शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर तब्बल तासभर दमदार पाऊस कोसळला. पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनीमध्ये १३०.४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ ते १६ जूनपर्यंत २२५.७ मिमी पाऊस कोसळला आहे. तर लाखनी तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस कोसळला असून १५ दिवसात २४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे२४ तासात ५०.१ मिमी पाऊस : १५ दिवसात १७७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मान्सून सक्रीय झाल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला असून २४ तासात जिल्ह्यात ५०.१ मिमी पावसाची नोंद झाली. पवनी आणि लाखनी या दोन तालुक्यांसह सात मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतकरी सुखावला असून पऱ्हे टाकण्याच्या कामाला वेग आला आहे.सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर तब्बल तासभर दमदार पाऊस कोसळला. पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनीमध्ये १३०.४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ ते १६ जूनपर्यंत २२५.७ मिमी पाऊस कोसळला आहे. तर लाखनी तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस कोसळला असून १५ दिवसात २४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा तालुक्यात गत २४ तासात ४७ मिमी, मोहाडी १५.१ मिमी, तुमसर २३.३ मिमी, साकोली ४०.२ मिमी, लाखांदूर २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा तालुक्यातील शहापूर मंडळात ८५ मिमी, बेला ७२ मिमी, पवनी तालुक्याच्या आमगावमध्ये ११२.३ मिमी, साकोलीच्या एकोडी मंडळात ७२ मिमी, लाखांदूर तालुक्याच्या बारव्हा मंडळात ६८.८ मिमी,मासळ ७८.४ मिमी, लाखनी तालुक्याच्या पोहरा मंडळात १०४.२ मिमी पावसाची नोंद झाली असून या मंडळात अतिवृष्टी झाली आहे.दमदार पावसाने शेतीच्या कामाला वेग आला असून शेतात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. पºहे टाकणी सुरु झाली असून आणखी दमदार पाऊस झाल्यानंतर आगामी काळात रोवणीला सुरुवात होणार आहे. मृग नक्षत्रातील पावसाने शेतकरी सुखावला असला तरी आणखी दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.पऱ्हे टाकण्याच्या कामाला आला वेगजिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर मंगळवारी शेत शिवारात शेतकरी व शेतमजूरांची लगबग दिसत होती. पºहे टाकण्याच्या कामाला वेग आल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वदूर दिसत होते. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यापुर्वीच पऱ्हे टाकले होते. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाला. गत काही वर्षांपासून पाऊस दगा देत असल्याने शेतकरी यावर्षीही विचारपूर्वक रोवणी करण्याच्या मानसिकतेत आहेत. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकरी रोवणी करणार आहे. यावर्षी एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस