शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

जलयुक्त शिवार योजनेला अतिक्रमण मुक्तीची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:41 IST

जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे.

ठळक मुद्देतलाव, नाले, अतिक्रमणाच्या विळख्यात : अंदाजपत्रकातच हवी मोजमापाची तरतूद

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे. मात्र, आजही तलाव व नाले अतिक्रमणाच्या विळख्यात असून तलाव, नाले अरुंद झाल्याचे पहावयास मिळत आहे. यावर उपाय म्हणून जलयुक्त शिवार योजनांच्या अंदाजपत्रकात ७ ते १० हजारांची तरतुद अतिक्रमण निर्मुलनासाठी करावी, मोजमाप करुन अतिक्रमण काढण्याची तरतुद झाल्यास दिलासा मिळणार आहे.राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी व अभिनव अभियानामुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला. सन २०१५-२०१८ या तीन वर्षात भंडारा जिल्ह्यातील २०१ गावांपैकी १८५ गावे वॉटर न्युट्रल झाली, तर १६ गावे वॉटर न्युट्रल होण्याच्या मार्गात आहेत. विविध कामातून २७ हजार २०० हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाल्याने अभियानाची यशस्वी वाटचाल पाहायला मिळत आहेत.एकुण ५ वर्षाचा हा अभिनव उपक्रम असून भंडारा जिल्ह्याला यामुळे मोठा फायदा झालेला असली तरी तलाव व नाल्यांची अतिक्रमण मुक्तीची मुळ समस्या मात्र, जैसे थे च आहे. आजही तलाव व नाले अतिक्रमणाच्या जोखडात शेवटचा श्वास घेत आहेत. अतिक्रमणे व शेती तयार करण्यात आल्याने तलाव मोठ्या प्रमाणात बेबंदशाही असल्याचे दिसून येते. नाले अरुंद झाल्याने पूर्वीसारखे रुंद पात्रे दिसेनासे झाले आहेत. अतिक्रमणामुळे तलाव व नाल्यांपासून पाहिजे तसा फायदा अजुनही झालेला दिसत नाही. हे गंभिर तेवढेच वास्तव्य सत्य आहे.जलयुक्त शिवार योजनेबरोबर या समस्येवर उपाय करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाने या योजनेच्या अंदाजपत्रकात ७ ते १० हजारांची वाढीव तरतूदकरुन अतिक्रमण काढण्याची तलाव व नाल्यांचे मोजमाप करण्याची आवश्यकता आहे. त्या दिशेने सकारात्मक पाऊले उचलली गेल्यास जलयुक्त शिवार योजनांचा आणखी सकारात्मक परिणाम दिसायला लागेल, ऐवढे निश्चित.यावर्षी ५६ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ८६ गावांची निवड झाली. विविध यंत्रणेमार्फत १३८५ कामे पूर्ण होवून सर्व गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली. या कामांमुळे १६ हजार ४४० हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. एका पाण्यामुळे वाया जाणाºया पिकांना जलयुक्त शिवार अभियानाने नवसंजीवनी मिळाली. सन २०१६-१७ मध्ये ५९ गावांची होवून कामातून १० हजार ७५६ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले. यातील ५९ गावांपैकी ४३ गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली तर १६ गावताील कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील ५६ गावांची निवड होवून विविध यंत्रणामार्फत १३८५ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.