शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

पंतप्रधान निवारा योजनेच्या यादीतून गरजू लाभार्थ्यांना वगळले

By admin | Updated: June 14, 2016 00:22 IST

पंतप्रधान निवारा योजनेंतर्गत २०११ ला सर्वे करण्यात आले होते. ती यादी तालुका महसूल प्रशासनाकडे सादर झाली आहे.

चौकशीची मागणी : यादीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेशपालोरा : पंतप्रधान निवारा योजनेंतर्गत २०११ ला सर्वे करण्यात आले होते. ती यादी तालुका महसूल प्रशासनाकडे सादर झाली आहे. या यादीमध्ये अनेक त्रुट्या असून, गरजू लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावे अशी मागणी जनतेनी केली आहे.दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळण्याकरिता शासनाकडून अनेक योजनेद्वारे घरकुल दिल्या होते. २००२ च्या बीपीएल यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गरजू लोकांना वगळून धनाढ्य लोकांचे नाव समाविष्ठ करण्यात आले होते. त्यामुळे अनेक गरजू कुटूंब शासनाच्या अनेक योजनेपासून वंचित होते. मात्र अजूनपर्यंत नव्याने बीपीएल यादी मंजूर न झाल्यामुळे नव्याने यादी केव्हा प्रकाशित होणार म्हणून जनता प्रतीक्षेत आहेत. गत सन २०११ ला दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटूंबाचे सर्वे करण्यात आले होते. यात जि.प. शिक्षक व संगणक परिचराचा समावेश होता. मागील महिन्यात पंतप्रधान निवारा योजनेच्या नावाने ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्याकडे पक्के घर, शेती आहे. ज्यांना पुर्वी इंदिरा आवास योजना, रमाबाई योजना अशा अनेक योजनेचा लाभ मिळाला आहे. अशा लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट आहेत. जे लाभार्थी स्वर्गवासी झाले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी सर्वे केले आहेत. यांना गरजू लाभार्थी दिसले नाहीत का? असा प्रश्न पुढे येत आहे. ज्या लाभार्थ्यांकडे पक्के घर आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना अशा योजनेचा लाभ मिळाला आहे. अशा लाभार्थ्यांचे नाव कमी करण्याचा शासनाने आदेश दिले आहेत. मात्र जे लाभार्थी गरजू आहेत ज्या लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करण्याचे आदेश दिले गेले नसल्यामुळे गरजू कुटुंबांना पक्के घर बाधायला मिळेल किवा नाही, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. मागील २० वर्षापुर्वी इंदिरा आवस योजनेंतर्गत ४२ हजारांचा धनादेश दिला जात होता. इतक्या रकमेत घर होत नसल्यामुळे कसेबसे कवेलूचे घर तयार केले होते. सध्याला धनादेशात वाढ झाल्यामुळे पक्के घर ते लाभार्थी बांधू शकतात. अशा लाभार्थ्यांना पंतप्रधान निवारा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी २०११ याबाबत सर्वे केले होते. त्यांनी हा सर्वे घरी बसून केल्याचे दिसून येत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी व गरजू कुटुंबाचे सर्वे करुन लाभ देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य मनोरमा जांबुळे यांनी केली आहे. (वार्ताहर)