शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:43 IST

भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देभंडारा - पवनी राज्यमार्ग : आरोग्यावर परिणाम, बांधकामही कासवगतीने

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात सर्वत्र रस्ता बांधकामाचे कार्य जोमात सुरु आहे. त्यात भंडारा- पवनी राज्यमार्गाचा समावेश आहे. या रस्त्याच्या समावेश महामार्गात झाल्यानंतर रस्ता विस्तारीकरणाचा कामालाही प्रारंभ करण्यात आला. जवळपास नऊ महिन्यांपासून रस्ता विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. भंडारा तालुक्यातील आंबाडी ते पवनी तालुक्यातील निलजफाट्यापर्यंतच्या मार्गाचे विस्तारीकरण होत आहे. हा रस्ता सिमेंटचा तयार करण्यात येत आहे. बांधकाम संथगतीने सुरु असल्याने रहदारीला फटका बसत आहे.शेकडो वृक्षांची कत्तलमहामार्गाच्या विस्तारीकरणात रस्ताच दुतर्फा असलेले शेकडो वृक्ष तोडण्यात आली आहेत. यात काही भाग अपवाद आहे. मात्र वृक्षाची कत्तल केल्यानंतर त्यापर्यंतचा भाग मुरुम व बोल्डर टाकून समांतर करण्यात आला आहे. काही भागात हा रस्ता समतल नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हाच मार्ग उमरेड कºहांडला अभयारण्यालाही जोडतो.केवळ दहा टक्के बांधकामआंबाडी ते निलज फाट्यापर्यंतच्या रस्ता बांधकामासाठी दोन्ही बाजुला खोदकाम करण्यात आले. जवळपास ४० किमीचा या रस्ता बांधकामापैकी केवळ १० ते १२ टक्के बांधकाम पुर्ण झाले आहे. कार्य सुरु करण्याचा कार्यकाळ हा अधिक झाल्याने रस्त्याचे बांधकाम एवढेच कसे झाले, बांधकाम संथगतीने का होत आहे, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहे.धुळीमुळे आरोग्यावर परिणामबांधकाम अतिशय कासव गतीने होत असल्याने खोदकाम केलेले जागेत बोल्डर व मुरुम घालण्यात आला आहे. परिणामी वाहनाचे आवागमन सुरु होताच धुरीचे लोट उडत असतात. ही धुर थेट नाकातोंडाद्वारे शरीरात जात आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. वेळीच मातीच्या जागेवर पाणी घालणे गरजेचे असताना बांधकाम करणारी एजन्सी याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक