शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सापडला आर्थिक कोंडीत

By admin | Updated: July 22, 2015 01:13 IST

कांद्री परिसरात उन्हाळी धान मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. उन्हाळी धान निघाल्यानंतर कांद्री येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.

धानाचे चुकारे अडले : पावसाअभावी पेरणी करपली, रोवणी अडलीजांब (लोहारा) : कांद्री परिसरात उन्हाळी धान मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. उन्हाळी धान निघाल्यानंतर कांद्री येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मे महिन्यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांनी धान विकले. परंतु त्यांना अजूनपर्यंत धानाचे चुकारे प्राप्त झाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाळा सुरु झाला असला तरी पाऊस नसल्याने उन्हाळ्याचे दिवस दिसत आहे. सुरुवातीला थोडा पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडे बी बियाणे खरेदी करून पेरणी केली. पण आता पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. पूर्वीच बँका, सोसायटीकडून कर्ज घेऊन बी बियाणे खरेदी करून शेतामध्ये पेरणी करण्यात आली. पण पावसाअभावी शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली असल्याने आता पैसे कुठून आणावे हा प्रश्न शेतकऱ्यापुढे पडला आहे. सुलतानी संकटात शेतकरी सापडले असले तरी अजूनपर्यंत कांद्री परिसरातील शेतकऱ्यांचे उन्हाळी धानाचे चुकारे न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सोसायटीकडे अजूनपर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांचे चुकारे पाठविण्यात आले नाही. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तरी धान खरेदी विक्री केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून कांद्री येथील धान खरेदी केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे धानाचे चुकारे त्वरीत देण्याची मागणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कांद्री चे माजी अध्यक्ष प्रभाकर बारई तसेच शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळीजांब (लोहारा) : लोहारा, जांब, धोप, ताळगाव, सोरणा, कांद्री, हिवरा, सकरला, रोंघा, लेंडेझरी या परिसरात पावसाअभावी शेतामध्ये टाकलेले धानाचे पऱ्हे करपू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची पाळी आली आहे. बँका, सोसायटीमधून कर्ज घेऊन या परिसरातील शेतकऱ्यांनी महागडे बी बियाणे खरेदी करून शेतामध्ये पेरणी केली. पण पावसाने दगा दिल्याने धान पऱ्हे तसेच विविध रोपे करपू लागली आहेत. यामुळे उत्पादन घेण्यासाठी आता पैसा कुठून आणायचा व शेतामध्ये पेरणी करावी हा बिकट प्रश्न शेतकऱ्यापुढे पडला आहे. शेतकरी सुलतानी संकटात सापडल्याने त्यांचा चेहरा पूर्णत: कोमेजलेला आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन दुबार पेरणीकरिता मोफत बी बियाणे पुरवठा करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.