शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

निवडणुकीची घोषणा झाली अन् इच्छुकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

आरक्षण सोडतीनंतर झालेले बदल आणि उमेदवारी याचा ताळमेळ अद्यापही लागला नसताना निवडणूक घोषित झाल्याने अनेक इच्छुक संभ्रमात सापडले आहेत, तर दुसरीकडे युती-आघाडीचाही अद्याप पत्ता नाही. दुसरीकडे सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रशासकाच्या प्रदीर्घ १६ महिन्यांच्या कालावधीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होवू घातली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आरक्षण सोडतीनंतर काही अवधीनंतर निवडणुकीची घोषणा होईल, असे गृहित धरून असलेल्या सर्वच राजकीय पक्षांना शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने जोरदार झटका दिला. दुपारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि इच्छुकांचा जीव टांगणीला लागला. आरक्षण सोडतीनंतर झालेले बदल आणि उमेदवारी याचा ताळमेळ अद्यापही लागला नसताना निवडणूक घोषित झाल्याने अनेक इच्छुक संभ्रमात सापडले आहेत, तर दुसरीकडे युती-आघाडीचाही अद्याप पत्ता नाही. दुसरीकडे सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रशासकाच्या प्रदीर्घ १६ महिन्यांच्या कालावधीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होवू घातली आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असली तरी आरक्षण सोडत तीनवेळा काढण्यात आल्याने अनेकांचे गणित बिघडले आहे. १२ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीनंतर अनेक जण कामाला लागले होते. परंतु या आरक्षणावर आक्षेप घेतल्याने गुरुवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी नव्याने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. १९ गटांच्या आरक्षणात फेरबदल झाले. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. अशातच आणखी महिनाभराने निवडणुकीची घोषणा होईल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र शुक्रवारी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. निवडणुका घोषित झाल्याची माहिती वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली. सोशल मीडियावर निवडणूक आयोगाचा आदेश फिरू लागला. यामुळे इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढले. मतदारसंघात बांधणी केली असली तरी या आरक्षण सोडतीने अनेकांचे गणित बिघडले आहेत. त्यामुळे कोण कुठे उभे राहील, याबाबत संभ्रम आहे, तर काहींचे आरक्षण तेच कायम राहिल्याने ही मंडळी बिनधास्तपणे कामाला लागली आहे. परंतु यातही अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. वरिष्ठ पातळीवर युती-आघाडी झाली तर आपल्याला तिकीट मिळणार की नाही याची शंका आहे.  जिल्हा परिषदेतही निवडणूकपूर्व महाविकास आघाडी झाली तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढतील, तर भाजप स्वतंत्र लढेल. तीन पक्षांची आघाडी झाल्यास उमेदवारीसाठी मोठी कसरत होणार असून, अनेकांची समजूत काढताना नेत्यांची दमछाक होणार आहे. त्यातच बंडखोरीची शक्यताही राहणार आहे. एकंदरीत जिल्हा परिषद निवडणुकीने आता ग्रामीण राजकीय वातावरण तापणार आहे.

जिल्हा परिषद नाही, तर पंचायत समितीची तिकीट द्या- सर्वच पक्षांत निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जातीय समीकरण आणि प्रभावी उमेदवार पाहुन पक्ष नेतृत्व उमेदवारी देणार यात कुणालाही शंका नाही. मात्र अनेक जण तिकिटासाठी लॉबिंग करताना दिसत आहे. जिल्हा परिषदेची तिकीट मिळत नसेल तर पंचायत समितीची तरी तिकीट द्या, असे म्हणणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. मात्र आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकायची आहे. भंडारा जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या पक्षात निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची लांब यादी असून, आता कुणाला तिकीट मिळणार हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद