शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती केंद्र स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

भंडारा : केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टीकोनातून सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने विचार विनिमय करून एक विशेष ...

भंडारा : केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टीकोनातून सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने विचार विनिमय करून एक विशेष बाब म्हणून महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम ऑक्सिजन वायू निर्मिती करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटनेने एका लेखी निवेदनातून केली आहे.

मागील वर्षापासून भारत देशातील प्रत्येक राज्यात कोरोना कोविड १९ या जीवघेण्या आजाराने थैमान घातले असून बरेच नागरिक या आजाराने ग्रस्त व त्रस्त आहेत. काही रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासली असताना रुग्णालयात ऑक्सिजन वायू पर्याप्त प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपले लाख मोलाचे जीव गमवावे लागत असल्याची ओरड आहे. आपल्या देशात व राज्यात कृत्रिम ऑक्सिजन वायू निर्माण करणारे कारखाने स्थापन करण्यात आले नसल्यामुळे रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन वायूची गरज असताना वेळेवर ऑक्सिजन वायू उपलब्ध होत नसल्याचे सकृतपणे दिसून येत असून ही विज्ञान तंत्रज्ञान युगातील विकसनशील समजल्या जाणाऱ्या भारत देशाची फार मोठी शोकांतिका आहे.

ऑक्सिजन सिलिंडर मिळावेत यासाठी रुग्णांचे नातेवाईक जीवाचा आटापिटा करत आहेत परंतु ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडत असून या भयाण महामारीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. अखेर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी विदेशातून कृत्रिम ऑक्सिजन वायू आयात करण्याची वेळ भारत देशावर आलेली आहे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून देशात व राज्यात कृत्रिम ऑक्सिजन वायू निर्मिती करणारे कारखाने असते तर रुग्णांना जीवदान मिळाले असते.

भारतीय संविधानातील भाग चौथा राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वेमधील कलम ४७ नुसार पोषण मान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य असल्याची तरतूद केली असून याबाबत केंद्र व राज्य शासनाने नागरिकांच्या सुदृढ निरोगी आरोग्यासाठी आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. एवढेच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिकांना नवनवीन शोध लावण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात विकसनशील समजल्या जाणाऱ्या भारत देशात ऑक्सिजन व इतर औषधोपचाराच्या अभावी रुग्णांचा मृत्यू होणे . हे साध्या भोळ्या नागरिकांचे मोठे दुर्दैव आहे. विविध आजारामध्ये कृत्रिम ऑक्सिजन गरज भासत असते त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने वेळीच सतर्क होणे काळाची गरज आहे.

याप्रकरणी केंद्र व राज्य शासनाने वेळीच दखल घेऊन देशातील सर्व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन वायू निर्मिती केंद्र स्थापन करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, हर्षवर्धन हुंमने, अरुण ठवरे,उमाकांत काणेकर, मच्छिंद्र टेंभूर्णे, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, अरूणा दामले , पपिता वंजारी, रूपा लेंधारे, शुभांगी भूतांगे, संयोगिता खोब्रागडे, ज्योती मेश्राम, पुष्पा मुल, कल्पना वानखेडे, शारदा रंगारी, विभा रामटेके, माधुरी सुखदेवे, संघमित्रा गेडाम, प्रमिला बोरकर, शर्मिला बोरकर, सरिता टेंभूर्णे, विद्या धारगावे, वर्षा शेंडे, साधना मेश्राम, अनु गेडाम, साधना गोडबोले, तरासान डोंगरे, पंचशीला मेश्राम, रमा धारगावे,कलावती भोवते, विद्या उंदीरवाडे, अर्चना उंदीरवाडे, वनमाला बोरकर, विशाखा बनसोड, सुमन वंजारी, प्रमिला बोरकर यांनी केली आहे.