शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

हत्तीरोग दुरीकरण मोहीम १ जुलैपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:23 IST

ही मोहीम १ जुलैपासून सुरू होत असून, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून गोळ्यांचे वाटप करण्यात ...

ही मोहीम १ जुलैपासून सुरू होत असून, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सदर गोळ्या या वयोगटानुसार वाटप करण्यात येतात तसेच सदर गोळ्या जेवनानंतरच खायच्या असतात.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या गोळ्यांचे सेवन हे कर्मचाऱ्यांच्या समक्षच खाण्यात यावे, जेणेकरून शासनाने ठरविल्याप्रमाणे १०० टक्के लोकांनी गोळ्यांचे सेवन केल्याची खात्री होईल. सदर गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. हत्तीरोग आजाराचे दुरीकरण या शासनाच्या मोहिमेमध्ये जनतेचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

२८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदिती त्याडी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आरोग्य विभागातर्फे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे, असे त्यांनी सांगितले. सदर डी.ई.सी. गोळीपासून कोणताही दुष्परिणाम जाणवत नाही. करिता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे व आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला १०० टक्के यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदिती त्याडी म्हणाल्या, एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही. परंतु हत्तीरोग होऊ नये म्हणून डी.ई.सी. गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा ‘हत्तीरोग’ दिनी अशी सलग पाच वर्षे खाल्ल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबते व पर्यायाने आपण स्वत: व आपली भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त राहू शकेल, असे त्यांनी सांगितले.

सामुदायिक औषधोपचार मोहिमेत ज्या रुग्णांनी डी.ई.सी व आयव्हरमेटीन गोळ्यांची मात्रा घेतली नाही त्यांनी पुढील दोन ते पाच दिवसांत गोळ्यांची मात्रा आरोग्य कर्मचारी किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपलब्ध करून सेवन करावी. डी.ई.सी व आयव्हरमेटीन गोळ्या उपाशी पोटी घेऊ नयेत. उपाशीपोटी गोळ्या घेतल्यास मळमळ, उलटीसारखा किरकोळ त्रास होऊ शकतो. म्हणून डी.ई.सी गोळ्या काहीतरी खाल्ल्यानंतरच घ्याव्यात. हत्तीरोग दुरीकरणासाठी दरवर्षी हत्तीरोग समस्याग्रस्त भागात एक दिवसीय डी.ई.सी व अलबेंडाझोलच्या गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवून हत्तीरोग दुरीकरण करण्याचा संकल्प आहे.