शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

एन्ट्री द्या अन् खुशाल करा अवैध प्रवासी वाहतूक ! अपघातप्रवण मार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धावणारी धोकादायक वाहनांना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 12:09 IST

Bhandara : शेकडो वाहने धावतात योग्य प्रमाणपत्राविना रस्त्यावर

गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ग्रामीण भागातून शहरात अनेक ऑटो, छोटा हत्ती, चारचाकी प्रवासी वाहने आणि मालवाहू येतात. मात्र यांपैकी बहुतांश वाहनाची वयोमर्यादा संपलेली आहे. अनेकांकडे पीयूसी प्रमाणपत्रही नाही. वाहनांचे पासिंगही नाही, तरीही ही वाहने सर्रास महामार्गावर धावत आहेत. अपघातप्रवण असलेल्या या मार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धावणारी ही वाहने धोकादायक असली तरी वाहतूक विभागाच्या 'मासिक' आशीर्वादाने हा प्रकार बिनदिक्कत सुरू आहे. भंडारा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रोज हजारोंच्या संख्येने हे नागरिक विविध शासकीय कामांसाठी, खरेदीसाठी भंडारा शहरात येत असतात. विशेषतः मोहाडी आणि लाखनी मार्गावरून येणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे. ऑटो तसेच अन्य चारचाकी वाहनांमधून हे प्रवासी शहरात येतात आणि परत जातातही. 

जिल्हा परिषद चौक, पंचायत समिती, बसस्थानक, लालबहादूर शास्त्री चौकात ही वाहने प्रवाशांच्या शोधात असतात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविल्यावरच त्यांचा प्रवास सुरू होतो. या वाहनांच्या मार्गात महामार्ग पोलिस, चौकातील ट्रॅफिक पोलिस असले तरी त्यांचा प्रवास मात्र कसलीही आडकाठी न घालता बिनदिक्कत कसा होतो, हा अनेकांना आश्चर्यात पाडणारा प्रश्न आहे. कुण्याही पोलिस अधिकाऱ्याला किंवा वाहतूक पोलिसांना हा प्रकार दिसत कसा नाही, हासुद्धा प्रश्न आहे. 

बसफेऱ्या कमीएसटी महामंडळाच्या ग्रामीण भागात धावणाऱ्या बसफेऱ्या कमी आहेत. असलेल्या फेऱ्यांमधील वेळेचे अंतरही बरेच अधिक असल्याने खेड्यावरून येणाऱ्या ग्रामस्थांना ताटकळत बसावे लागले. याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूकदार घेतात. भंडारा, लाखनी, मोहाडी यांसह अनेक बसस्थानकांसमोर या वाहतूकदारांची रांग दिसते. नाइलाजाने नागरिकांना जीव धोक्यात घालून या वाहनांमधून प्रवास करावा लागतो.

अधिकारी म्हणतात, असा प्रकारच नाही ! शहरातून बाहेरगावात होणाऱ्या प्रवासी वाहतुकीसंदर्भात भंडाराचे वाहतूक पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांना विचारणा केली असता, असा काही प्रकार नसल्याचे त्यांनी सांगितले. निर्लेखित झालेली वाहने संबंधित वाहनमालकांनी रस्त्यावर आणू नयेत. ऑटोचालकांनी आणि अन्य वाहनचालकांनी वाहनांची कागदपत्रे ठेवली तर कारवाई होणार नाही, असे ते म्हणाले.

महामार्ग पोलिस काय करतात? भंडारा ते लाखनी मार्गावर महामार्ग वाहतूक पोलिसांची चौकी आहे. या चौकीसमोरूनच रोज ही वाहने प्रवासी घेऊन ये-जा करतात. मात्र महामार्ग पोलिसांकडून कडक तपासणी झाल्याचे कधी ऐकिवात नाही. मार्च एंडिंग, लग्नसराई, दिवाळीसारख्या दिवसांत या तपासणीला चांगलाच जोर चढलेला दिसतो. त्याचा फटका मात्र अवैध वाहतूकदारांपेक्षा सामान्य नागरिकांना आणि दुचाकीचालकांनाच अधिक बसतो.

अनेकांची कैफियत, उघड बोलणार कोण ? 

  • महिन्याची ठरावीक तारीख आली की महामार्गावर उभ्या असलेल्या 'साहेबां'ना खुश करावेच लागले. त्याशिवाय दुसऱ्या दिवशी वाहन रोडवर आणता येत नाही, असा अनेक प्रवासी वाहतूकदारांचा अनुभव आहे. मात्र उघडपणे बोलायला कुणी धजावत नाही. 
  • 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत काही ऑटोचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही आपबीती सांगितली. 
  • जेवढ्या पोलिस ठाण्यांच्या सीमांमधून जावे लागते, तेवढ्या ठिकाणच्या रस्त्यावरच्या साहेबांना खुश करावेच लागते. त्यात उशीरही चालत नाही, असा त्यांचा अनुभव आहे.
टॅग्स :bhandara-acभंडारा