शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दारू बंदीकरीता महिलांनी पुकारला एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:25 IST

दारूविक्रेत्यांवर बंदी आणली नाही. दारूविक्रेत्यांना पोलिसांचे भय नाही, असा आरोप तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील सरपंच, उपसरपंच व गावातील महिलांनी केला आहे. परिणामी या गावातील महिलांनीच आता दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे.

ठळक मुद्देगर्रा, बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील प्रकार : ग्रामपंचायतीचा पुढाकार, पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : मागील अनेक दिवसापासून गर्रा बघेडा,सुसूरडोह, आसलपाणी येथे दारू बंदी होती परंतु आता पोलिसाच्या आशीवार्दाने दारूविक्रेते सर्रास मोहफुलदारू विकत आहेत. दारू पकडल्या नंतरीही पुन्हा दारू जोमात विकतात. पोलिस ठाण्यात निवेदन दिल्यानंतरही दारूविक्रेत्यांवर बंदी आणली नाही. दारूविक्रेत्यांना पोलिसांचे भय नाही, असा आरोप तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील सरपंच, उपसरपंच व गावातील महिलांनी केला आहे. परिणामी या गावातील महिलांनीच आता दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे.गर्राबघेडा, सुसूरडोह (पुनर्रवसन) आसलपाणी, मोठागाव, कारली, झंडीटोला गाळकाभोंगा येथे सर्रास मूहफुल दारू विक्री सुरू असल्यामुळे नागरिक तसेच विध्यार्थी सुद्धा दारूच्या आहारी गेले आहेत. गावात अशांतता निर्माण होत आहे. अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहे.पोलिसांची कारवाई दिसत नसल्याने ही बाब गांभिर्याने घेऊन येथील सरपंच, उपसरपंच व महिला मंडळीनी गोबरवाही, तुमसर पोलिस स्टेशन तसेच आपकारी विभाग भंडारा येथे निवेदन दिला आहे परंतु गावात दारू बंदी न होता उलट पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर दारू विक्री जोमात सुरू आहे.महिला वर्ग दारू पकडून पोलिसांना बोलवतात परंतु दुसऱ्या दिवशी ‘जैसे थे’ दारू विकणे सुरूच असते विक्रत्यावर कोणताही असर होत नाही यांच्यावर कारवाही होतो की नाही पोलिसाबरोबर मिलीभगत तर नाही असे सवाल असून आरोप येथील महिलांचा आहे. पोलिसांचा भय दारूविक्रेत्यांना राहिलेला नाही. त्यामुळे पोलीस काय करणार? असे बोलून महिलांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतात. ही गावे जंगललगत असल्याने संपूर्ण दारू अड्डे गर्रा बघेडा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत आहेत. मौल्यवान वृक्षांची अवैध कटाई करून दारू अड्डे चालवितात यात वनविभागाचेही दुर्लक्ष आहे.कदाचीत दारुबंदीकरिता पोलिसांची साथ मिळाली नाही तर आंदोलन करण्याविषयी सरपंच बघेडा प्रतिमा अशोक ठाकूर, उपसरपंच गोपीचंद गायकवाड, सुसूरडोहच्या सरपंच संगीता धुर्वे, उपसरपंच रोहिदास मरसर्कोल्हे, आसलपाणीचे सरपंच मोहन गौपाले, उपसरपंच विद्या कोकुडे व समस्त महिलांकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने दारूबंदीचा विषय गांभिर्यानी घेण्याची गरज आहे

टॅग्स :Socialसामाजिक