शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेला अतिक्रमण मुक्तीची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:41 IST

जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे.

ठळक मुद्देतलाव, नाले, अतिक्रमणाच्या विळख्यात : अंदाजपत्रकातच हवी मोजमापाची तरतूद

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे. मात्र, आजही तलाव व नाले अतिक्रमणाच्या विळख्यात असून तलाव, नाले अरुंद झाल्याचे पहावयास मिळत आहे. यावर उपाय म्हणून जलयुक्त शिवार योजनांच्या अंदाजपत्रकात ७ ते १० हजारांची तरतुद अतिक्रमण निर्मुलनासाठी करावी, मोजमाप करुन अतिक्रमण काढण्याची तरतुद झाल्यास दिलासा मिळणार आहे.राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी व अभिनव अभियानामुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला. सन २०१५-२०१८ या तीन वर्षात भंडारा जिल्ह्यातील २०१ गावांपैकी १८५ गावे वॉटर न्युट्रल झाली, तर १६ गावे वॉटर न्युट्रल होण्याच्या मार्गात आहेत. विविध कामातून २७ हजार २०० हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाल्याने अभियानाची यशस्वी वाटचाल पाहायला मिळत आहेत.एकुण ५ वर्षाचा हा अभिनव उपक्रम असून भंडारा जिल्ह्याला यामुळे मोठा फायदा झालेला असली तरी तलाव व नाल्यांची अतिक्रमण मुक्तीची मुळ समस्या मात्र, जैसे थे च आहे. आजही तलाव व नाले अतिक्रमणाच्या जोखडात शेवटचा श्वास घेत आहेत. अतिक्रमणे व शेती तयार करण्यात आल्याने तलाव मोठ्या प्रमाणात बेबंदशाही असल्याचे दिसून येते. नाले अरुंद झाल्याने पूर्वीसारखे रुंद पात्रे दिसेनासे झाले आहेत. अतिक्रमणामुळे तलाव व नाल्यांपासून पाहिजे तसा फायदा अजुनही झालेला दिसत नाही. हे गंभिर तेवढेच वास्तव्य सत्य आहे.जलयुक्त शिवार योजनेबरोबर या समस्येवर उपाय करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाने या योजनेच्या अंदाजपत्रकात ७ ते १० हजारांची वाढीव तरतूदकरुन अतिक्रमण काढण्याची तलाव व नाल्यांचे मोजमाप करण्याची आवश्यकता आहे. त्या दिशेने सकारात्मक पाऊले उचलली गेल्यास जलयुक्त शिवार योजनांचा आणखी सकारात्मक परिणाम दिसायला लागेल, ऐवढे निश्चित.यावर्षी ५६ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ८६ गावांची निवड झाली. विविध यंत्रणेमार्फत १३८५ कामे पूर्ण होवून सर्व गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली. या कामांमुळे १६ हजार ४४० हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. एका पाण्यामुळे वाया जाणाºया पिकांना जलयुक्त शिवार अभियानाने नवसंजीवनी मिळाली. सन २०१६-१७ मध्ये ५९ गावांची होवून कामातून १० हजार ७५६ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले. यातील ५९ गावांपैकी ४३ गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली तर १६ गावताील कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील ५६ गावांची निवड होवून विविध यंत्रणामार्फत १३८५ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.