शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

अखेर कृषीपंपांना मिळणार १६ तास वीज

By admin | Updated: March 3, 2017 00:42 IST

जिल्ह्यात कृषी पंपासाठी फक्त आठ तास विद्युत पुरवठा मिळत होता व १६ तासांचे भारनियमन होते.

मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश : नाना पटोले, बाळा काशीवार यांचा पाठपुरावासाकोली : जिल्ह्यात कृषी पंपासाठी फक्त आठ तास विद्युत पुरवठा मिळत होता व १६ तासांचे भारनियमन होते. या भारनियमनाच्या विरोधात साकोली येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत आमदार बाळा काशीवार यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन भारनियमनाचा प्रश्न सोडविला. आता कृषी पंपांसाठी १६ तास विद्युत पुरवठा मिळणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे आ. बाळा काशीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भंडारा जिल्ह्यात कृषीपंपासाठी १६ तासाचे भारनियमन सुरू करण्यात आले होते. या भारनियमनामुळे उन्हाळी धानपिक धोक्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी तर धानाचे पऱ्हे भरले मात्र आठ तासाच्या पाण्यामुळे पिक वापणार नाही म्हणून पऱ्हे तसेच ठेवले. अखेर साकोली येथे शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर मागील आठवड्यापासून आमरण उपोषणाला सुरवात केली. या उपोषण मंडपाला आ. बाळा काशीवार यांनी भेट देवून भारनियमन कमी करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार आमदार बाळा काशीवार हे तातडीने मुंबई येथे रवाना झाले व खा. नाना पटोले यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून जिल्ह्याची शेतकऱ्यांची ज्वलंत समस्या सांगितली. यावर मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी १६ तास सुरू असलेले भारनियम कमी करून कृषीपंपांसाठी १६ तास विद्युत पुरवठा करा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या आदेशाची अंमलबजावणी येत्या एक दोन दिवसात होणार असल्याचीही माहिती आ. काशीवार यांनी लोकमतला दिली. त्यामुळे खा. नाना पटोले व आ. काशीवार यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)