शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरे पळवण्यासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड, असा केला बंदोबस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 16:26 IST

रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. असाच एक प्रयोग पवनारा येथील शेतकऱ्याने केला आहे.

ठळक मुद्देपवनारात प्रयोग : शेतात केली मिर्चीची धुणी

भंडारा : रानडुकरांच्या हैदोसाने मातीमोल होत असलेले धान पीक वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने नवीन आयडिया शोधून काढली. रानडुकरे पळवण्यासाठी चक्क शेतात मिरचीची धुणी करून नुकसानीवर मात करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.

तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरात रानडुकरांचा त्रास वाढला असून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. रानडुकरांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. जो सांगेल तसे शेतकरी करतो, परंतु अजूनही यश आले नाही.

यावर तुमसर तालुक्यातील पवनारा येथील शेतकऱ्याने एक उपाय शोधून काढला. त्याने सुतळीचा पोत्यावर वाळलेल्या लाल मिरच्या घातल्या व त्यावर जळालेला ऑईल घालून लोखंडी सळाखीला गुंडाळून बांधून दिले. सायंकाळी ६ च्या सुमारास शेतावरील धुऱ्यावर ते उभे करून आग लावली. यामुळे निघणाऱ्या धुरात आईलची दुर्गंधी व मिरच्यामुळे रानडुकराला खेसखेसी होईल. त्यामुळे रानडुकरे येणार नाही, आणि झालेही तसेच. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

वन्य प्राणी रानडुक्कर जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह असतो. त्याला दूरवरून आलेली पिके कोणत्या शेतात आहे याचा गंध येतो. तेथे जाऊन नासाडी करतो. या दुर्गंधी व खेसखेसीने कदाचित रानडुक्कर येणार नाही, असे शेतकऱ्यांचे मत आहे. हा प्रयोग चार दिवसाच्या अंतराने करावा असेही सांगितले. या प्रयोगाकडे गावतील इतर शेतकरी लक्ष देऊन आहेत, जेणेकरून हा प्रयोग यशस्वी झाला तर इतरही शेतकरी आपल्या शेतात करणार असल्याचे सांगण्यात आले.

अगोदरच शेतकरी धानपिकावर किडीचा प्रादुर्भावामुळे त्रस्त झाला आहे. गाद, खोडकिडा यासह अन्य रोगाने पीक ग्रासले. आता अनेक शेतकऱ्यांचे धान पीक कापणी योग्य आले. त्यातही रानडुकरे नासाडी करतात. वनविभागात नुकसानभरपाई मागितली तर तुटपुंजी मदत मिळताे. त्याकरिताही नानाविध कागदपत्रे व लागणारा अवाढव्य खर्च म्हणून वनविभागाला नुकसान भरपाई मागितली नाही ते बरे, असे बरेच शेतकऱ्यांचे मत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी