शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

दोन तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर तब्बल तासभर दमदार पाऊस कोसळला. पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनीमध्ये १३०.४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ ते १६ जूनपर्यंत २२५.७ मिमी पाऊस कोसळला आहे. तर लाखनी तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस कोसळला असून १५ दिवसात २४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे२४ तासात ५०.१ मिमी पाऊस : १५ दिवसात १७७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मान्सून सक्रीय झाल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला असून २४ तासात जिल्ह्यात ५०.१ मिमी पावसाची नोंद झाली. पवनी आणि लाखनी या दोन तालुक्यांसह सात मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतकरी सुखावला असून पऱ्हे टाकण्याच्या कामाला वेग आला आहे.सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर तब्बल तासभर दमदार पाऊस कोसळला. पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनीमध्ये १३०.४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ ते १६ जूनपर्यंत २२५.७ मिमी पाऊस कोसळला आहे. तर लाखनी तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस कोसळला असून १५ दिवसात २४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा तालुक्यात गत २४ तासात ४७ मिमी, मोहाडी १५.१ मिमी, तुमसर २३.३ मिमी, साकोली ४०.२ मिमी, लाखांदूर २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा तालुक्यातील शहापूर मंडळात ८५ मिमी, बेला ७२ मिमी, पवनी तालुक्याच्या आमगावमध्ये ११२.३ मिमी, साकोलीच्या एकोडी मंडळात ७२ मिमी, लाखांदूर तालुक्याच्या बारव्हा मंडळात ६८.८ मिमी,मासळ ७८.४ मिमी, लाखनी तालुक्याच्या पोहरा मंडळात १०४.२ मिमी पावसाची नोंद झाली असून या मंडळात अतिवृष्टी झाली आहे.दमदार पावसाने शेतीच्या कामाला वेग आला असून शेतात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. पºहे टाकणी सुरु झाली असून आणखी दमदार पाऊस झाल्यानंतर आगामी काळात रोवणीला सुरुवात होणार आहे. मृग नक्षत्रातील पावसाने शेतकरी सुखावला असला तरी आणखी दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.पऱ्हे टाकण्याच्या कामाला आला वेगजिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर मंगळवारी शेत शिवारात शेतकरी व शेतमजूरांची लगबग दिसत होती. पºहे टाकण्याच्या कामाला वेग आल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वदूर दिसत होते. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यापुर्वीच पऱ्हे टाकले होते. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाला. गत काही वर्षांपासून पाऊस दगा देत असल्याने शेतकरी यावर्षीही विचारपूर्वक रोवणी करण्याच्या मानसिकतेत आहेत. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकरी रोवणी करणार आहे. यावर्षी एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस