शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रानडुकरे पळवण्यासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड, असा केला बंदोबस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 16:26 IST

रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. असाच एक प्रयोग पवनारा येथील शेतकऱ्याने केला आहे.

ठळक मुद्देपवनारात प्रयोग : शेतात केली मिर्चीची धुणी

भंडारा : रानडुकरांच्या हैदोसाने मातीमोल होत असलेले धान पीक वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने नवीन आयडिया शोधून काढली. रानडुकरे पळवण्यासाठी चक्क शेतात मिरचीची धुणी करून नुकसानीवर मात करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.

तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरात रानडुकरांचा त्रास वाढला असून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. रानडुकरांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. जो सांगेल तसे शेतकरी करतो, परंतु अजूनही यश आले नाही.

यावर तुमसर तालुक्यातील पवनारा येथील शेतकऱ्याने एक उपाय शोधून काढला. त्याने सुतळीचा पोत्यावर वाळलेल्या लाल मिरच्या घातल्या व त्यावर जळालेला ऑईल घालून लोखंडी सळाखीला गुंडाळून बांधून दिले. सायंकाळी ६ च्या सुमारास शेतावरील धुऱ्यावर ते उभे करून आग लावली. यामुळे निघणाऱ्या धुरात आईलची दुर्गंधी व मिरच्यामुळे रानडुकराला खेसखेसी होईल. त्यामुळे रानडुकरे येणार नाही, आणि झालेही तसेच. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

वन्य प्राणी रानडुक्कर जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह असतो. त्याला दूरवरून आलेली पिके कोणत्या शेतात आहे याचा गंध येतो. तेथे जाऊन नासाडी करतो. या दुर्गंधी व खेसखेसीने कदाचित रानडुक्कर येणार नाही, असे शेतकऱ्यांचे मत आहे. हा प्रयोग चार दिवसाच्या अंतराने करावा असेही सांगितले. या प्रयोगाकडे गावतील इतर शेतकरी लक्ष देऊन आहेत, जेणेकरून हा प्रयोग यशस्वी झाला तर इतरही शेतकरी आपल्या शेतात करणार असल्याचे सांगण्यात आले.

अगोदरच शेतकरी धानपिकावर किडीचा प्रादुर्भावामुळे त्रस्त झाला आहे. गाद, खोडकिडा यासह अन्य रोगाने पीक ग्रासले. आता अनेक शेतकऱ्यांचे धान पीक कापणी योग्य आले. त्यातही रानडुकरे नासाडी करतात. वनविभागात नुकसानभरपाई मागितली तर तुटपुंजी मदत मिळताे. त्याकरिताही नानाविध कागदपत्रे व लागणारा अवाढव्य खर्च म्हणून वनविभागाला नुकसान भरपाई मागितली नाही ते बरे, असे बरेच शेतकऱ्यांचे मत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी