शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

रोवणीसाठी शेतकरी मिळेल तिथून शोधतो पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST

पावसाळ्याचे दोन महिने संपण्यात दोन दिवस शिल्लक असतानासुद्धा सरासरी एवढे पाऊस पडले नसल्याने रोवणी योग्य पºहे संकटात सापडले आहेत. शेतकरी शेजारील किंवा कालपर्यंत निरुपयोगी असलेला पाणी इंजिन, जनरेटर, मोटारपंप यांच्या साहाय्याने उपसा करून रोवणीकरिता धडपड करीत आहे. सुमारे दोन हजार ते तीन हजार फुटावरून पाण्याचे नियोजन करून रोवणीकरिता तळमळ पालांदूर परिसरात सुरू झालेली आहे.

ठळक मुद्देनिरुपयोगी पाण्यालाही आली किंमत : इंजिन, जनरेटर, मोटारपंप साह्याने पाण्याचा उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : वरुणराजा रुसला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गत पाच दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस नसल्याने रोवणी प्रभावित झाली आहे. मिळेल तिथून पाण्याचा उपसा करीत शेतकरी रोवणीसाठी धडपड करीत आहे.पावसाळ्याचे दोन महिने संपण्यात दोन दिवस शिल्लक असतानासुद्धा सरासरी एवढे पाऊस पडले नसल्याने रोवणी योग्य पºहे संकटात सापडले आहेत. शेतकरी शेजारील किंवा कालपर्यंत निरुपयोगी असलेला पाणी इंजिन, जनरेटर, मोटारपंप यांच्या साहाय्याने उपसा करून रोवणीकरिता धडपड करीत आहे. सुमारे दोन हजार ते तीन हजार फुटावरून पाण्याचे नियोजन करून रोवणीकरिता तळमळ पालांदूर परिसरात सुरू झालेली आहे. अद्यापही ४० टक्के रोवणी पावसाच्या अनियमितपणामुळे प्रभावित झाली आहे. शेजारील शेतकऱ्याची रोवणी आटोपल्याने स्वत:चे रोवणी न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.मोटार पंप साहित्य विक्री दुकानात पाईप, इंजिन, मोटारपंप यांच्या विक्रीला गती आली असून शेतकºयाला नाईलाजाने रोवणीसाठी पाण्याची आणि योजनाकरिता पदरचे पैसे खर्च करण्याची वेळ संकटकाळात आलेली आहे. निसर्गाने दिलेल्या कोरड्या दुष्काळात शेतकरी संपूर्णत: समस्याग्रस्त असून सिंचनासाठी वाटेल ती रक्कम खर्च करून तळमळ करीत पाण्याचा शोध घेत आहे.अधिक तापमानामुळे विजेच अपेक्षित दाब पंपांना मिळत नसल्याने अपेक्षित पाणी शेतकºयाला मिळत नाही. पाण्यासाठी शेतकºयाची दाहीदिशा सुरू असताना मिळेल तिथून मोटार पंपच्या आधाराने रोवणीसाठी पाणी उपसा सुरू आहे. मागणी वाढल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसात दोन-चार वेळा तरी नक्कीच वीज खंडित होत असल्याने तिला सुरळीत करण्याकरिता वीज विभागांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तत्परता बाळगावी लागत आहे.उष्णतेत कमालीची वाढदोन दिवसाच्या असह्य उन्हाने शेतकºयांसह सामान्य माणूस प्रभावित झालेला आहे. जीवघेण्या उष्णतेने बळीराजा सुद्धा हादरला असून झालेल्या रोवणीला किडीने ग्रासलेले आहे. शेतातही राबत असलेल्या मजुरांना असह्य उन्हाने ग्रासले आहे. बांधांना तडे पडले आहे. पाणी आटत असल्याने झालेल्या रोवणीला प्रभाव पडत आहे. गत पाच दिवसात रिमझिम पाऊस न आल्याने झालेली रोवणी करपण्याच्या मार्गावर आहे. तलाव, पाट, बंधारे, छोटे नाले आदींवर कृत्रिम पाणी उपसा साधनांचा वापर करून रोवणीसाठी शेतकरी दाहीदिशा करीत आहे. उन्हाळ्यासारखी परिस्थीती ऐन पावसाळ्यात झाली असल्याने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस