शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:43 IST

भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देभंडारा - पवनी राज्यमार्ग : आरोग्यावर परिणाम, बांधकामही कासवगतीने

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात सर्वत्र रस्ता बांधकामाचे कार्य जोमात सुरु आहे. त्यात भंडारा- पवनी राज्यमार्गाचा समावेश आहे. या रस्त्याच्या समावेश महामार्गात झाल्यानंतर रस्ता विस्तारीकरणाचा कामालाही प्रारंभ करण्यात आला. जवळपास नऊ महिन्यांपासून रस्ता विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. भंडारा तालुक्यातील आंबाडी ते पवनी तालुक्यातील निलजफाट्यापर्यंतच्या मार्गाचे विस्तारीकरण होत आहे. हा रस्ता सिमेंटचा तयार करण्यात येत आहे. बांधकाम संथगतीने सुरु असल्याने रहदारीला फटका बसत आहे.शेकडो वृक्षांची कत्तलमहामार्गाच्या विस्तारीकरणात रस्ताच दुतर्फा असलेले शेकडो वृक्ष तोडण्यात आली आहेत. यात काही भाग अपवाद आहे. मात्र वृक्षाची कत्तल केल्यानंतर त्यापर्यंतचा भाग मुरुम व बोल्डर टाकून समांतर करण्यात आला आहे. काही भागात हा रस्ता समतल नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हाच मार्ग उमरेड कºहांडला अभयारण्यालाही जोडतो.केवळ दहा टक्के बांधकामआंबाडी ते निलज फाट्यापर्यंतच्या रस्ता बांधकामासाठी दोन्ही बाजुला खोदकाम करण्यात आले. जवळपास ४० किमीचा या रस्ता बांधकामापैकी केवळ १० ते १२ टक्के बांधकाम पुर्ण झाले आहे. कार्य सुरु करण्याचा कार्यकाळ हा अधिक झाल्याने रस्त्याचे बांधकाम एवढेच कसे झाले, बांधकाम संथगतीने का होत आहे, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहे.धुळीमुळे आरोग्यावर परिणामबांधकाम अतिशय कासव गतीने होत असल्याने खोदकाम केलेले जागेत बोल्डर व मुरुम घालण्यात आला आहे. परिणामी वाहनाचे आवागमन सुरु होताच धुरीचे लोट उडत असतात. ही धुर थेट नाकातोंडाद्वारे शरीरात जात आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. वेळीच मातीच्या जागेवर पाणी घालणे गरजेचे असताना बांधकाम करणारी एजन्सी याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक