शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

विजेचा लपंडावाने नागरिक झाले त्रस्त

By admin | Updated: March 29, 2015 00:59 IST

मागील एक महिन्यापासून दररोज शहरी व ग्रामीण भागात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. या प्रकारामुळे महत्त्वाची कामे खोळंबत असून या फटका सर्वसामान्यांवर पडत आहे.

बाराभाटी : मागील एक महिन्यापासून दररोज शहरी व ग्रामीण भागात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. या प्रकारामुळे महत्त्वाची कामे खोळंबत असून या फटका सर्वसामान्यांवर पडत आहे.तालुक्याच्या मुख्य भागामध्ये विद्युत पुरवठा करणारे पॉवर हॉऊस (डी.सी.) बसविलेले आहे. अर्जुनी-मोरगाव व नवेगावबांध या ठिकाणांहून परिसरात वीज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र सततच्या विजेच्या लपंडावामागे काय कारण आहे, ते कळू शकले नाही. सहायक अभियंता तक्रार करणाऱ्या ग्राहकांना उलटसुलट उत्तर देवून त्यांना दबावात आणतात. या प्रकाराकडे वीज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नसून त्यांचे वचकसुद्धा नसल्याचे दिसत आहे.विजेच्या लपंडावामुळे परिसरातील विद्यार्थ्यांची आॅनलाईन कामे होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावत नाही. त्यांची महत्त्वाची कामे होत नाही, परिसर मागासलेलाच राहतो. परंतु श्रीमंतीचा दर्जा ठेवणारे नागरिक व राजकारणातील नेते लोकांच्या राईल मिल रात्रंदिवस सुरु असतात. सार्वजनिक ठिकाणचे समाजमंदिर, मनोरंजन केंद्र, मंदिरातील सार्वजनिक वीज खुलेआम रात्रंदिवस सुरू राहते. त्याचा भुर्दंडही सर्वसामान्य जनतेवर पडतो. विजेचा बिल मोठ्या प्रमाणात येवूनही नागरिकांना तो भरावाच लागतो. विजेचा लपंडाव बंद झाला नाही तर अभियंता, विद्युत कार्यालय, अर्जुनी-मोरगाव येथे मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या समस्येकडे विद्युत विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)