शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना धान मोजणीच्या मुदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

पालांदूर : एकदा नव्हे दोनदा धान खरेदीला मुदतवाढ मिळूनही धान खरेदी पूर्ण होऊ शकली नाही. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान ...

पालांदूर : एकदा नव्हे दोनदा धान खरेदीला मुदतवाढ मिळूनही धान खरेदी पूर्ण होऊ शकली नाही. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. २२ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत शेतकरी धान मोजणीकरिता वेटिंगवर होता. मात्र धान खरेदी अपुरीच राहिली. आता पुन्हा धान मोजणी करिता शासनाच्या आदेशाची वाट बघणे सुरू आहे.

पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात धान खरेदी समस्येत आली आहे. उन्हाळी धान खरेदीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. आधी गोडाऊन समस्यानंतर बारदाना समस्या व आता मुदतीची समस्या भेडसावल्याने शेतकरी कंटाळलेला आहे. ऐन पावसात धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. मोजणीकरिता खर्च अधिक येत आहे.

शासनासह प्रशासनाने अर्थात जिल्हा पणन कार्यालयाने धान खरेदीचे धोरण सकारात्मक न ठेवल्याने जुलै महिना धान खरेदीला उजाडला. शासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बारदाना समस्या आजचीच नसून नियमित झाली आहे. सरतेशेवटी शेतकऱ्यांच्या बारदान्यातच खरेदीचे प्रयत्न सुरू झाले. असेच प्रयत्न पूर्वी झाले असते तर शेतकऱ्यासह आधारभूत केंद्रांनासुद्धा हायसे वाटले असते. परंतु नियमाच्या बांधीलतेमुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ कुणीही नियमात शिथिलता देऊ शकले नाही. त्यामुळे तब्बल मे, जून व जुलै धान खरेदीत अडकली. तरीही धान खरेदी होते की नाही ही एक समस्याच उभी झाली आहे.

चौकट

जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी शासन-प्रशासनाच्या विरोधात आक्रोश अनुभवण्यात आला. सहनशीलतेच्या पुढे गेल्याने शेतकरी राजा हक्कासाठी रस्त्यावर आला. त्यानंतर राजकीय नेते त्यांच्या सोबतीला धावले. प्रशासनानेसुद्धा नमते घेत शेतकऱ्यांच्या समस्येची तीव्रता समजून घेतली. धान खरेदीच्या आदेश दिले. आता फक्त मुदतवाढीच्या आदेशाची प्रतीक्षा कायम आहे.

कोट

निसर्गाच्या अनेक हुलकावण्या स्वीकारीत महागाईचा मार खात धानाची शेती करावी लागते. धान पीक इतर पिकांच्या तुलनेत खर्चीकच आहे. परंतु शासनाचे हक्काचे आधारभूत केंद्र असल्याने शेतकरी धानाकडे अधिक लक्ष देत आहेत. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी भरडला जात आहे. पुढील उन्हाळी हंगामात निश्चितच धानाच्या हंगामात तूट निर्माण होईल. पर्यायी पिके लावली जातील.

हेमंत सेलोकर, प्रगतिशील शेतकरी, खुनारी