शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ईरीच्या शास्त्रज्ञांनी साधला धान उत्पादकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:01 IST

शेतकऱ्यांकडून धान लागवड व विक्री विषयी चर्चा केली. त्यानंतर गणेशपूर येथील शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देत शेतकऱ्यांना एकत्रित आणून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. लाखनी, साकोली येथील निवडूक शेतकऱ्यांच्या शेतात भेट देत साकोली कृषी विज्ञान केंद्राचा आढावा घेतला. खासदार सुनील मेंढे यांनी जिल्ह्यातील धान पीक उत्पादन व शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्यांविषयी शास्त्रज्ञांना माहिती दिली.

ठळक मुद्देदोन दिवसीय दौरा : पट्टा पद्धतीसह बाजारपेठेबद्दल जाणून घेतली अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीत तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी बाजारपेठ जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञानी जिल्ह्यातील भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.या दौऱ्यावेळी खासदार सुनील मेंढे, वाराणसी येथील अंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्राचे संचालक अरविंद कुमार यांच्यासह जिल्हाधिकारी एम. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुमेश्वरी, गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण, गोंदिया जिल्हा कृषी अधीक्षक गणेश घोरपडे, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. विलास खर्चे, भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, साकोली कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ भात पैदासकर डॉ. जी.आर. श्यामकुंवर, साकोली कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ निलेश वझिरे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील धान पिकाच्या तंत्रज्ञान तसेच पीक पद्धतीचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्राच्या पाच सदस्यीय टीमनी भंडारा तालुक्यातील खमारी येथील रामभाऊ खोब्रागडे यांच्या पट्टा पद्धतीने लागवड केलेल्या धान पिकाची पाहणी केली. तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी पट्टापद्धतीविषयी पथकाला माहिती दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून धान लागवड व विक्री विषयी चर्चा केली. त्यानंतर गणेशपूर येथील शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देत शेतकऱ्यांना एकत्रित आणून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. लाखनी, साकोली येथील निवडूक शेतकऱ्यांच्या शेतात भेट देत साकोली कृषी विज्ञान केंद्राचा आढावा घेतला. खासदार सुनील मेंढे यांनी जिल्ह्यातील धान पीक उत्पादन व शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्यांविषयी शास्त्रज्ञांना माहिती दिली. यावेळी कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बदललेल्या पीक पद्धतीतून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेल्या वाढीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकºयांनी धान पिकाला मिळत असलेला अल्प मोबदला कथन केला.

टॅग्स :Farmerशेतकरी