शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:43 IST

भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देभंडारा - पवनी राज्यमार्ग : आरोग्यावर परिणाम, बांधकामही कासवगतीने

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात सर्वत्र रस्ता बांधकामाचे कार्य जोमात सुरु आहे. त्यात भंडारा- पवनी राज्यमार्गाचा समावेश आहे. या रस्त्याच्या समावेश महामार्गात झाल्यानंतर रस्ता विस्तारीकरणाचा कामालाही प्रारंभ करण्यात आला. जवळपास नऊ महिन्यांपासून रस्ता विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. भंडारा तालुक्यातील आंबाडी ते पवनी तालुक्यातील निलजफाट्यापर्यंतच्या मार्गाचे विस्तारीकरण होत आहे. हा रस्ता सिमेंटचा तयार करण्यात येत आहे. बांधकाम संथगतीने सुरु असल्याने रहदारीला फटका बसत आहे.शेकडो वृक्षांची कत्तलमहामार्गाच्या विस्तारीकरणात रस्ताच दुतर्फा असलेले शेकडो वृक्ष तोडण्यात आली आहेत. यात काही भाग अपवाद आहे. मात्र वृक्षाची कत्तल केल्यानंतर त्यापर्यंतचा भाग मुरुम व बोल्डर टाकून समांतर करण्यात आला आहे. काही भागात हा रस्ता समतल नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हाच मार्ग उमरेड कºहांडला अभयारण्यालाही जोडतो.केवळ दहा टक्के बांधकामआंबाडी ते निलज फाट्यापर्यंतच्या रस्ता बांधकामासाठी दोन्ही बाजुला खोदकाम करण्यात आले. जवळपास ४० किमीचा या रस्ता बांधकामापैकी केवळ १० ते १२ टक्के बांधकाम पुर्ण झाले आहे. कार्य सुरु करण्याचा कार्यकाळ हा अधिक झाल्याने रस्त्याचे बांधकाम एवढेच कसे झाले, बांधकाम संथगतीने का होत आहे, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहे.धुळीमुळे आरोग्यावर परिणामबांधकाम अतिशय कासव गतीने होत असल्याने खोदकाम केलेले जागेत बोल्डर व मुरुम घालण्यात आला आहे. परिणामी वाहनाचे आवागमन सुरु होताच धुरीचे लोट उडत असतात. ही धुर थेट नाकातोंडाद्वारे शरीरात जात आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. वेळीच मातीच्या जागेवर पाणी घालणे गरजेचे असताना बांधकाम करणारी एजन्सी याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक