शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

शेतकऱ्यांना धान मोजणीच्या मुदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

पालांदूर : एकदा नव्हे दोनदा धान खरेदीला मुदतवाढ मिळूनही धान खरेदी पूर्ण होऊ शकली नाही. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान ...

पालांदूर : एकदा नव्हे दोनदा धान खरेदीला मुदतवाढ मिळूनही धान खरेदी पूर्ण होऊ शकली नाही. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. २२ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत शेतकरी धान मोजणीकरिता वेटिंगवर होता. मात्र धान खरेदी अपुरीच राहिली. आता पुन्हा धान मोजणी करिता शासनाच्या आदेशाची वाट बघणे सुरू आहे.

पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात धान खरेदी समस्येत आली आहे. उन्हाळी धान खरेदीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. आधी गोडाऊन समस्यानंतर बारदाना समस्या व आता मुदतीची समस्या भेडसावल्याने शेतकरी कंटाळलेला आहे. ऐन पावसात धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. मोजणीकरिता खर्च अधिक येत आहे.

शासनासह प्रशासनाने अर्थात जिल्हा पणन कार्यालयाने धान खरेदीचे धोरण सकारात्मक न ठेवल्याने जुलै महिना धान खरेदीला उजाडला. शासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बारदाना समस्या आजचीच नसून नियमित झाली आहे. सरतेशेवटी शेतकऱ्यांच्या बारदान्यातच खरेदीचे प्रयत्न सुरू झाले. असेच प्रयत्न पूर्वी झाले असते तर शेतकऱ्यासह आधारभूत केंद्रांनासुद्धा हायसे वाटले असते. परंतु नियमाच्या बांधीलतेमुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ कुणीही नियमात शिथिलता देऊ शकले नाही. त्यामुळे तब्बल मे, जून व जुलै धान खरेदीत अडकली. तरीही धान खरेदी होते की नाही ही एक समस्याच उभी झाली आहे.

चौकट

जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी शासन-प्रशासनाच्या विरोधात आक्रोश अनुभवण्यात आला. सहनशीलतेच्या पुढे गेल्याने शेतकरी राजा हक्कासाठी रस्त्यावर आला. त्यानंतर राजकीय नेते त्यांच्या सोबतीला धावले. प्रशासनानेसुद्धा नमते घेत शेतकऱ्यांच्या समस्येची तीव्रता समजून घेतली. धान खरेदीच्या आदेश दिले. आता फक्त मुदतवाढीच्या आदेशाची प्रतीक्षा कायम आहे.

कोट

निसर्गाच्या अनेक हुलकावण्या स्वीकारीत महागाईचा मार खात धानाची शेती करावी लागते. धान पीक इतर पिकांच्या तुलनेत खर्चीकच आहे. परंतु शासनाचे हक्काचे आधारभूत केंद्र असल्याने शेतकरी धानाकडे अधिक लक्ष देत आहेत. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी भरडला जात आहे. पुढील उन्हाळी हंगामात निश्चितच धानाच्या हंगामात तूट निर्माण होईल. पर्यायी पिके लावली जातील.

हेमंत सेलोकर, प्रगतिशील शेतकरी, खुनारी