शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:43 IST

भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देभंडारा - पवनी राज्यमार्ग : आरोग्यावर परिणाम, बांधकामही कासवगतीने

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात सर्वत्र रस्ता बांधकामाचे कार्य जोमात सुरु आहे. त्यात भंडारा- पवनी राज्यमार्गाचा समावेश आहे. या रस्त्याच्या समावेश महामार्गात झाल्यानंतर रस्ता विस्तारीकरणाचा कामालाही प्रारंभ करण्यात आला. जवळपास नऊ महिन्यांपासून रस्ता विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. भंडारा तालुक्यातील आंबाडी ते पवनी तालुक्यातील निलजफाट्यापर्यंतच्या मार्गाचे विस्तारीकरण होत आहे. हा रस्ता सिमेंटचा तयार करण्यात येत आहे. बांधकाम संथगतीने सुरु असल्याने रहदारीला फटका बसत आहे.शेकडो वृक्षांची कत्तलमहामार्गाच्या विस्तारीकरणात रस्ताच दुतर्फा असलेले शेकडो वृक्ष तोडण्यात आली आहेत. यात काही भाग अपवाद आहे. मात्र वृक्षाची कत्तल केल्यानंतर त्यापर्यंतचा भाग मुरुम व बोल्डर टाकून समांतर करण्यात आला आहे. काही भागात हा रस्ता समतल नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हाच मार्ग उमरेड कºहांडला अभयारण्यालाही जोडतो.केवळ दहा टक्के बांधकामआंबाडी ते निलज फाट्यापर्यंतच्या रस्ता बांधकामासाठी दोन्ही बाजुला खोदकाम करण्यात आले. जवळपास ४० किमीचा या रस्ता बांधकामापैकी केवळ १० ते १२ टक्के बांधकाम पुर्ण झाले आहे. कार्य सुरु करण्याचा कार्यकाळ हा अधिक झाल्याने रस्त्याचे बांधकाम एवढेच कसे झाले, बांधकाम संथगतीने का होत आहे, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहे.धुळीमुळे आरोग्यावर परिणामबांधकाम अतिशय कासव गतीने होत असल्याने खोदकाम केलेले जागेत बोल्डर व मुरुम घालण्यात आला आहे. परिणामी वाहनाचे आवागमन सुरु होताच धुरीचे लोट उडत असतात. ही धुर थेट नाकातोंडाद्वारे शरीरात जात आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. वेळीच मातीच्या जागेवर पाणी घालणे गरजेचे असताना बांधकाम करणारी एजन्सी याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक