शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

विकास निधी खर्चात तफावत उघडकीस

By admin | Updated: March 1, 2015 00:36 IST

कवलेवाडा गावात करण्यात आलेल्या विविध विकास कामात निधी खर्चात तफावत आढळून आली आहे. सिमेंट रस्ता, नालीचे बांधकाम निकृष्ठ करण्यात आले...

चुल्हाड (सिहोरा) : कवलेवाडा गावात करण्यात आलेल्या विविध विकास कामात निधी खर्चात तफावत आढळून आली आहे. सिमेंट रस्ता, नालीचे बांधकाम निकृष्ठ करण्यात आले असून राहयो निधीचा बोजवारा वाजविण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. चौकशीच्या मागणीवरून सदस्यांनी आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे.बावनथडी नदी काठावर असलेल्या २ हजार लोकवस्तीच्या कवलेवाडा गावात विकास कामात निधी खर्च करताना हयगय करण्यात आली असून, या कामाची गुणवत्ता नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. सन २०१३-१४ या सत्राच्या कालावधीत करण्यात आलेल्या विकास कामाची चौकशी करण्याची ओरड गावात सुरू झाली आहे. या गावात रोहयो अंतर्गत पतीराम उमरे ते सदाशिव बोरकर आणि मडगू गहाने ते गाव तलाव पर्यंत कुशल कामे करण्यात आली आहे. पांदन रस्त्याच्या कामात अल्प मुरूम घालण्यात आलेला असून रोलरचा उपयोग करण्यात आलेला नाही. या कामावर फक्त ५ मजूरांनी काम केले असून ५८ मजुरांच्या नावे २ लाख ८१ हजार रूपयाची उचल करण्यात आली आहे. रोजगार सेवक हे ग्रामपंचायतचे सदस्य असून पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नोंद मजुरांच्या यादीत करण्यात आली आहे. या कामाचे माहिती फलक लावण्यात आले नाही. वर्षभरातच या पांदन रस्त्यावरील मुरूम गायब झाल्याचे चित्र आहे.या गावात २०१३-१४ या कालावधीत दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत ३ लाख २५ हजार खर्चाची नाली बांधकाम करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रभुदास जनबंधू ते उदाराम तांडेकर असे नाली बांधकामाचे स्वरूप आहे. परंतु प्रत्यक्षात दस्तऐवजाच्या नोंदीनुसार या नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. याशिवाय जुन्याच नालीची नोंद यात करण्यात आली आहे. मात्र देयकांची उचल करण्यात आली आहे. या गावात आंबेडकर चौक ते पाणी टाकी पर्यंत गेल्या वर्षात ४ लाख ७८ हजार ७०४ खर्चून सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. रस्ता बांधकामात गुणवत्ता नसल्याने हा रस्ता उखडला आहे. वर्ष भरातच रस्ता उखडल्याने निकृष्ठ बांधकाम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद राजस्व निधी अंतर्गत पशु दवाखाना आवारात ४ लाख ९३ हजार रूपये खर्चून आवारभिंत तथा सपाटी करणाचे कामे करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात मुरूमाचा लालीपॉप देण्यात आलेला आहे. सपाटीकरणाच्या नियोजनात दिशाभूल करण्यात आली आहे. या गावचे सामाजिक कार्यकर्ते दुर्गा अग्रवाल यांनी ग्राम पंचायत माहिती अधिकारातून माहिती मागितली असता ही बाब निदर्शनास आली आहे. माहिती देताना प्रत्यक्षात ६२ पानाचे राशी वसूल करण्यात आली असून ४८ पानाची माहिती देण्यात आली आहे. उर्वरित पानात आलबेल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.विकास कामात निधी खर्चात तफावत असल्याच्या कारणावरून ग्राम पंचायत सदस्य सुभाष सोनवाने यांनी चौकशीची मागणी केली आहे. ९ सदस्यीय या ग्रामपंचायतमध्ये सदस्यांना विरणसात घेतले जात असे आरोप होत आहेत. यामुळे ग्रामपंचायतमध्ये वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी सरपंच वैशाली नंदेश्वर यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधले असता नॉट रिचेबल होते. यामुळे संपर्क होवू शकला नाही. (वार्ताहर)