शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कृषीपंपांना मिळणार १६ तास वीज

By admin | Updated: March 3, 2017 00:42 IST

जिल्ह्यात कृषी पंपासाठी फक्त आठ तास विद्युत पुरवठा मिळत होता व १६ तासांचे भारनियमन होते.

मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश : नाना पटोले, बाळा काशीवार यांचा पाठपुरावासाकोली : जिल्ह्यात कृषी पंपासाठी फक्त आठ तास विद्युत पुरवठा मिळत होता व १६ तासांचे भारनियमन होते. या भारनियमनाच्या विरोधात साकोली येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत आमदार बाळा काशीवार यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन भारनियमनाचा प्रश्न सोडविला. आता कृषी पंपांसाठी १६ तास विद्युत पुरवठा मिळणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे आ. बाळा काशीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भंडारा जिल्ह्यात कृषीपंपासाठी १६ तासाचे भारनियमन सुरू करण्यात आले होते. या भारनियमनामुळे उन्हाळी धानपिक धोक्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी तर धानाचे पऱ्हे भरले मात्र आठ तासाच्या पाण्यामुळे पिक वापणार नाही म्हणून पऱ्हे तसेच ठेवले. अखेर साकोली येथे शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर मागील आठवड्यापासून आमरण उपोषणाला सुरवात केली. या उपोषण मंडपाला आ. बाळा काशीवार यांनी भेट देवून भारनियमन कमी करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार आमदार बाळा काशीवार हे तातडीने मुंबई येथे रवाना झाले व खा. नाना पटोले यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून जिल्ह्याची शेतकऱ्यांची ज्वलंत समस्या सांगितली. यावर मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी १६ तास सुरू असलेले भारनियम कमी करून कृषीपंपांसाठी १६ तास विद्युत पुरवठा करा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या आदेशाची अंमलबजावणी येत्या एक दोन दिवसात होणार असल्याचीही माहिती आ. काशीवार यांनी लोकमतला दिली. त्यामुळे खा. नाना पटोले व आ. काशीवार यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)