शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:05 IST

पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राज्य एल्गार समन्वय समितीची सभा झाली असून त्यामध्ये विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळभ सर्वांनुमते एकच निर्णय घेवून राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा एकाच छत्राखाली लढा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देएल्गार समन्वय समितीची बैठक : शासनाकडून मागण्या मान्य होईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी ११ सप्टेंबरपासून शासकीय व निमशासकीय कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यासाठी राज्यातील विविध संवर्गाच्या ३५ संघटनांची एल्गार समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती जुनी पेन्शन हक्क संघटनेचे उपाध्यक्ष गोपाल मेश्राम यांनी सांगितले.यावेळी संघटनेच्यावतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लाखनीचे तहसीलदार मल्लीक विराणी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राज्य एल्गार समन्वय समितीची सभा झाली असून त्यामध्ये विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळभ सर्वांनुमते एकच निर्णय घेवून राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा एकाच छत्राखाली लढा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचारी तसेच आरोग्य विभागासह निमशासकीय कर्मचारीदेखील मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने संघटनेच्या लढ्याला यश येणार आहे. जिल्ह्यात २८ व २९ आॅगस्ट रोजी जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून जिल्हा प्रशासनाला नोटीस देण्यात आली आहे. यावर तोडगा न निघाल्यास ५ सप्टेबरपासून शासनाविरोधात काळ्याफिती लावून, ९ सप्टेंबरपासून लाक्षणीक संप, तर ११ सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत संप सुरु करणार असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना पुर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागु करावे, कंत्राटी धोरण बंद करुन सर्व विभागातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, केंद्राप्रमाणेच महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती व बालसंगोपन रजा मंजुर करावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे लादू नये, कृषी सहायकांना ग्रामीण स्तरावर मदतनीस देण्यात यावा, अनेक गावांचा पदभार कमी करण्यात यावा, यासारख्या अनेक मागण्या घेऊन राज्यात सर्व कर्मचाºयांना एकत्रित लढा उभारला जाणार आहे.यावेळी समन्वय समितीचे मार्गदर्शक उपाध्यक्ष गोपाल मेश्राम, जिल्हाध्यक्ष संतोष मडावी, विनोद किंदरले, तालुका सचिव संदिप बेदरकर, संदीप जाधव, सिध्दार्थ खोब्रागडे, लोमेश सार्वे, आशिष ईश्वरकर, सुरेश राऊत, आर. एन. ढवळे, एच. कावळे, आर. खोटेले, डी. भोतमांगे, एस. वाय. नंदेश्वर, जी. एस. बारई, प्राची सोलंगी, नवनित घोल्लर, राजेंद्र कानडे, जे. सी. धकाते, श्रध्दा बुरडे, आर. एस. राठोड आदी उपस्थित होते.कार्यकारिणी घोषितआतापर्यंत अनेकदा आंदोलने करुन देखील शासनाने दखल न घेतल्याने राज्यस्तरावर शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनसाठी एकाच छत्राखाली एल्गार समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या एकजुटीनेच आता शासनाला झुकविल्याशिवाय जुनी पेन्शन योजना लागु केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे गोपाल मेश्राम यांनी सांगितले.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन