शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

खर्चिक विवाह सोहळ्यांनी वाढतोय कर्जाचा डोंगर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 14:20 IST

Bhandara : ग्रामीण भागातही होतोय वारेमाप खर्च; महागाईने वर-वधू पिता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क किटाडी : सध्या स्थितीत सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. आता शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही खर्चिक विवाह सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळेलग्न - साहित्याच्या किमतीही गगनाला भिडल्या असून, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरही महागाईचे सावट आहे.

ग्रामीण भागात शेतमजूर कुटुंबांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी दोन पैसे गाठीला जोडावे लागतात; परंतु वाढत चाललेल्या महागाईमुळे, लग्नसोहळ्यातील वाढलेल्या खर्चामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील विवाह सोहळे कमी खर्चात साध्यासुध्या पद्धतीने पार पाडले जात होते; परंतु हल्ली ग्रामीण भागातही शहरी थाटामाटाची संस्कृती रूढ होत चालली आहे. लग्नसोहळ्यात मेहंदी, हळद, पाहुण्यांचा पाहुणचार, कपडे, स्वागत समारंभ, भेटवस्तू, -म्युझिकल बँडबाजा, डीजे, लाइटिंग, - मोठी एलईडी स्क्रीन व शेवटी मांडव वाढवणी आदी कार्यक्रमांसह खर्चाची यादी वाढली आहे.

याशिवाय घोडा, केटरर्स, फेटे, फ्लावर डेकोरेशन, व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी, ड्रोन कॅमेरा, शूटिंग खर्च एकूण गोळाबेरीज केली तर खर्च लाखोंच्या घरात जातो. त्यामुळे ते थाटामाटात आणि अगदी वाजत- गाजतच वेगळ्या पद्धतीने झाले पाहिजे, असा आताच्या तरुण पिढीचा आग्रह घरच्यांसमोर असतो. त्यामुळे सर्वसाधारण घरातील लग्नाचे बजेट वाढत चालले आहे. शहरात होणाऱ्या महागड्या लग्नासारखी लग्न अलीकडे ग्रामीण भागातही व्हायला सुरुवात झाली आहे. परिणामी, आई-वडिलांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरजअलीकडे अनेक धार्मिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करतात. सर्वांचा खर्च, वेळ, पैसा व श्रम यांची तर बचत होतेच. शिवाय, सामाजिक संस्थांकडून विवाहित जोडप्यांना संसाराकरिता आवश्यक साहित्यही दिले जाते. गोरगरीब, शेतकरी व सर्वसाधारण पालकांना सामूहिक विवाह सोहळ्यामुळे मोठी मदत होते. आर्थिक कर्जबाजारीपणातून वाचण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती देणे, हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

अनावश्यक खर्चाला फाटा द्यावादुष्काळी स्थितीतही ग्रामीण भागात लग्नसमारंभातील मिजास कायम असल्याचे दिसून येते. प्रसंगी कर्जबाजारी होऊन वर-वधू पिता धुमधडाक्यात विवाह सोहळा साजरे करीत असल्याचे दिसते. लग्नातील हा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. शेवटी लग्न दोन जीव व दोन कुटुंबाचे मिलन असते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून काही पैसा भावी दाम्पत्याच्या भविष्यासाठी राखून ठेवणे, अधिक सोयिस्कर ठरू शकेल. 

टॅग्स :marriageलग्नbhandara-acभंडाराInflationमहागाई