शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

‘निर्मल गावात दुर्गंधीची समस्या

By admin | Updated: April 21, 2015 00:24 IST

लाखांदूर तालुक्यातील निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त बारव्हा गावाची ओळख सर्वत्र आहे.

व्यथा बारव्हा गावाची : नागरिकांचे आरोग्य धोक्यातबारव्हा : लाखांदूर तालुक्यातील निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त बारव्हा गावाची ओळख सर्वत्र आहे. एकेकाळी याच गावाने स्वच्छतेकडून समृद्धीकडे या महामंत्राचा बोध घेत गावालगत स्वच्छता अभियान राबवून निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त केला होता. मात्र आजघडीला बारव्हा गावात घाणीचे साम्राज्य वाढले असून दुर्गंधीमय वातावरणामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.गावाच्या सिमेवर येताच येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याला होणारा अपाय रोखण्यासाठी शासनाच्या वतीने हागणदारीमुक्तीसाठी सन २००० पासून स्वच्छता अभियान सुरु केले. या अभियानाला १५ वर्षाचा कालावधी लोटला असताना गावाच्या सीमेवर येताच येणारी हागणदारीची दुर्गंधी कायमच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव संकल्पनेचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.राज्य शासनाने कर्मयोगी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २००० पासून राबविण्याची योजना मोठ्या गाजावाज्यांनी अमलात आणली. यानुसार कायम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. त्यांच्याकडून या माध्यमातून अंमलबजावणी सुरु झाली. मात्र गावात असलेली उघड्यावरील हागणदारी अजूनही मुक्त झाली नाही. या कामात शासकीय यंत्रणा कुठे कमी पडत आहे ही संशोधनाची बाब ठरत आहे.गावात येत असलेल्या या दुर्गंधीमुळे अनेकांना असाध्य रोगाच्या आहारी जावे लागल्याचे अनेकदा समोर आले आहे. या कारणाने ग्रामीण भागात उघड्यावरील हागणदारी बंद करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शासकीय अनुदानावर लोकांना शौचालय बांधावीत यासाठी अनुदानही देण्यात आले. शिवाय त्यांचा वापर करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र शासनाचे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरल् याचे समोर येत आहे. या प्रकाराला स्थानिक प्रशासन तेवढेच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनेचा मागोवा घेतल्यास अनेकांनी ती केवळ नावापुरतेच या योजनेत सहभाग नोंदविल्याचे समोर येत आहे. शासनाकडून अनुदानाचा लाभ घेऊन बांधलेल्या या शौचालयात नागरिकांकडून गोवऱ्या, काड्या व टाकावू वस्तू ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. तर काही शौचालयाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे त्याचा वापरात नसल्याचे दिसून आले. १०० टक्के नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम केल्याचे कागदी घोडे नाचवून निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त केला. मात्र आजही ५० टक्के नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाल्याने बारव्हावासीयांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा गावासह परिसरातील चिचाळ, तावशी, चिकना, बोथली, धर्मापुरी, कोच्छी, बोथली, दहेगाव, दांडेगाव आदी गावात उघड्यावर प्रात:विधी केला जातो. ग्रामीण भागतात शौचालयाचा वापर कोहत नाही.घरी शौचालय असतानादेखील बहुतांश लोक त्याचा वापर करीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थितीत बदल झालेला नाही. अस्वच्छतेमुळे परिसरात आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे. (वार्ताहर)