शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय प्रशिक्षकाला ‘स्कील इंडिया’तून रोजगार

By admin | Updated: September 19, 2015 00:38 IST

शासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थ्यांना ‘स्कील इंडिया’अतर्गत ...

मुंबईत आज प्राचार्यांची बैठक : केंद्राच्या सूचनेवरुन कौशल्य विकास विभागाचा पुढाकार प्रशांत देसाई भंडाराशासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थ्यांना ‘स्कील इंडिया’अतर्गत शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिस) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, हा यामागील उद्देश असून यासाठी शनिवारला प्रधान सचिवांनी राज्यातील सर्व आयटीआय प्राचार्यांची मुंबईत बैठक बोलाविली आहे.मागील काही वर्षात शासनाने नोकर भरती कमी केली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांची फौज तयार झाली आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबत अनेकांनी स्पर्धा परीक्षांची कास धरली. काहींनी व्यावसायिक अभ्यासक्रमाला पसंती देत व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, प्रशिक्षण घेऊनही अनेक विद्यार्थ्यांना शिकाऊ (अप्रेंटीस) उमेदवारीचे प्रशिक्षण मिळाले नाही. त्यामुळे अनेक होतकरू प्रशिक्षणार्थी नोकरीपासून वंचित राहिले आहे. काहींनी व्यवसाय थाटून बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न केला असला तरी व्यवसायातील वाढत्या स्पर्धेमुळे त्यांना कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.मागील तीन वर्षापूर्वी राज्यातील शासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित विद्यार्थी, विद्यार्थिनींना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘स्किल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत राज्यातीलच नव्हे तर देशातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व प्रशिक्षित उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवारी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. यात ज्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारीची संधी मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे. जिल्हास्तरावर मेळाव्यातून होणार निवडराज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांचे मेळावे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात सर्व प्रशिक्षणप्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित राहायचे आहे. विद्यार्थ्यांसह आस्थापनाचे तथा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना बोलविण्यात येणार आहे. ज्या कंपनी किंवा कारखानदारांकडे उपलब्ध जागेच्या उपलब्धतेनुसार मेळाव्यातून निवडलेल्या उमेदवारांची निवड करून प्रशिक्षणाची संधी देण्यात येणार आहे. ही निवड १५ आॅक्टोबरपूर्वी करून यादी शासनाकडे सुपूर्द करावयाची आहे.आयटीआय प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ट्रेडनुसार आस्थापनात जागा वाढविण्यात येणार आहे. उपलब्ध जागेनुसार प्रत्येकाला संधी मिळेल. शनिवारला राज्याचे कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव तथा आयुक्त संधू यांनी राज्यातील सर्व आयटीआय प्रमुखांची मुंबई येथे बैठक बोलाविली आहे. - चंद्रशेखर राऊत,प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा.