शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सिंचनासाठी होणारी फरफट ही पूर्वीच्या शासनाचे पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेच प्रकल्पाचे पाणी शेतीला वेळेवर मिळत नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनासाठी होणारी फरफट ही पूर्वीच्या शासनाचे पाप आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी नागपूर महानगर पालिकेला २०११ मध्ये वाढवून दिल्याने ...

ठळक मुद्देचरण वाघमारे : पेंच प्रकल्पाच्या पाण्यासाठी पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेच प्रकल्पाचे पाणी शेतीला वेळेवर मिळत नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनासाठी होणारी फरफट ही पूर्वीच्या शासनाचे पाप आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी नागपूर महानगर पालिकेला २०११ मध्ये वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा घणाघाती आरोप आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रकल्पचे पाणी मिळत नाही. यासाठी ठिकठिकाणी आंदोलन व रास्ता रोको करून अधिकारी व प्रशासनाला वेठीस धरण्यात येत आहे. पण यामुळे समस्या सुटणार नसून काही ठराविक राजकारण्यांचे फावणार आहे. शेतकºयांना पाणी मिळत नाही ही समस्या अनेक वर्षांपासून जैसी थे आहे. याला कारण म्हणजे २०१० मध्ये मध्यप्रदेश शासनाने बांधलेले चौराई धरण आहे. हे धरण तयार करताना जिल्ह्यातील मोहाडी व भंडारा तालुक्याला शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन पूर्वीच्या सरकारने केले नाही.मोहाडी व भंडारा तालुक्यातील ३० हजार हेक्टर शेतजमीन ही नागपूर पेंचच्या पाण्यावर अवलंबून आहे. या प्रकल्पाचे पाणी नागपूर महानगर पालिकेला देण्यात येते. २०११ पूर्वी महानगर पालिकेला ७८ एमएम क्यूब देण्यात येत होते. २०११ साली पाणी वाढवून १९० एमएम क्यूब देण्याचा करार करण्यात आला. प्रकल्पाची क्षमता कमी आणि नागपूरला देण्यात येणारे पाणी जास्त अशी अवस्था झाली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. मोहाडी व भंडारा तालुक्यातील शेतकरी हे वरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शेतकºयांना पाणी पुरवण्याचा करार असूनही वेळेवर पाणी मिळत नाही. याला मुख्य कारण म्हणजे पाण्याचे नियोजन न करणे आहे.राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने ११०० कोटी रुपयाचे नियोजन शेतकऱ्यांसाठी केले आहे. हत्तीडोई जंकशनवर सोलरवर चालणारी लिफ्ट आणि लिफ्ट सोलर चालणारी सूर नदीवर बंधारा व काटी वितरिकेवर लिफ्ट असे विविध कामाचे निरीक्षण सुरु आहे. दोन वर्षात शेतकºयांना नियमित व मुबलक पाणी सिंचनासाठी मिळेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. हे काम पूर्णत्वास आल्यास ६ किमी पर्यंत बॅक वॉटर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मोहाडी व भंडारा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न वाढवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी वरठी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे व ग्राम पंचायत सदस्य संदीप बोंद्रे उपस्थित होते.आंदोलनानंतर पाणी कुठून आले ?पेंच प्रकल्पात पाण्याचा साठा मुबलक आहे. दोन महिन्यांपासून शेतकरी पाण्याची मागणी करीत आहेत. मागणी केल्यावर पाणी दिले असते तर शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची आवश्यकता पडली नसती. पाणी असून पाणी न सोडता आंदोलन केल्यावर पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देणे ही अधिकाºयांची बदमाशी आहे. आंदोलन झाल्यावर धरणात पाणी आले कुठून? असा प्रतिप्रश्न उपस्थित केलो. जर पाणी आहे तर वेळेवर दिले नाही म्हणून अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.