शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

भारनियमनाविरूद्ध शेतकरी आंदोलन करणार

By admin | Updated: January 28, 2017 00:34 IST

मागीलवर्षी पावसाळ्यात कृषीपंपासाठी आठ तास वीज मिळत होती. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते.

लोकप्रतिनिधींना आश्वासनांचा विसर : शेतकरी संकटमोचन समितीचा आरोपसाकोली : मागीलवर्षी पावसाळ्यात कृषीपंपासाठी आठ तास वीज मिळत होती. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी या शेतकऱ्यांना आश्वासने देण्यात आली होती. मात्र आता तीच आश्वासने लोकप्रतिनिधींनी पाळली नाहीत. परिणामी पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीने आयोजित पत्रपरिषदेत दिला.पावसाळ्यात पावसाने दगा दिला दुसरीकडे आठ तास वीज पुरवठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे रोवणे झाले नाही. ज्यांची रोवणी झाली होती त्यांना विजेअभावी पाणी पुरत नव्हते. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा माराव्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. हे आंदोलन १० दिवस सुरू राहिले होते. शेवटी खासदार नाना पटोले व महावितरणचे अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन वीज पुरवठा ८ तासावरून १२ तास केला. पुन्हा चार तास वीज पुरवठा वाढवून देऊ, असे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन पुर्ण झाले नाही. ऐनवेळी निसर्गाने साथ दिल्यामुळे पीक घरी आले.आता उन्हाळी पिकासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली. काही शेतकऱ्यांची रोवणी सुरू झाली. मात्र वीज आठ तासच मिळत आहे. त्यामुळे आठ तासाच्या विजेने पीक होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे त्यामुळे येत्या ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्रीसंत लहरीबाबा मठ साकोली येथे तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीत शासनाने २४ तास वीज पुरवठा करावा व भारनियमन बंद करावे, धानाला ३ हजार पाचशे रूपये प्रती क्विंटल भाव द्यावा, आधारभूत धान खरेदी केंद्र आॅक्टोंबर महिन्याच्या सुरवातीला सुरू करावे, वन्य व हिस्त्रप्राण्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास २० लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात यावी, वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागण्यावर चर्चा करण्यात येईल व शासनातर्फे या मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीचे साकोली तालुका अध्यक्ष राम महाजन यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अविनाश ब्राम्हणकर, डॉ.अजय तुमसरे, नंदकिशोर समरीत, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, मोतीराम कापगते, अशोक बोरकर, लीलाधर लांजेवार, गुलाब उके, देवराव कापगते, मारोती कापगते व बाबुराव बहेकार उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)