शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक समतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे

By admin | Updated: June 28, 2015 00:53 IST

समाजाच्या सर्व स्तरात सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक समता प्रस्थापित करण्यासाठी, सवार्ना समान संधी व हक्क ....

सामाजिक न्याय दिन : राजेंद्र निंबाळकर यांचे प्रतिपादनभंडारा : समाजाच्या सर्व स्तरात सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक समता प्रस्थापित करण्यासाठी, सवार्ना समान संधी व हक्क मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे  पार पाडली तरच छत्रपती शाहु महाराजांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले.सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वीज वितरणचे अधीक्षक अभियंता एस.एस. मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए.आर. रामटेके उपस्थित होते. शाहू महाराजांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सहकार, क्रीडा या सर्वच क्षेत्रात भरीव काम केले. पुरोगामी  महाराष्ट्राची जडण- घडण होण्यात त्यांचे विचार आणि कार्याचा मोठा वाटा आहे. त्यांचे विचार कृतीत आणणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले. यावेळी मेश्राम म्हणाले, एक राजा असूनही शाहू महाराजांना जातीभेदाचा सामना करावा लागला होता.  सामान्य माणसाला याचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांच्या संस्थानात त्यांनी जातीभेदाला थारा दिला नाही. सर्वांना समान संधी आणि न्याय  मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य झिजविले.  अशा या कल्याणकारी राजाचे विचार आजही अंगिकारणे गरजेचे आहे. यावेळी वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या आणि दहावी व बारावी परीक्षेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.  जिल्ह्यात  २०१४-१५ मध्ये १७६ जोडप्यांनी  आंतरजातीय विवाह केला. यातील काही जोडप्यांचा  ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. राजेदहेगाव येथील निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि माविमच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंभोरकर यांनी अनुसूचित जातीच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचविल्या. त्यानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)