शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जलयुक्त शिवार योजनेला अतिक्रमण मुक्तीची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:41 IST

जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे.

ठळक मुद्देतलाव, नाले, अतिक्रमणाच्या विळख्यात : अंदाजपत्रकातच हवी मोजमापाची तरतूद

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे. मात्र, आजही तलाव व नाले अतिक्रमणाच्या विळख्यात असून तलाव, नाले अरुंद झाल्याचे पहावयास मिळत आहे. यावर उपाय म्हणून जलयुक्त शिवार योजनांच्या अंदाजपत्रकात ७ ते १० हजारांची तरतुद अतिक्रमण निर्मुलनासाठी करावी, मोजमाप करुन अतिक्रमण काढण्याची तरतुद झाल्यास दिलासा मिळणार आहे.राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी व अभिनव अभियानामुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला. सन २०१५-२०१८ या तीन वर्षात भंडारा जिल्ह्यातील २०१ गावांपैकी १८५ गावे वॉटर न्युट्रल झाली, तर १६ गावे वॉटर न्युट्रल होण्याच्या मार्गात आहेत. विविध कामातून २७ हजार २०० हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाल्याने अभियानाची यशस्वी वाटचाल पाहायला मिळत आहेत.एकुण ५ वर्षाचा हा अभिनव उपक्रम असून भंडारा जिल्ह्याला यामुळे मोठा फायदा झालेला असली तरी तलाव व नाल्यांची अतिक्रमण मुक्तीची मुळ समस्या मात्र, जैसे थे च आहे. आजही तलाव व नाले अतिक्रमणाच्या जोखडात शेवटचा श्वास घेत आहेत. अतिक्रमणे व शेती तयार करण्यात आल्याने तलाव मोठ्या प्रमाणात बेबंदशाही असल्याचे दिसून येते. नाले अरुंद झाल्याने पूर्वीसारखे रुंद पात्रे दिसेनासे झाले आहेत. अतिक्रमणामुळे तलाव व नाल्यांपासून पाहिजे तसा फायदा अजुनही झालेला दिसत नाही. हे गंभिर तेवढेच वास्तव्य सत्य आहे.जलयुक्त शिवार योजनेबरोबर या समस्येवर उपाय करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाने या योजनेच्या अंदाजपत्रकात ७ ते १० हजारांची वाढीव तरतूदकरुन अतिक्रमण काढण्याची तलाव व नाल्यांचे मोजमाप करण्याची आवश्यकता आहे. त्या दिशेने सकारात्मक पाऊले उचलली गेल्यास जलयुक्त शिवार योजनांचा आणखी सकारात्मक परिणाम दिसायला लागेल, ऐवढे निश्चित.यावर्षी ५६ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ८६ गावांची निवड झाली. विविध यंत्रणेमार्फत १३८५ कामे पूर्ण होवून सर्व गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली. या कामांमुळे १६ हजार ४४० हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. एका पाण्यामुळे वाया जाणाºया पिकांना जलयुक्त शिवार अभियानाने नवसंजीवनी मिळाली. सन २०१६-१७ मध्ये ५९ गावांची होवून कामातून १० हजार ७५६ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले. यातील ५९ गावांपैकी ४३ गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली तर १६ गावताील कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील ५६ गावांची निवड होवून विविध यंत्रणामार्फत १३८५ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.