शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सायंकाळ होताच भरते मद्यपींची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

महात्मा गांधी चौक परिसर, मेंढा, वैनगंगा नदीघाट, शुक्रवारी भागात मोठ्या प्रमाणात दारुची अवैध वाहतुकीसह विक्री होत आहे. खुलेआम होत असलेल्या या दारु विक्रीला अभय नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून दारु पिणाऱ्यांना कुणाचेही भय नसल्याचे या प्रकारावरुन दिसून येते. शास्त्रीचौकासह भंडारा शहरातील मुख्य चौकांमध्ये हा प्रकार गत काहि महिण्यांपासून राजरोसपणे सुरु असताना पोलीसांच्या दुर्लक्षामुळे याचा त्रास तरुणींसह महिलांना होत आहे.

ठळक मुद्देमहिला असुरक्षित : भंडारा शहरातील प्रकार, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

न्यूज नेटवर्कभंडारा : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून दारुची अवैध विक्री करणाऱ्यांनी शहरात हैदोस घातला आहे. भंडारा शहरातील मुख्य सार्वजनिक ठिकाणी सायंकाळ होताच मद्यपींची जत्राच भरत असल्याचे चित्र आहे. अर्थातच यासाठी पोलिसांचे पाठबळ लाभत असल्याची शहरात चर्चा आहे.शहरातील शास्त्री चौक परिसर, दसरा मैदान, गणेशपूर मार्ग, मिशन शाळा परिसर, मुस्लिम लायब्ररी चौक, महात्मा गांधी चौक परिसर, मेंढा, वैनगंगा नदीघाट, शुक्रवारी भागात मोठ्या प्रमाणात दारुची अवैध वाहतुकीसह विक्री होत आहे. खुलेआम होत असलेल्या या दारु विक्रीला अभय नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.रस्त्याच्या कडेला उभे राहून दारु पिणाऱ्यांना कुणाचेही भय नसल्याचे या प्रकारावरुन दिसून येते. शास्त्रीचौकासह भंडारा शहरातील मुख्य चौकांमध्ये हा प्रकार गत काहि महिण्यांपासून राजरोसपणे सुरु असताना पोलीसांच्या दुर्लक्षामुळे याचा त्रास तरुणींसह महिलांना होत आहे. पोलीस मात्र या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.रस्त्यावर उभे राहून मद्य प्राशन केले जात असल्याने रस्त्याने जावे तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी सामाजिक संतुलन बिघडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याबाबत पोलिसांना माहिती असूनही कानाडोळा केला जात असल्याने संशयाच्या भुवया उंचावल्या जात आहेत.मोठा बाजार परिसरातही दारु विक्रीशहरातील हृदयस्थळी वसलेल्या मोठा बाजार परिसरातही दारुची विक्री होत असल्याचे खुलेआम चित्र आहे. विशेष म्हणजे मद्यपींना विशेष सुविधाही दिली जाते. दारु पिण्यासाठी लागणाºया चकन्यासह ग्लास, थंड पाण्याची बॉटल याचीही तिथे सुविधा असते. बहुतांशपणे मद्यप्राशन करणारे दारु सोबतच घेऊन येतात. दारु प्यायल्यानंतर शिवीगाळ करणे, जोरजोरात बोलणे असा प्रकारही घडत असतो. मात्र वेळीच परिस्थिती सांभाळून घेत पोलिसांसोबतही सेटींग केली जाते. या परिस्थितीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जातीने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.

टॅग्स :Socialसामाजिक