शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

ईव्हीएम व्हीव्हीपॅट जागृतीमधून पारदर्शक यंत्रणेचा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:46 IST

मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी अन्य देशातील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागला. विशेषत: महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी झगडावे लागले. मात्र आपल्या देशातील नागरिकांना मतदानाचा हक्क घटनेनेच प्रदान केला आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेतली असून यातून निवडणूक यंत्रणा व अधिकाऱ्यांच्या पारदर्शक कार्यप्रणालीचा प्रत्यय येत असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंजय देशमुख : निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक विभागातर्फे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी अन्य देशातील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागला. विशेषत: महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी झगडावे लागले. मात्र आपल्या देशातील नागरिकांना मतदानाचा हक्क घटनेनेच प्रदान केला आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेतली असून यातून निवडणूक यंत्रणा व अधिकाऱ्यांच्या पारदर्शक कार्यप्रणालीचा प्रत्यय येत असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीने जिल्हा भर राबविण्यात येणाऱ्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अपर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, मंजुषा दांडगे, सुभाष चौधरी, अभिमन्यू बोधवळ उपस्थित होते. न्या.देशमुख म्हणाले, लोकशाही ही आपली शाई असून ती आपल्याला टिकवायची आहे.काळाबरोबर सर्वच क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. निवडणूक आयोगानेसुद्धा आपल्या यंत्रणेत अधिक पारदर्शकता यावी म्हणून ईव्हीएम व्हीव्हीपॅटचा अवलंब केला आहे. ही यंत्रणा सामान्य मतदारांना समजावी तसेच वापरता यावी यासाठी हाती घेतलेली जनजागृती मोहीम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे सादरीकरण केले. नव्या यंत्राचा वापर येणाºया निवडणुकीत सर्वच मतदान केंद्रावर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्या. संजय देशमुख यांनी मॉक पोल करून व्हीव्हीपॅट मशीनवर समाधान व्यक्त केले.चित्ररथाला हिरवी झेंडीनिवडणूक विभागातील तयार करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला न्या. संजय देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. हा चित्ररथ प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात जावून ईव्हीएम व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांना माहिती देणार आहे. तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणार आहे.