शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खर्चिक विवाह सोहळ्यांनी वाढतोय कर्जाचा डोंगर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 14:20 IST

Bhandara : ग्रामीण भागातही होतोय वारेमाप खर्च; महागाईने वर-वधू पिता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क किटाडी : सध्या स्थितीत सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. आता शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही खर्चिक विवाह सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळेलग्न - साहित्याच्या किमतीही गगनाला भिडल्या असून, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरही महागाईचे सावट आहे.

ग्रामीण भागात शेतमजूर कुटुंबांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी दोन पैसे गाठीला जोडावे लागतात; परंतु वाढत चाललेल्या महागाईमुळे, लग्नसोहळ्यातील वाढलेल्या खर्चामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील विवाह सोहळे कमी खर्चात साध्यासुध्या पद्धतीने पार पाडले जात होते; परंतु हल्ली ग्रामीण भागातही शहरी थाटामाटाची संस्कृती रूढ होत चालली आहे. लग्नसोहळ्यात मेहंदी, हळद, पाहुण्यांचा पाहुणचार, कपडे, स्वागत समारंभ, भेटवस्तू, -म्युझिकल बँडबाजा, डीजे, लाइटिंग, - मोठी एलईडी स्क्रीन व शेवटी मांडव वाढवणी आदी कार्यक्रमांसह खर्चाची यादी वाढली आहे.

याशिवाय घोडा, केटरर्स, फेटे, फ्लावर डेकोरेशन, व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी, ड्रोन कॅमेरा, शूटिंग खर्च एकूण गोळाबेरीज केली तर खर्च लाखोंच्या घरात जातो. त्यामुळे ते थाटामाटात आणि अगदी वाजत- गाजतच वेगळ्या पद्धतीने झाले पाहिजे, असा आताच्या तरुण पिढीचा आग्रह घरच्यांसमोर असतो. त्यामुळे सर्वसाधारण घरातील लग्नाचे बजेट वाढत चालले आहे. शहरात होणाऱ्या महागड्या लग्नासारखी लग्न अलीकडे ग्रामीण भागातही व्हायला सुरुवात झाली आहे. परिणामी, आई-वडिलांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरजअलीकडे अनेक धार्मिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करतात. सर्वांचा खर्च, वेळ, पैसा व श्रम यांची तर बचत होतेच. शिवाय, सामाजिक संस्थांकडून विवाहित जोडप्यांना संसाराकरिता आवश्यक साहित्यही दिले जाते. गोरगरीब, शेतकरी व सर्वसाधारण पालकांना सामूहिक विवाह सोहळ्यामुळे मोठी मदत होते. आर्थिक कर्जबाजारीपणातून वाचण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती देणे, हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

अनावश्यक खर्चाला फाटा द्यावादुष्काळी स्थितीतही ग्रामीण भागात लग्नसमारंभातील मिजास कायम असल्याचे दिसून येते. प्रसंगी कर्जबाजारी होऊन वर-वधू पिता धुमधडाक्यात विवाह सोहळा साजरे करीत असल्याचे दिसते. लग्नातील हा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. शेवटी लग्न दोन जीव व दोन कुटुंबाचे मिलन असते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून काही पैसा भावी दाम्पत्याच्या भविष्यासाठी राखून ठेवणे, अधिक सोयिस्कर ठरू शकेल. 

टॅग्स :marriageलग्नbhandara-acभंडाराInflationमहागाई