शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

‘मतदान’ नागरिकांचे नैतिक कर्तव्य

By admin | Updated: January 26, 2017 00:54 IST

पाण्याचा एक एक थेंब जसा महत्वाचा आहे.

रंजना श्रृंगारपुरे यांचे प्रतिपादन : आर.एम. पटेल महिला कला महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनभंडारा : पाण्याचा एक एक थेंब जसा महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे लोकशाही प्रधान भारत देशामध्ये आपल्याला मिळालेल्या मतदानाचा अधिकार म्हणजेच आपले अमुल्य मत तितकेच महत्वाचे आहे. तसेच ते बजावणे हे आपले नैतिक कर्तव्य सुध्दा आहे. एकुणच अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रंजना श्रृंगारपुरे यांनी केले.स्थानिक आर एम पटेल महिला कला महाविद्यालयात आज (बुधवारी) आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यकमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राजू आगलावे तसेच रासेयोे कार्यक्रम अधिकारी प्रा.किशोरदत्त पाखमोडे, शारिरीक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख प्रा. बोरकर, प्रा.राजकुमार उक े आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थींनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून विद्यार्थींनी स्वागत केले.श्रृंगारपुरे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकार हा फक्त एक राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठीचाच अधिकार नाही. तर राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत मोलाची भुमिका बजाविणारा आहे. म्हणून तो आपला अधिकारच नाही तर नैतिक कर्तव्य सुध्दा आहे. ‘चलते रहने से ही सफलता है, नही तो रूका हुआ पाणी भी बेकार है,’ या ओळीव्दारे त्यांनी उपस्थित विद्यार्थींनीना संदेश दिला. तसेच महिलांना मिळालेल्या ५० टक्कयाच्या आरक्षणावरच न राहता पुढे जास्त टक्केवारीत कसे जावू हे आजच्या दिनातून सांगितले. म्हणजेच आपल्या देशाचा नागरिक हा मतदारच नाही तर मतदार राजा बनला आहे असे मार्गदर्शन केले.आगलावे म्हणाले, स्वतंत्रा, समता, बंधुता व सामाजिक न्याय या तत्वावर भारताची लोकशाही प्रणाली आधारलेली आहे. भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. म्हणजेच विविध जाती, धर्म, प्रांताचे लोक राहतात. आपण सर्व एका राष्ट्राचे नागरिक आहोत, राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारी पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ ला पार पडली. तेव्हा पासून नागरिक मतदार राजा बनला आहे. सर्वप्रथम २१ वर्ष पुर्ण झालेल्या नागरिकाला मतदानाचा हक्क बहाल करण्यात येत होता. त्यांनतर गरजेनुसार संविधानात(घटनेत)बदल करण्यात आला व २१ वर्षावरून तो अधिकार १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर बहाल करण्यात आला. मिळालेल्या अधिकारातून आज देशामध्ये झालेले परिवर्तन पाहता मतदार जागृत झाल्याचे दिसून येते. पुढेही प्रत्येकांनी आपल्याला मिळालेला अधिकार कर्तव्य म्हणून बजावला तर मतदानाच्या टक्केवारीमध्ये अधिक वाढ होईल असा आशावाद व्यक्त करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. संचालन व प्रास्ताविक प्रा.किशोरदत्त पाखमोडे यांनी तर आभार मेघा मेंढवाडे या विद्यार्थींनी मानले. (प्रतिनिधी)