शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

खंडित वीज समस्येने १३ गावचे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

पालांदूर : गत पंधरा दिवसांपासून गोंडेगाव फिडरवरून १३ गावांतील शेतकऱ्यांची वीज खंडित झाली असून, कृषी पंप ठप्प झाले आहेत. ...

पालांदूर : गत पंधरा दिवसांपासून गोंडेगाव फिडरवरून १३ गावांतील शेतकऱ्यांची वीज खंडित झाली असून, कृषी पंप ठप्प झाले आहेत. वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर बागायत शेती धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. अन्यथा उपाेषणाचा इशारा देण्यात आला आहे.

गुरठा, गोंडेगाव परिसरासह १३ गावांतील वीज समस्या गत पंधरा दिवसांपासून ऐरणीवर आलेली आहे. धान पिकासह बागायत क्षेत्र मोठे असल्याने सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस ऊन वाढत असल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. कृषी फिडरला वीज नियमित नसल्याची समस्या मोठी आहे. २४ तासांत केवळ ८ तास वीज मिळत आहे. त्या ८ तासांत वीज खंडित होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. यासंबंधात स्थानिक तंत्रज्ञ मुख्यालयी राहात नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आठ तास वीजऐवजी बारा तास विजेचा पुरवठा करा, वीज तंत्रज्ञ बदलवून द्या व मुख्यालयी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन कनिष्ठ सहायक अभियंता मयंक सिंग यांना देण्यात आले आहे.