शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

खोदलेला रस्ता उठला जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:55 IST

शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता गत वीस दिवसांपासून खोदून आहे. अरुंद रस्त्यावरुन अहोरात्र वाहतुक सुरु असते. या मार्गावर होणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीसोबतच अपघात घडत आहेत. जणू जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक हा रस्ता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. या रस्त्याच्या कामाला केव्हा सुरुवात होणार याबाबत संभ्रम आहे. एखादा मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहे.

ठळक मुद्देवीस दिवसांपासून कामबंद : जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता गत वीस दिवसांपासून खोदून आहे. अरुंद रस्त्यावरुन अहोरात्र वाहतुक सुरु असते. या मार्गावर होणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीसोबतच अपघात घडत आहेत. जणू जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक हा रस्ता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. या रस्त्याच्या कामाला केव्हा सुरुवात होणार याबाबत संभ्रम आहे. एखादा मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहे.भंडारा ते रामटेक या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्याअंतर्गत भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक ते खात रोड या रस्त्याचे दुपद्रीकरण केले जात आहे. जिल्हा परिषद चौकात १४ नोव्हेंबर रोजी या रस्त्याच्या खोदकामाला प्रारंभ झाला. तीन दिवसात मशीनच्या सहाय्याने साई मंदिरपर्यंत या रस्त्याचे एका बाजुला खोदकाम करण्यात आले. रस्ता वेगाने होत असतांना नगर परिषदेने प्रशासनाला पत्र देवून या रस्त्याचे बांधकाम १७ नोव्हेंबरपासून थांबविण्यात आले. तेव्हापासून अद्यापही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. संपुर्ण रस्ता एका बाजुला खोदून असून त्या रस्त्यालगत बॅरीकेट्स लावण्यात आले आहे.जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. याच रस्त्यावर शहरातील विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते. यातच राष्टÑीय महामार्गावरुन तुमसरकडे जाणारा हा राज्य मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर एसटी बसेससह अवजड वाहनेही धावत असतात. मात्र रस्ता एकेरी वाहतुकीचा झाल्याने वाहनांची कोंडी होते. दोन मोठी वाहने परस्पर विरुध्द दिशेने आली तर वाहतुक कोंडी होवून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा या रस्त्यावर अपघातही झाले आहेत.अपघातासोबतच या परिसरात असलेल्या नागरिकांना खोदलेल्या रस्त्याच्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांच्या घरासमोर खोदकाम झाले त्यांना आपल्या घरात जानेही कठीण झाले आहे. तर दुसºया बाजुच्या नागरिकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरुन आता राजकारणही सुरु झाले आहे. रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु करावे यामागणीसह राष्टÑवादीसह विविध पक्षांनी आंदोलनात्मक भुमिका घेतली. राष्टÑवादीने तर जिल्हा कचेरीवर मोर्चा नेला. परंतु अद्यापपर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. आता या रस्त्याचे काम केव्हा सुरु होणार हा महत्वाचा प्रश्न आहे. रस्त्याचे काम होईपर्यंत भंडारा शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. यातून त्यांची रस्ता झाल्यावरच सुटका होईल.जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवाजिल्हा परिषद ते खात रोड या मार्गावरुन अवजड वाहतुक होत आहे. मात्र खोदलेल्या रस्त्यामुळे अपघात होण्याची भिती आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जड वाहतुक दुसºया मार्गाने वळवावी अशी मागणी आहे. या रस्त्यावरुन टिप्पर, बसेस, ट्रक, ट्रॅक्टर जातात. त्यांना या रस्त्याचे काम पुर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक ते तुमसर रोड अशी वाहतुक वळवावी अशी मागणी जिल्हा युवक काँग्रसचे माजी अध्यक्ष प्रसन्न चकोले यांनी केली आहे.आज बैठकमहामार्गा प्राधिकरण आणि नगरपरिषद यांच्यात या रस्त्याच्या संदर्भात ६ डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर परिषदेने विविध विकास कामांचा मुद्दा पुढे करुन पत्र दिले होते. त्यावरुन काम थांबविण्या आले. बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.