शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

खर्चिक विवाह सोहळ्यांनी वाढतोय कर्जाचा डोंगर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 14:20 IST

Bhandara : ग्रामीण भागातही होतोय वारेमाप खर्च; महागाईने वर-वधू पिता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क किटाडी : सध्या स्थितीत सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. आता शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही खर्चिक विवाह सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळेलग्न - साहित्याच्या किमतीही गगनाला भिडल्या असून, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरही महागाईचे सावट आहे.

ग्रामीण भागात शेतमजूर कुटुंबांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी दोन पैसे गाठीला जोडावे लागतात; परंतु वाढत चाललेल्या महागाईमुळे, लग्नसोहळ्यातील वाढलेल्या खर्चामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील विवाह सोहळे कमी खर्चात साध्यासुध्या पद्धतीने पार पाडले जात होते; परंतु हल्ली ग्रामीण भागातही शहरी थाटामाटाची संस्कृती रूढ होत चालली आहे. लग्नसोहळ्यात मेहंदी, हळद, पाहुण्यांचा पाहुणचार, कपडे, स्वागत समारंभ, भेटवस्तू, -म्युझिकल बँडबाजा, डीजे, लाइटिंग, - मोठी एलईडी स्क्रीन व शेवटी मांडव वाढवणी आदी कार्यक्रमांसह खर्चाची यादी वाढली आहे.

याशिवाय घोडा, केटरर्स, फेटे, फ्लावर डेकोरेशन, व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी, ड्रोन कॅमेरा, शूटिंग खर्च एकूण गोळाबेरीज केली तर खर्च लाखोंच्या घरात जातो. त्यामुळे ते थाटामाटात आणि अगदी वाजत- गाजतच वेगळ्या पद्धतीने झाले पाहिजे, असा आताच्या तरुण पिढीचा आग्रह घरच्यांसमोर असतो. त्यामुळे सर्वसाधारण घरातील लग्नाचे बजेट वाढत चालले आहे. शहरात होणाऱ्या महागड्या लग्नासारखी लग्न अलीकडे ग्रामीण भागातही व्हायला सुरुवात झाली आहे. परिणामी, आई-वडिलांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरजअलीकडे अनेक धार्मिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करतात. सर्वांचा खर्च, वेळ, पैसा व श्रम यांची तर बचत होतेच. शिवाय, सामाजिक संस्थांकडून विवाहित जोडप्यांना संसाराकरिता आवश्यक साहित्यही दिले जाते. गोरगरीब, शेतकरी व सर्वसाधारण पालकांना सामूहिक विवाह सोहळ्यामुळे मोठी मदत होते. आर्थिक कर्जबाजारीपणातून वाचण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती देणे, हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

अनावश्यक खर्चाला फाटा द्यावादुष्काळी स्थितीतही ग्रामीण भागात लग्नसमारंभातील मिजास कायम असल्याचे दिसून येते. प्रसंगी कर्जबाजारी होऊन वर-वधू पिता धुमधडाक्यात विवाह सोहळा साजरे करीत असल्याचे दिसते. लग्नातील हा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. शेवटी लग्न दोन जीव व दोन कुटुंबाचे मिलन असते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून काही पैसा भावी दाम्पत्याच्या भविष्यासाठी राखून ठेवणे, अधिक सोयिस्कर ठरू शकेल. 

टॅग्स :marriageलग्नbhandara-acभंडाराInflationमहागाई