शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

तुमसर- तिरोडी रेल्वेमार्गावर विजेवरील गाड्या धावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:32 IST

विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर : प्रथम धावणार मालगाडी. मोहन भोयर तुमसर : ब्रिटिशकालीन तुमसर तिरोडी या ४३ किलोमीटर रेल्वे मार्गावर ...

विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर : प्रथम धावणार मालगाडी.

मोहन भोयर

तुमसर : ब्रिटिशकालीन तुमसर तिरोडी या ४३ किलोमीटर रेल्वे मार्गावर लवकरच विजेवरील गाड्या धावणार आहेत. सध्या या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. कोरोना संक्रमण काळातही येथे विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. तुमसर ते गोबरवाही पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. घनदाट जंगलातून हा रेल्वे मार्ग जातो. मध्यप्रदेशातील तिरोडीपर्यंत हा रेल्वे मार्ग जातो.

मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर विजेवर गाड्या धावतात. तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान डिझेल इंजिनवर माल गाड्या व प्रवासी गाड्या धावतात. तत्पूर्वी कोळशावर चालणाऱ्या गाड्या या मार्गावर धावत होत्या. ४३ किलोमीटरच्या हा रेल्वे ट्रॅक असून ब्रिटिशांनी हा रेल्वे मार्ग तयार केला होता. डोंगरी, चिखला व मध्यप्रदेशातील तिरोडी येथील मँगनीज खाणीतून मँगनीजच्या वाहतुकीकरिता हा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला होता. रेल्वे मंत्रालयाने तुमसर तिरोडी या रेल्वे ट्रॅकवर विजेवरील गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.

सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी:

तुमसर तिरोडी या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा आयुक्त यांचेकडून तपासणी होणार आहे. पथकाचे अहवालानंतर या रेल्वेची पहिली चाचणी घेण्यात येईल.

सुरक्षा आयुक्तांकडून मालवाहतूक व प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी मिळाल्यानंतर रेल्वे गाड्या या मार्गावर धावायला सुरुवात होईल. इलेक्ट्रिक विभागातील सुरक्षा पथकासह तज्ज्ञांचे पथक येथे सहभागी होणार आहेत. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपकेंद्र, वीजवाहिन्या, विद्युत खांब येथे उभारण्यात आले आहेत. वाहिन्यांमधून वीज प्रवाह सोडण्याची प्रथम येथे चाचणी होणार आहे.

पहिली मालगाडी धावणारी: तुमचा तिरोडी रेल्वेमार्गावर सर्वप्रथम पहिली मालगाडी धावणार आहे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर पहिली मालगाडी चालवण्यात येईल. त्यानंतर प्रवासी गाड्या येथे धावतील. मध्य प्रदेशाला जोडणारा हा एकमेव रेल्वे मार्ग असून तिरोडी कटंगी व जबलपूर रेल्वे मार्ग मध्य भारतात जाण्यासाठी कमी वेळेत जाणारा ठरणार आहे.