शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST

भंडारा : पावसाला सुरुवात झाली की सर्वांनाच वेध लागतात ते पंढरपूरच्या आषाढी वारीचे. आषाढी वारीनंतर श्रावण महिना लागला की ...

भंडारा : पावसाला सुरुवात झाली की सर्वांनाच वेध लागतात ते पंढरपूरच्या आषाढी वारीचे. आषाढी वारीनंतर श्रावण महिना लागला की एका पाठोपाठ येणाऱ्या एका सणांमुळे नवविवाहितांना आपल्या माहेराची आठवण व्हायला लागते. सासरी राहणाऱ्या सासुरवासीणींना आपल्या माहेराची दररोज आठवण होते. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अनेक सासुरवाशीणींना कोरोना संसर्गामुळे आपल्या माहेरी जाता आलेले नाही. त्यामुळे माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा असे माहेरवाशीणींच्या तोंडून वाक्ये ऐकू येत आहेत. स्त्रियांसाठी नागपंचमी सण आनंदाची पर्वणीच असते. अनेक गावांत नागपंचमीला यात्रा भरते. त्यामुळे वर्षभर नागपंचमी सणाची वाट आतुरतेने पाहणाऱ्या नवविवाहितांना किमान यावर्षी तरी आपल्या माहेरी जायला मिळेल का, याकडे लक्ष लागून आहे.

बॉक्स

कोरोना काळात ५१ विवाहाची नोंद

यावर्षी जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येताच ग्रामीण भागातील नागरिकांनी धास्ती घेतली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र विवाह सोहळे कमीच झाले आहेत. मात्र असे असले तरी आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने विवाह होऊ लागले आहेत.

नवविवाहित मुलींच्या आई म्हणतात ...

कोट आई

माझी मुलगी लग्न होऊन एक वर्षापूर्वी सासरी गेली आहे. त्यामुळे आजही सारखी तिची आठवण येते. आता कोरोना आणि शेतीच्या कामामुळे माहेरी तिचे जास्त येणे-जाणे होत नाही. अनेक कार्यक्रमही करता आले नाहीत. यावर्षी श्रावण महिन्यात मात्र मुलगी व जावयांना बोलावून कार्यक्रम करणार आहे.

शीतल घाटोळे

कोट आई

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरीही अजूनही मनामध्ये भीती मात्र कायम आहे. मुलीला माहेरी आणावेसे वाटते. मात्र, तिच्या सासरच्या मंडळींकडून माहेरी जाण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आम्ही आणू शकलेलो नाही. तरीही कान्होबाच्या वेळेस ती घरी येणार असल्याने आतापासूनच आनंद होत आहे.

विनिता शेंडे

नवविवाहिता कोट

प्रत्येक नवविवाहितेला लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी सण, उत्सवानिमित्ताने कधी एकदा आपल्या माहेरी जाते असे होते. पुन्हा एकदा आई-बाबांसोबत प्रेमाचे चार घास कधी खायला मिळतात, असे वाटते. मात्र, आता खरिपाची कामे सुरू असल्याने माहेरी जाता येत नाही. नागपंचमी सणाला मात्र मी अवश्य जाणार आहे.

पूनम गायधने.

नवविवाहिता कोट

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी गतवर्षी माझे लग्न झाले. मात्र, गेल्या वर्षी नागपंचमी सणाला जायला मिळालेच नाही. मात्र, यावर्षी कोरोना संसर्ग नसल्याने श्रावण महिन्यात मी माहेरी जाणार आहे. अनेक दिवसांपासून माहेरची ओढ लागली आहे.

लक्ष्मी साकोरे.