शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित

By admin | Updated: July 10, 2014 23:26 IST

यावर्षी पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेने महागड्या बियाणांची पेरणी केली. आता ती वाया जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले.

भंडारा : यावर्षी पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेने महागड्या बियाणांची पेरणी केली. आता ती वाया जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे.मागीलवर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर केंद्र शासनाची चमू येऊन पाहणी केली. त्यानंतर तत्कालीन कृषीमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा करुन मदत घोषीत केली. त्यावेळी भंडारा जिल्ह्याला ४७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी वाटपासाठी देण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ४७ कोटी ५० लाख रुपये त्या-त्या तालुक्यांना वितरीत करण्यात आले. यामध्ये भंडारा तालुक्याला ७ कोटी २४ लाख ७० हजार, पवनी तालुक्याला ७ कोटी २२ लाख ६९ हजार, तुमसर तालुक्याला ६ कोटी ६० लाख, मोहाडी तालुक्याला ६ कोटी ३० लाख १८ हजार, साकोली तालुक्याला ४ कोटी ४९ लाख ६८ हजार, लाखनी तालुक्याला ६ कोटी २३ लाख ३६ हजार, लाखांदूर ९ कोटी ३९ लाख ६८ हजार असे एकूण ४७ कोटी ५० लाख २९ हजार रुपये वितरीत करण्यात आले. सर्वच तालुक्यातील तहसील कार्यालयांना रक्कम पाठविण्यात आली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यांच्या तक्रारी वाढत असल्या तरी अनेकांकडे खाते क्रमांक नाही, काहींचा संपर्क क्रमांक नाही, काहींचे आपसी वाद आहेत. त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. यासंदर्भात साकोलीचे तहसीलदार हंसा मोहणे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ९५ टक्के लोकांना पैसे वाटप करण्यात आले असून केवळ २२ लाख रुपये शिल्लक आहे. ८०० ते ९०० शेतकऱ्यांमध्ये काहींकडे खाते नाही, काही परगावी राहत आहेत. काहींचे फेरफारमध्ये वारसान चढविण्यात आले नाही. त्यामुळे ही रक्कम शिल्लक आहे.पवनीचे तहसीलदार दिलीप आखाडे म्हणाले, ७.२२ कोटी रकमेपैकी ६.४० कोटी रुपये वाटप करण्यात आली आहे. ऊर्वरीत रक्कम बँकेतील खात्याअभावी राहिलेली असल्याचे सांगितले. खुटसावरी येथील शेतकरी नरेंद्र पोटवार म्हणाले, यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मागील वर्षी झालेल्या नुकसानीची अद्यापही आर्थिक मदत देण्यात आली नाही. परिणामी यावर्षी शासनाच्या मदतीची अपेक्षा कशी करायची? खरीप हंगामात अतिवृष्टी आणि रब्बीमध्ये गारपीट कोसळूनही मदत मिळू शकली नाही. ही मदत कधी मिळेल?खुटसावरी येथील शेतकरी कन्हैया भुते म्हणाले, मागीलवर्षी निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके मातीमोल झाली. नुकसान भरपाई म्हणून शासनाने आर्थिक मदत घोषितही केली. मात्र अद्यापही ही मदत बँकेच्या खात्यात पोहचलेली नसल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)