरी कवेत घेतल्या आहेत. अनेक शेतकरी न्यायासाठी भांडत असताना जग सोडून निघून गेले आहेत. पोटाला भुकेचे चिमटे बसल्यानंतर शेतकऱ्यांचे पोरं नागपुरात रोजगाराच्या शोधासाठी तिथेच जमले आहेत. ते कधी गावात परतले नाही. गावात फक्त घर शिल्लक राहिले आहे. बागायती शेतीवर रेती संचारली असून, शासनाचा फायदा होत आहे. रेती घाट लिलावातून मध्यप्रदेश शासन लाभ घेत आहे. नदी पात्रात सीमांकन नसल्याने हा एक वाद आहे. नाकाडोंगरी ते बपेरा आणि बपेरा ते तामसवाडीपर्यंत शेकडो हेक्टर शेत जमीन नदी पात्रात समाविष्ट झाली आहे; परंतु शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना आर्थिक मदत देण्यात आली नाही. मुख्यमंत्री कोष निधी अंतर्गत पिटारा उघडले जात नाही. बपेरा गावातील शेतकऱ्यांना शेतसारा माफ करण्यात आलेला आहे. शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे मानले आहे; परंतु मदतीचा सर्व्हे होत नाही. फूल नाही तर फुलाची पाकळी देण्याचे प्रयत्न केले जात नाही.

बॉक्स

ड्रीम प्रोजेक्टची गावकऱ्यांची मागणी

सिहोरा परिसरात ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ आहे. सातपुडा पर्वत रांगांचे घनदाट जंगल आहे. वैनगंगा, बावणथडी नद्याचे खोरे आहेत. पर्यटनाला उजाळा देणारे अनेक संस्था आहेत. गावकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पर्याय आहेत; परंतु लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे नद्याचे सौंदर्यीकरण झाले नाही. संरक्षण भिंतीचे बांधकाम झाले नाही. निसर्ग वैभव असताना नव्या दमाने नियोजन करण्यात येत नाही. गावांत सिमेंट रस्ते, नाल्या, सभामंडप बांधकामाचा अनुशेष नाही; परंतु गावात तेच बांधकाम मंजूर करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांचे लाड पुरविण्यात येत असल्याने गावांचे कुशीबाहेर सिमेंट रस्ते झाले आहे. या रस्त्यावर कधी मानवी पाऊले पडली नाहीत. ५ लाख निधीचे वारे न्यारे झाले आहेत. नद्याचे काठावर ड्रीम प्रोजेक्ट राबविण्याची गरज असून, बपेरा गावासह आठ गावातील शेतकऱ्यांची समस्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणली जाईल, अशी माहिती युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी दिली आहे.