शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तू महाग

By admin | Updated: November 3, 2016 00:47 IST

केंद्रात किंवा राज्यात सत्ता कुणाचीही असो, सर्वसामान्य माणसाला त्याच्या दोन वेळ पोटाची खळगी भरण्याची चिंता असते.

‘अच्छे दिन’ दूरच : डाळी, साखर, तेल, भाजीपाल्यांचे दर गगनालाभंडारा : केंद्रात किंवा राज्यात सत्ता कुणाचीही असो, सर्वसामान्य माणसाला त्याच्या दोन वेळ पोटाची खळगी भरण्याची चिंता असते. काही दशकापर्यंत केंद्रात व राज्यात काँग्रेसचे राज्य होते. त्यावेळी गरिबी हटावचा नारा देण्यात आला. पण गरिबी हटू शकली नाही. भाजपाने सत्तेत येण्यासाठी ‘अच्छे दिन’ चा नारा दिला. भाजपची बहुमताने सत्ता येऊन दोन वर्षे लोटली. तरीही जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वधारल्याने बजेट कोलमडले आहे. दोन वषार्पूर्वी साधारणत: काही प्रमाणात महागाईचा सामना करावा लागत होता. जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला तितके भिडले नव्हते. आता अच्छे दिन येणार, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार, शिक्षणाचा फायदा होणार, जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात राहणार अशी स्वप्न सर्वसामान्य नागरिक रंगवू लागले होते. पण दोन वर्षांच्या काळात जीवनावश्यक वस्तुच्या दरात एवढी वाढ झाली की तळहातावर आणून पोट भरणाऱ्यांना तर जगणेच कठीण होऊन बसले आहे. मागीलवर्षी रोजच्या वापरातील तुरीची डाळ ६५ ते ७० रूपये किलो, चणाडाळ ४० ते ४५ रूपये किलो होती. गोडे तेल ८५ ते ९० रूपये किलो, गहू १७ ते २० रूपये किलो, साखर ३० ते ३२ रूपये किलो या दरम्यान साहित्य मिळत होते. पण या दोन वर्षांत सणासुदीचे दिवस आले की जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडत असल्याचा अनुभव सामान्य नागरिक घेत आहेत. तूर डाळ १५० रूपये, चणा डाळ १२० रूपये किलो, गहू २२ ते २५ रूपये, साखर ४० रूपये, तेल ११० ते १२० रूपये किलो यासह ६० ते ८० रूपये किलो भाजीपाला असे दर कडाडले आहेत. दोन वर्षांत पेट्रोल, डिझलचे दर १० रूपये लिटरने वाढले आहे. गरिबांचे रॉकेलही मिळेनासे झाले आहे. वीज वाचविण्यासाठी शासनाने वीजधारकांना कमी दरात एलएडी बल्ब दिले. पण वीजेच्या दरात वाढ केली. भारनियमन होणार नसल्याची घोषणा केली असली तरी ग्रामीण भागातील नागरिक अघोषित भारनियमन झेलत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा मागील अनेक वषार्पासून आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्याच्या वेदना कुणालाच कळत नाही. उच्च शिक्षणासाठी लाखो रूपये खर्चूनही युवकांच्या हाती रोजगार नाही. खासगी कंपन्यामध्ये अत्यल्प पगारावर त्यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाचा उपयोग काय असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगार शासनाला विचारत आहे. मजुरी करणारेही त्यांच्यापेक्षा जास्त कमवित असल्याने सुशिक्षितांमध्ये नैराश्य पसरत आहे. गृहिणींना घर कसे चालवावे असा प्रश्न पडला आहे. भाज्यांचे दर कडाडल्याने आणि दाळही महागल्याने करावे तरी काय असा प्रश्न त्यांना पडतो. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारल्याने बजेट कोलमडले आहे. त्यामुळे हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे. (नगर प्रतिनिधी)रोजगार वाढले पण पत्ताच नाहीवर्षभरापासून सातत्याने रोजगारांत वाढ झाल्याचे सरकार सांगत आहेत. पण बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मग निर्माण झालेले रोजगार गेले कुठे हा प्रश्न बेरोजगार युवकांना पडला आहे. आगामी काळात अनेक क्षेत्रात लाखो रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. धान्याच्या किमती वाढल्याने तर काही पदार्थ हद्दपारच होत आहे.