शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

चक्क विषाची बाटली घेऊन शेतकरी पोहोचला तहसीलवर, म्हणाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 12:28 IST

वारंवार धानाची कापणी करून चोरी केल्याची तक्रार देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने त्रस्त शेतकरी विषाची बाटली घेऊन तहसीलमध्ये पोहोचला. या प्रकाराने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देलाखांदूरची घटना : बळजबरी धान कापणी करणाऱ्यावर कारवाईची मागणी

भंडारा : शेतातील धानाची एका शेतकऱ्याने बळजबरीने कापणी केल्याची तक्रार देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथील एक शेतकरी चक्क विषाची बाटली घेऊन मंगळवारी येथील तहसील कार्यालयात पोहोचला. तत्काळ कारवाई केली नाही तर विष प्राशन करण्याचा इशारा त्याने दिला. या प्रकाराने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. तालुका प्रशासनाने कारवाईचे निर्देश दिल्याने मोठा अनर्थ टळला.

मच्छिंद्र लक्ष्मण मेश्राम (वय ३२, रा. दहेगाव) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना तालुक्यातील खैरी येथे शासनाकडून एक हेक्टर शेती मिळाली आहे. त्यात ते धानाची लागवड करतात. मात्र, काही वर्षांपासून गट नंबर १९७ अंतर्गत ०.२० हेक्टर शेतीवरून मच्छिंद्र आणि यादोराव बारसागडे, रा. चिचाळ यांच्यात वाद सुरू होता. प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतरही शेतीचा कब्जा सोडण्यास यादोराव नकार देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी यादोराव यांनी धानाची कापणी करून चोरी केल्याची तक्रार पोलिसांसह महसूल विभागाकडे करण्यात आली. मात्र, कोणतीच कार्यवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छिंद्रने मंगळवारी सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालय गाठले. त्याच्या हातात विषाची बाटली होती. संबंधितावर कारवाई केली नाही तर विष प्राशन करण्याचा इशारा दिला. हा प्रकार माहीत होताच तहसीलसमोर एकच गर्दी झाली. तहसील प्रशासनात एकच खळबळ उडाली. काही वेळातच त्याच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

यावेळी तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नायब तहसीलदार देविदास पाथोडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, पोलीस अंमलदार राहुल गायधने, भूपेंद्र बावनकुळे उपस्थित होते. तहसीलदार मेश्राम यांनी याप्रकरणी चौकशी करून दोषीविरोधात आवश्यक कारवाईची सूचना दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकार