शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सर्वांनी भगवंताचे नामस्मरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST

लाखनी तालुक्याच्या खुनारी-खराशी येथे आयोजित भागवत सप्ताहात ते कथेचे निरुपण करताना बोलत होते. माणसाला आयुष्य कमी आहे. यामुळे भगवंताचे ...

लाखनी तालुक्याच्या खुनारी-खराशी येथे आयोजित भागवत सप्ताहात ते कथेचे निरुपण करताना बोलत होते. माणसाला आयुष्य कमी आहे. यामुळे भगवंताचे नामस्मरण करावे. या जगात हात फक्त माणसाला आहेत. स्नान केल्याने शरीर सुंदर होते, मन हे नामानेसुद्धा होते, चित्त हे ज्ञानाने शुद्ध होते, धन हे दानाने शुद्ध होते, यामुळे दान करावे, याचबरोबर माणसाला काम, क्रोध, मद, मत्सर घालवायचे असेल तर भजन करावे. संत तुकाराम महाराजांनी गाथा ही मनुष्यासाठी लिहिली आहे. हात, बोलणे, हसणे, आनंद, लज्जा, स्मरण, विचार, बुद्धी असे मनुष्याला मिळालेली देणगी आहे. पुण्य, कर्म हाच देव आहे, असे त्यांनी सांगितले.

खुनारी-खराशी येथे हनुमान मंदिर देवस्थानात सुरू असलेल्या अखंड हरिनाम भागवत सप्ताहात रामदास बिसेन महाराज आपल्या अमृततुल्य वाणीतून गावकऱ्यांना प्रबोधन करीत आहेत. दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ५ वाजता काकड आरती नंतर रामधून, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ सुरू आहे. भागवत सप्ताहात खुनारी खराशी परिसरातील भजनी मंडळ आपल्या संचासह उपस्थिती लावत आहेत.