शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

आयटीआय प्रशिक्षकाला ‘स्कील इंडिया’तून रोजगार

By admin | Updated: September 19, 2015 00:38 IST

शासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थ्यांना ‘स्कील इंडिया’अतर्गत ...

मुंबईत आज प्राचार्यांची बैठक : केंद्राच्या सूचनेवरुन कौशल्य विकास विभागाचा पुढाकार प्रशांत देसाई भंडाराशासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थ्यांना ‘स्कील इंडिया’अतर्गत शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिस) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, हा यामागील उद्देश असून यासाठी शनिवारला प्रधान सचिवांनी राज्यातील सर्व आयटीआय प्राचार्यांची मुंबईत बैठक बोलाविली आहे.मागील काही वर्षात शासनाने नोकर भरती कमी केली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांची फौज तयार झाली आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबत अनेकांनी स्पर्धा परीक्षांची कास धरली. काहींनी व्यावसायिक अभ्यासक्रमाला पसंती देत व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, प्रशिक्षण घेऊनही अनेक विद्यार्थ्यांना शिकाऊ (अप्रेंटीस) उमेदवारीचे प्रशिक्षण मिळाले नाही. त्यामुळे अनेक होतकरू प्रशिक्षणार्थी नोकरीपासून वंचित राहिले आहे. काहींनी व्यवसाय थाटून बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न केला असला तरी व्यवसायातील वाढत्या स्पर्धेमुळे त्यांना कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.मागील तीन वर्षापूर्वी राज्यातील शासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित विद्यार्थी, विद्यार्थिनींना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘स्किल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत राज्यातीलच नव्हे तर देशातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व प्रशिक्षित उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवारी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. यात ज्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारीची संधी मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे. जिल्हास्तरावर मेळाव्यातून होणार निवडराज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांचे मेळावे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात सर्व प्रशिक्षणप्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित राहायचे आहे. विद्यार्थ्यांसह आस्थापनाचे तथा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना बोलविण्यात येणार आहे. ज्या कंपनी किंवा कारखानदारांकडे उपलब्ध जागेच्या उपलब्धतेनुसार मेळाव्यातून निवडलेल्या उमेदवारांची निवड करून प्रशिक्षणाची संधी देण्यात येणार आहे. ही निवड १५ आॅक्टोबरपूर्वी करून यादी शासनाकडे सुपूर्द करावयाची आहे.आयटीआय प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ट्रेडनुसार आस्थापनात जागा वाढविण्यात येणार आहे. उपलब्ध जागेनुसार प्रत्येकाला संधी मिळेल. शनिवारला राज्याचे कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव तथा आयुक्त संधू यांनी राज्यातील सर्व आयटीआय प्रमुखांची मुंबई येथे बैठक बोलाविली आहे. - चंद्रशेखर राऊत,प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा.