शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

वर्षानुवर्षे प्रलंबित बौद्ध विद्यापीठाची स्थापना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:14 IST

प्राचीन बौद्ध ज्ञान परंपरा, संस्कृती आणि बौद्ध विद्येच्या संवर्धनासाठी आवश्यक अशा बौद्ध विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे,....

ठळक मुद्देबहुमताने ठराव पारित : आंबेडकरी विचार संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्राचीन बौद्ध ज्ञान परंपरा, संस्कृती आणि बौद्ध विद्येच्या संवर्धनासाठी आवश्यक अशा बौद्ध विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे, यासह सात ठराव रविवारला भंडारा येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात सार्वमताने पारित करण्यात आले.आंबेडकरी विचार जागृती समितीच्यावतीने आंबेडकरी विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचा समारोप सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील होते. अतिथी म्हणून साहित्यिक व समीक्षक डॉ.अनिल नितनवरे होते. याप्रसंगी डॉ.अनिल नितनवरे यांनी ठरावाचे वाचन केले. यात अनेक वर्षांपासून प्रलंबित अशा बौद्ध कायद्याच्या मसुद्याला कायद्याचे मिळवून देऊन या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, भंडारा नगरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने व सहवासाने ऐतिहासिक झालेल्या स्थळांना डॉ.आंबेडकर यांची स्मारक स्थळे म्हणून घोषित करण्यात यावी, बौद्ध संस्कृतीच्या अवशेष असलेल्या अनेक वास्तु, स्तुप व स्मारके यांचे उत्खनन करून त्यांचा विकास व संवर्धन करण्यात यावे, मागास घटकांचे आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण, शिष्यवृत्तीच्या समस्या आणि आर्थिक सबलीकरणाचे प्रश्न याविषयी साशंकता केंद्र व राज्य शासनाने थांबवावी, बाबासाहेबांच्या ग्रंथांचे थांबलेले प्रकाशन पुन्हा गतीमान व्हावे, संपलेल्या ग्रंथाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित कराव्यात, भंडारा शहरातील सामाजिक व सांस्कृतिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमासाठी शासनाने एका सांस्कृतिक सभागृहाची निर्मिती करावी अशा सात ठरावांचा समावेश आहे.समारोप कायक्रमाचे प्रास्ताविक जयप्रकाश भवसागर, सुभंत राहाटे यांनी केले. संयोजन रूपचंद रामटेके यांनी तर आभारप्रदर्शन निमंत्रक अमृत बन्सोड यांनी केले. संमेलनासाठी स्वागताध्यक्ष डी.एफ. कोचे, अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, कार्याध्यक्ष महादेव मेश्राम, संघटन सचिव रूपचंद रामटेके, कोषाध्यक्ष प्रभाकर भोयर, मार्गदर्शक महेंद्र गडकरी, प्रेमसागर गणवीर, राजकुमार गजभिये, डॉ.रविंद्र वानखेडे, मोरेश्वर बोरकर, म.दा. भोवते, असित बागडे, एम.डब्ल्यु. दहिवले, राहुल डोंगरे, समाजभूषण डी.व्ही. बारमाटे, गुलशन गजभिये, राजेश बौद्ध, यशवंत उपरीकर, रामचंद्र अंबादे, डी.जी. रंगारी, प्रेम सूर्यवंशी, रत्नमाला वैद्य, अरूण गोंडाणे, माया उके, डॉ.सुनिल जिवनतारे, अरूण अंबादे, आशू गोंडाणे, करण रामटेके, बाळकृष्ण शेंडे, अजय तांबे, प्रशांत बागडे, आदिनाथ नागदेवे, सचिन बागडे, आहुजा डोंगरे, पुष्पा मेश्राम, शालीदीप गजभिये, गौतम कावळे, नरेंद्र बन्सोड, मोरेश्वर गेडाम, आदींनी सहकार्य केले.