शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

शेतकरी कर्ज परतफेडीच्या विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

आमगाव (दिघोरी) : धान पिकासाठी उचललेले पीककर्ज ३१ मार्चपर्यंत परत करायचे असल्याने त्या कर्जाची जुळवाजुळव करण्यामध्ये शेतकरी दिसून ...

आमगाव (दिघोरी) : धान पिकासाठी उचललेले पीककर्ज ३१ मार्चपर्यंत परत करायचे असल्याने त्या कर्जाची जुळवाजुळव करण्यामध्ये शेतकरी दिसून येत असून, ते कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे.

परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी धान पिकासाठी पीक कर्ज म्हणून बँकेमधून व सोसायटीमधून कर्जाची उचल केली. ते कर्ज शासनामार्फत बिनव्याजी असून, ते ३१ मार्चपर्यंत कर्ज परतफेड करायचे असते. यावर्षी धान पिकावर मोठ्या प्रमाणात किडीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसला. अनेक शेतकऱ्यांना लागलेला खर्चसुद्धा निघालेला नाही. त्यामुळे हाती आलेल्या उत्पन्नामधून कर्जाची परतफेड कशाप्रकारे करावी, हा विचार शेतकऱ्यांसमोर उभा होता. अशातच मागीलवर्षी शासनाने नियमित कर्जफेड करीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत अनुदान देण्याचे घोषित केले होते. मात्र त्यांची अंमलबजावणी अजूनपर्यंत करण्यात आली नाही. यावर्षी त्याची अंमलबजावणी होईल, असे अनेकांना वाटत असतानाच शासनाने नियमित कर्जफेड करत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पीककर्ज ३१ मार्चपर्यंत परतफेड करावे, अशी घोषणा केली असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमनिरास झाला. कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे असलेले पीक कर्ज वेळेवर भरणे गरजेचे असल्याने त्या कर्जाची तरतूद कशी करावी, हा विचार शेतकऱ्यांसमोर असून, त्यांनी त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी उधार, उसने करताना शेतकरी दिसत आहेत. तसेच आपल्याकडील असलेले दागिने गहाण ठेवून पैसा उभा करण्याची वेळ आली आहे. तसेच उत्पादन घटल्याने उपजीविका कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जे धान पीक हाती आले, ते शेतकऱ्यांनी आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर दिले. शासन आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर बोनसची घोषणा केली असली, तरी ती रक्कम मार्च महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती केली जात असल्याने शेतकऱ्यांना पीककर्जासाठी पैसा उभा करण्याची वेळ आलेली आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारासमोर उभा राहण्याची वेळ आली असून, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत जाहीर करण्यात आलेले अनुदान त्यांच्या पीक कर्जामध्ये जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.