शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती केंद्र स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

भंडारा : केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टीकोनातून सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने विचार विनिमय करून एक विशेष ...

भंडारा : केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टीकोनातून सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने विचार विनिमय करून एक विशेष बाब म्हणून महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम ऑक्सिजन वायू निर्मिती करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटनेने एका लेखी निवेदनातून केली आहे.

मागील वर्षापासून भारत देशातील प्रत्येक राज्यात कोरोना कोविड १९ या जीवघेण्या आजाराने थैमान घातले असून बरेच नागरिक या आजाराने ग्रस्त व त्रस्त आहेत. काही रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासली असताना रुग्णालयात ऑक्सिजन वायू पर्याप्त प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपले लाख मोलाचे जीव गमवावे लागत असल्याची ओरड आहे. आपल्या देशात व राज्यात कृत्रिम ऑक्सिजन वायू निर्माण करणारे कारखाने स्थापन करण्यात आले नसल्यामुळे रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन वायूची गरज असताना वेळेवर ऑक्सिजन वायू उपलब्ध होत नसल्याचे सकृतपणे दिसून येत असून ही विज्ञान तंत्रज्ञान युगातील विकसनशील समजल्या जाणाऱ्या भारत देशाची फार मोठी शोकांतिका आहे.

ऑक्सिजन सिलिंडर मिळावेत यासाठी रुग्णांचे नातेवाईक जीवाचा आटापिटा करत आहेत परंतु ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडत असून या भयाण महामारीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. अखेर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी विदेशातून कृत्रिम ऑक्सिजन वायू आयात करण्याची वेळ भारत देशावर आलेली आहे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून देशात व राज्यात कृत्रिम ऑक्सिजन वायू निर्मिती करणारे कारखाने असते तर रुग्णांना जीवदान मिळाले असते.

भारतीय संविधानातील भाग चौथा राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वेमधील कलम ४७ नुसार पोषण मान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य असल्याची तरतूद केली असून याबाबत केंद्र व राज्य शासनाने नागरिकांच्या सुदृढ निरोगी आरोग्यासाठी आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. एवढेच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिकांना नवनवीन शोध लावण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात विकसनशील समजल्या जाणाऱ्या भारत देशात ऑक्सिजन व इतर औषधोपचाराच्या अभावी रुग्णांचा मृत्यू होणे . हे साध्या भोळ्या नागरिकांचे मोठे दुर्दैव आहे. विविध आजारामध्ये कृत्रिम ऑक्सिजन गरज भासत असते त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने वेळीच सतर्क होणे काळाची गरज आहे.

याप्रकरणी केंद्र व राज्य शासनाने वेळीच दखल घेऊन देशातील सर्व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन वायू निर्मिती केंद्र स्थापन करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, हर्षवर्धन हुंमने, अरुण ठवरे,उमाकांत काणेकर, मच्छिंद्र टेंभूर्णे, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, अरूणा दामले , पपिता वंजारी, रूपा लेंधारे, शुभांगी भूतांगे, संयोगिता खोब्रागडे, ज्योती मेश्राम, पुष्पा मुल, कल्पना वानखेडे, शारदा रंगारी, विभा रामटेके, माधुरी सुखदेवे, संघमित्रा गेडाम, प्रमिला बोरकर, शर्मिला बोरकर, सरिता टेंभूर्णे, विद्या धारगावे, वर्षा शेंडे, साधना मेश्राम, अनु गेडाम, साधना गोडबोले, तरासान डोंगरे, पंचशीला मेश्राम, रमा धारगावे,कलावती भोवते, विद्या उंदीरवाडे, अर्चना उंदीरवाडे, वनमाला बोरकर, विशाखा बनसोड, सुमन वंजारी, प्रमिला बोरकर यांनी केली आहे.