शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

धान्य विक्रीसाठी नोंदणीची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

यावर्षीपासून शासनाने नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची नोंदणी स्वतः करावयाची आहे. मात्र ८० टक्के शेतकऱ्यांच्या जवळ अद्ययावत भ्रमणध्वनी नसल्यामुळे ते आपल्या पिकाची नोंदणी करू शकले नाही. काहींनी इतरांची मदत घेऊन नोंदणी केली. मात्र यातही अनेक त्रुटी असल्यामुळे त्यांच्या सातबारा उताऱ्यावर धान पिकासह इतर पिकांच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे तलाठ्यांना सातबारा देणे अडचणीचे होत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शासनाने धान्य विक्रीसाठी करावयाची नोंदणीची अवधी ३० सप्टेंबरपर्यंत ठेवली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत सातबारा मिळाले नाहीत. त्यामुळे ते नोंदणी करू शकत नाहीत. परिणामी नोंदणीचा अवधी शासनाने वाढवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यावर्षीपासून शासनाने नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची नोंदणी स्वतः करावयाची आहे. मात्र ८० टक्के शेतकऱ्यांच्या जवळ अद्ययावत भ्रमणध्वनी नसल्यामुळे ते आपल्या पिकाची नोंदणी करू शकले नाही. काहींनी इतरांची मदत घेऊन नोंदणी केली. मात्र यातही अनेक त्रुटी असल्यामुळे त्यांच्या सातबारा उताऱ्यावर धान पिकासह इतर पिकांच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे तलाठ्यांना सातबारा देणे अडचणीचे होत आहे. वेळेवर सातबारा मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचा रोष तलाठी कार्यालयावर दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे शेतकऱ्यांनी सातबारा वेळेवर मिळत नाही म्हणून एका महिला तलाठ्याला तलाठी कार्यालयाला कुलूप लावून जेरबंद केल्याची घटना घडली. हे असे प्रकार एकट्या साकोली तालुक्यात नाही तर जिल्ह्यात अनेक गावांत घडत आहेत. तांत्रिकदृष्ट्या अडचणीच्या असलेल्या या सातबारा उताऱ्यामुळे तलाठी हतबल झालेले आहेत, मात्र प्रशासनाकडून अशा कुठल्या सूचना आलेल्या नाही ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पिकाची नोंदणी करता येत नाही, त्या शेतकऱ्यांची नोंदणी तलाठ्यांनी करावी. त्यामुळे शेतकरी व तलाठी दोघेही अडचणीत सापडलेले आहेत. हा आदेश यावर्षीचाच असून यात थोडीशी शिथिलता द्यावी. ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन पीक नोंदणी झाली नाही त्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी तलाठ्यांनी करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे, तर जुन्याच पद्धतीने शेतकऱ्यांना सातबारा देण्यात यावे व शासकीय धान्य खरेदी केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आलेली नोंदणीची वेळ वाढविण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. 

धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार थांबवा - धान खरेदी केंद्रातर्फे शेतकऱ्यांना नोंदणीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते. मात्र बरेच धान खरेदी केंद्रावर केंद्रचालकांच्या जवळच्या माणसांची आधीच नोंदणी केलेली असते. परिणामी शेतकऱ्यांना याचा त्रास होतो. त्यामुळे धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :agricultureशेती