शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

पंतप्रधान निवारा योजनेच्या यादीतून गरजू लाभार्थ्यांना वगळले

By admin | Updated: June 14, 2016 00:22 IST

पंतप्रधान निवारा योजनेंतर्गत २०११ ला सर्वे करण्यात आले होते. ती यादी तालुका महसूल प्रशासनाकडे सादर झाली आहे.

चौकशीची मागणी : यादीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेशपालोरा : पंतप्रधान निवारा योजनेंतर्गत २०११ ला सर्वे करण्यात आले होते. ती यादी तालुका महसूल प्रशासनाकडे सादर झाली आहे. या यादीमध्ये अनेक त्रुट्या असून, गरजू लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावे अशी मागणी जनतेनी केली आहे.दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळण्याकरिता शासनाकडून अनेक योजनेद्वारे घरकुल दिल्या होते. २००२ च्या बीपीएल यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गरजू लोकांना वगळून धनाढ्य लोकांचे नाव समाविष्ठ करण्यात आले होते. त्यामुळे अनेक गरजू कुटूंब शासनाच्या अनेक योजनेपासून वंचित होते. मात्र अजूनपर्यंत नव्याने बीपीएल यादी मंजूर न झाल्यामुळे नव्याने यादी केव्हा प्रकाशित होणार म्हणून जनता प्रतीक्षेत आहेत. गत सन २०११ ला दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटूंबाचे सर्वे करण्यात आले होते. यात जि.प. शिक्षक व संगणक परिचराचा समावेश होता. मागील महिन्यात पंतप्रधान निवारा योजनेच्या नावाने ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्याकडे पक्के घर, शेती आहे. ज्यांना पुर्वी इंदिरा आवास योजना, रमाबाई योजना अशा अनेक योजनेचा लाभ मिळाला आहे. अशा लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट आहेत. जे लाभार्थी स्वर्गवासी झाले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी सर्वे केले आहेत. यांना गरजू लाभार्थी दिसले नाहीत का? असा प्रश्न पुढे येत आहे. ज्या लाभार्थ्यांकडे पक्के घर आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना अशा योजनेचा लाभ मिळाला आहे. अशा लाभार्थ्यांचे नाव कमी करण्याचा शासनाने आदेश दिले आहेत. मात्र जे लाभार्थी गरजू आहेत ज्या लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करण्याचे आदेश दिले गेले नसल्यामुळे गरजू कुटुंबांना पक्के घर बाधायला मिळेल किवा नाही, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. मागील २० वर्षापुर्वी इंदिरा आवस योजनेंतर्गत ४२ हजारांचा धनादेश दिला जात होता. इतक्या रकमेत घर होत नसल्यामुळे कसेबसे कवेलूचे घर तयार केले होते. सध्याला धनादेशात वाढ झाल्यामुळे पक्के घर ते लाभार्थी बांधू शकतात. अशा लाभार्थ्यांना पंतप्रधान निवारा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी २०११ याबाबत सर्वे केले होते. त्यांनी हा सर्वे घरी बसून केल्याचे दिसून येत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी व गरजू कुटुंबाचे सर्वे करुन लाभ देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य मनोरमा जांबुळे यांनी केली आहे. (वार्ताहर)