शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

जिल्ह्यातील ३४ पैकी २४ महसूल मंडलांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत जाेरदार पाऊस बरसला. या पावसाचा फटका अनेक घरांना बसला. माेहाडी तालुक्यातील नऊ घरांचे अंशत: नुकसान झाले. त्यात माेहाडी येथील तीन, कान्हळगाव दाेन, वरठी दाेन व करडी येथील दाेन घरांचा समावेश आहे, तर चार घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, माेहाडी, आंधळगाव, वरठी आणि करडी येथील प्रत्येकी एका घराचा समावेश आहे, तर पारडी येथे वीज काेसळून दाेन म्हैशी ठार झाल्या.

ठळक मुद्दे२४ तासांत ९४.१ मिमी पाऊस : चार घरांचे पूर्णत: तर ४८ घरांचे अंशत: नुकसान

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहा दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस काेसळला असून, जिल्ह्यातील ३४ पैकी २४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नाेंद घेण्यात आली आहे. या पावसाने चार घरांचे पूर्णत:, तर ४८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. गत २४ तासांत ९४.१ मिमी पावसाची नाेंद झाली असून, सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात १६८.२ मिमी नाेंदविण्यात आला आहे. या पावसाने खाेळंबलेल्या पेरणीच्या कामाला वेग आला असून, शुक्रवारी शेत शिवारात पेरणीची लगबग दिसत हाेती. जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत जाेरदार पाऊस बरसला. या पावसाचा फटका अनेक घरांना बसला. माेहाडी तालुक्यातील नऊ घरांचे अंशत: नुकसान झाले. त्यात माेहाडी येथील तीन, कान्हळगाव दाेन, वरठी दाेन व करडी येथील दाेन घरांचा समावेश आहे, तर चार घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, माेहाडी, आंधळगाव, वरठी आणि करडी येथील प्रत्येकी एका घराचा समावेश आहे, तर पारडी येथे वीज काेसळून दाेन म्हैशी ठार झाल्या. साकाेली तालुक्यातील आमगाव बूज येथील नूरइस्माईल दुधकनाेज यांच्या घरातील विजेमुळे ५५ हजार रुपयांच्या इलेक्ट्राॅनिक साहित्याचे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील लाखनी, किन्ही, साेनेखारी येथे प्रत्येकी एका घराचे, तर लाखांदूर येथील ३६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एका गाेठ्याचीही पडझड झाली आहे. भंडारा, पवनी आणि तुमसर तालुक्यात नुकसानीची माहिती नाही.संततधार काेसळलेल्या या पावसाने भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नाेंद करण्यात आली. पाच तालुक्यांतील ३४ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. माेहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर व लाखनी या तालुक्यांत अतिवृष्टीची नाेंद घेण्यात आली. गत २४ तासांत भंडारा तालुक्यात ५१.३ मिमी, माेहाडी १००.५ मिमी, तुमसर ८४ मिमी, पवनी ९०.२ मिमी, साकाेली ५६.२ मिमी, लाखांदूर १०८ मिमी आणि सर्वाधिक लाखनी तालुक्यात १६८.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१३ मिमी पावसाची नाेंद झाली असून, ती आतापर्यंत काेसळणाऱ्या पावसाच्या सरासरी १२८ टक्के आहे. 

शेतशिवारात पेरणीची लगबग- पावसाअभावी खाेळंबलेल्या पेरणीला गुरुवारी झालेल्या पावसाने गती आली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस काेसळल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. शुक्रवारी शेतशिवारात मजुरांची लगबग दिसत हाेती. विशेष म्हणजे शुक्रवारी ऊन पडल्याने पेरणीच्या कामाला वेग आला हाेता. सर्वत्र पेरणी सुरू असल्याचे चित्र दिसत हाेते. तसेच या पावसाने नदी-नाले खळखळून वाहायला लागले आहेत.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती