शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

यंदाही सर्वसाधारण धानाच्या वाणालाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. तब्बल एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तीन वर्षापूर्वी उच्च प्रतीचा धान लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल होता. केशर, चिन्नोर यासह नामवंत तांदूळ येथे पिकविला जायचा. भंडाराच्या तांदळाला विदर्भातच नव्हे तर संपूर्ण देशात मागणी होती. अत्यंत बारीक आणि खाण्यास मऊ अशी या तांदळाची ओळख आहे.

ठळक मुद्देबियाण्यांची चाचपणी : कमी कालावधी आणि दरातील अल्प तफावतीने पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण राज्यात दर्जेदार तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षापासून सर्वसाधारण वाणाच्या (जाड) धान लागवडीकडे वळला असून यंदाही सर्वाधिक लागवड सर्वसाधारण धानाची होण्याचे संकेत आहे. कमी कालावधीत येणारे उत्पन्न आणि उच्च प्रतीच्या व सर्वसाधारण प्रतीच्या धानाच्या किमतीत अत्यल्प तफावत असल्याने शेतकरी सर्वसाधारण प्रतीचाच धान लावत आहे. केवळ घरी खाण्यापुरताच उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली जात आहे. कृषी केंद्रातही सर्वसाधारण ग्रेडच्या बियाण्यालाच शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे.भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. तब्बल एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तीन वर्षापूर्वी उच्च प्रतीचा धान लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल होता. केशर, चिन्नोर यासह नामवंत तांदूळ येथे पिकविला जायचा. भंडाराच्या तांदळाला विदर्भातच नव्हे तर संपूर्ण देशात मागणी होती. अत्यंत बारीक आणि खाण्यास मऊ अशी या तांदळाची ओळख आहे. मात्र गत तीन वर्षांपासून शेतकऱ्यांनी सर्वसाधारण प्रतीचा धान लागवडीस प्रारंभ केला. उच्च प्रतीचा धानाला आधारभूत केंद्रावर योग्य भाव मिळत नाही. खासगी व्यापाऱ्यांना तांदूळ विकावा तर योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे सहा - सहा महिने शेतकऱ्यांच्या घरी तांदूळ पडून राहत होता. दुसरीकडे गत काही वर्षात आधारभूत केंद्रावर धान विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अ ग्रेडच्या धानाची आधारभूत किंमत १८३५ आणि सर्वसाधारण धानाची आधारभूत किंमत १८१५ रुपये आहे. अत्यल्प तफावतीने शेतकरी आता सर्वसाधारण धान पेरण्याकडे वळला आहे. अनेकदा तर आधारभूत खरेदी केंद्रावर उच्च प्रतीचा धानही सर्वसाधारण धान म्हणूनच विकला जातो. यासोबतच बोनसमुळेही शेतकरी सर्वसाधारण धानाची लागवड करीत आहे. शेतकºयांचा कल संकरित वाणाच्या वियाण्यांकडे असून सध्या कृषी केंद्रांमध्ये खरेदीसाठी धावपळ सूर झाली आहे.कमी पाणी आणि अल्पकाळात उत्पन्नसर्वसाधारण धान हा १०० ते १२० दिवसात येतो. तसेच या धानाला पाणीही कमी लागते. रोगालाही सहनशील आहे. उलट उच्च प्रतीचा धान १४५ ते १५० दिवसात येतो. रोगालाही लवकर बळी पडतो आणि पाणीही जास्त लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वसाधारण धानालाच पसंती दिली आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण धानानंतर रबी हंगामातील पिकांचे नियोजनही शेतकऱ्यांना करणे सोयीचे जाते. बियााण्यांचे दरही उच्च प्रतीपेक्षा कमी आहे. महाबिज पुरस्कृत कंपन्यांचे धान बियाणे शेतकºयांना सहज उपलब्ध होत आहे.जिल्ह्यात अलीकडे १०० ते १२० दिवसात येणाऱ्या वाणाची लागवड करण्याकडे कल वाढला आहे. याचा फायदा रबी पिकांच्या उत्पादन वाढीत होत आहे. शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. बियाणे आणि खतांची जिल्ह्यात तुर्तास कोणतीही टंचाई नाही.-हिंदूराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक भंडाराजाड धानाचा वाण मध्यम कालावधीत येतो. त्यामुळे शेतकरी या वाणाला सर्वाधिक पसंती देत आहेत. नाममात्र शेतकरी घरी खाण्यापुरते अर्धा ते एक एकर उच्च प्रतीचा धान पेरतात.-प्रशांत जांभुळकर, कृषी केंद्र चालक

टॅग्स :agricultureशेती