शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दारू बंदीकरीता महिलांनी पुकारला एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:25 IST

दारूविक्रेत्यांवर बंदी आणली नाही. दारूविक्रेत्यांना पोलिसांचे भय नाही, असा आरोप तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील सरपंच, उपसरपंच व गावातील महिलांनी केला आहे. परिणामी या गावातील महिलांनीच आता दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे.

ठळक मुद्देगर्रा, बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील प्रकार : ग्रामपंचायतीचा पुढाकार, पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : मागील अनेक दिवसापासून गर्रा बघेडा,सुसूरडोह, आसलपाणी येथे दारू बंदी होती परंतु आता पोलिसाच्या आशीवार्दाने दारूविक्रेते सर्रास मोहफुलदारू विकत आहेत. दारू पकडल्या नंतरीही पुन्हा दारू जोमात विकतात. पोलिस ठाण्यात निवेदन दिल्यानंतरही दारूविक्रेत्यांवर बंदी आणली नाही. दारूविक्रेत्यांना पोलिसांचे भय नाही, असा आरोप तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील सरपंच, उपसरपंच व गावातील महिलांनी केला आहे. परिणामी या गावातील महिलांनीच आता दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे.गर्राबघेडा, सुसूरडोह (पुनर्रवसन) आसलपाणी, मोठागाव, कारली, झंडीटोला गाळकाभोंगा येथे सर्रास मूहफुल दारू विक्री सुरू असल्यामुळे नागरिक तसेच विध्यार्थी सुद्धा दारूच्या आहारी गेले आहेत. गावात अशांतता निर्माण होत आहे. अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहे.पोलिसांची कारवाई दिसत नसल्याने ही बाब गांभिर्याने घेऊन येथील सरपंच, उपसरपंच व महिला मंडळीनी गोबरवाही, तुमसर पोलिस स्टेशन तसेच आपकारी विभाग भंडारा येथे निवेदन दिला आहे परंतु गावात दारू बंदी न होता उलट पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर दारू विक्री जोमात सुरू आहे.महिला वर्ग दारू पकडून पोलिसांना बोलवतात परंतु दुसऱ्या दिवशी ‘जैसे थे’ दारू विकणे सुरूच असते विक्रत्यावर कोणताही असर होत नाही यांच्यावर कारवाही होतो की नाही पोलिसाबरोबर मिलीभगत तर नाही असे सवाल असून आरोप येथील महिलांचा आहे. पोलिसांचा भय दारूविक्रेत्यांना राहिलेला नाही. त्यामुळे पोलीस काय करणार? असे बोलून महिलांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतात. ही गावे जंगललगत असल्याने संपूर्ण दारू अड्डे गर्रा बघेडा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत आहेत. मौल्यवान वृक्षांची अवैध कटाई करून दारू अड्डे चालवितात यात वनविभागाचेही दुर्लक्ष आहे.कदाचीत दारुबंदीकरिता पोलिसांची साथ मिळाली नाही तर आंदोलन करण्याविषयी सरपंच बघेडा प्रतिमा अशोक ठाकूर, उपसरपंच गोपीचंद गायकवाड, सुसूरडोहच्या सरपंच संगीता धुर्वे, उपसरपंच रोहिदास मरसर्कोल्हे, आसलपाणीचे सरपंच मोहन गौपाले, उपसरपंच विद्या कोकुडे व समस्त महिलांकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने दारूबंदीचा विषय गांभिर्यानी घेण्याची गरज आहे

टॅग्स :Socialसामाजिक