शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

रोवणीसाठी शेतकरी मिळेल तिथून शोधतो पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST

पावसाळ्याचे दोन महिने संपण्यात दोन दिवस शिल्लक असतानासुद्धा सरासरी एवढे पाऊस पडले नसल्याने रोवणी योग्य पºहे संकटात सापडले आहेत. शेतकरी शेजारील किंवा कालपर्यंत निरुपयोगी असलेला पाणी इंजिन, जनरेटर, मोटारपंप यांच्या साहाय्याने उपसा करून रोवणीकरिता धडपड करीत आहे. सुमारे दोन हजार ते तीन हजार फुटावरून पाण्याचे नियोजन करून रोवणीकरिता तळमळ पालांदूर परिसरात सुरू झालेली आहे.

ठळक मुद्देनिरुपयोगी पाण्यालाही आली किंमत : इंजिन, जनरेटर, मोटारपंप साह्याने पाण्याचा उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : वरुणराजा रुसला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गत पाच दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस नसल्याने रोवणी प्रभावित झाली आहे. मिळेल तिथून पाण्याचा उपसा करीत शेतकरी रोवणीसाठी धडपड करीत आहे.पावसाळ्याचे दोन महिने संपण्यात दोन दिवस शिल्लक असतानासुद्धा सरासरी एवढे पाऊस पडले नसल्याने रोवणी योग्य पºहे संकटात सापडले आहेत. शेतकरी शेजारील किंवा कालपर्यंत निरुपयोगी असलेला पाणी इंजिन, जनरेटर, मोटारपंप यांच्या साहाय्याने उपसा करून रोवणीकरिता धडपड करीत आहे. सुमारे दोन हजार ते तीन हजार फुटावरून पाण्याचे नियोजन करून रोवणीकरिता तळमळ पालांदूर परिसरात सुरू झालेली आहे. अद्यापही ४० टक्के रोवणी पावसाच्या अनियमितपणामुळे प्रभावित झाली आहे. शेजारील शेतकऱ्याची रोवणी आटोपल्याने स्वत:चे रोवणी न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.मोटार पंप साहित्य विक्री दुकानात पाईप, इंजिन, मोटारपंप यांच्या विक्रीला गती आली असून शेतकºयाला नाईलाजाने रोवणीसाठी पाण्याची आणि योजनाकरिता पदरचे पैसे खर्च करण्याची वेळ संकटकाळात आलेली आहे. निसर्गाने दिलेल्या कोरड्या दुष्काळात शेतकरी संपूर्णत: समस्याग्रस्त असून सिंचनासाठी वाटेल ती रक्कम खर्च करून तळमळ करीत पाण्याचा शोध घेत आहे.अधिक तापमानामुळे विजेच अपेक्षित दाब पंपांना मिळत नसल्याने अपेक्षित पाणी शेतकºयाला मिळत नाही. पाण्यासाठी शेतकºयाची दाहीदिशा सुरू असताना मिळेल तिथून मोटार पंपच्या आधाराने रोवणीसाठी पाणी उपसा सुरू आहे. मागणी वाढल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसात दोन-चार वेळा तरी नक्कीच वीज खंडित होत असल्याने तिला सुरळीत करण्याकरिता वीज विभागांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तत्परता बाळगावी लागत आहे.उष्णतेत कमालीची वाढदोन दिवसाच्या असह्य उन्हाने शेतकºयांसह सामान्य माणूस प्रभावित झालेला आहे. जीवघेण्या उष्णतेने बळीराजा सुद्धा हादरला असून झालेल्या रोवणीला किडीने ग्रासलेले आहे. शेतातही राबत असलेल्या मजुरांना असह्य उन्हाने ग्रासले आहे. बांधांना तडे पडले आहे. पाणी आटत असल्याने झालेल्या रोवणीला प्रभाव पडत आहे. गत पाच दिवसात रिमझिम पाऊस न आल्याने झालेली रोवणी करपण्याच्या मार्गावर आहे. तलाव, पाट, बंधारे, छोटे नाले आदींवर कृत्रिम पाणी उपसा साधनांचा वापर करून रोवणीसाठी शेतकरी दाहीदिशा करीत आहे. उन्हाळ्यासारखी परिस्थीती ऐन पावसाळ्यात झाली असल्याने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस