शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने आठ मुलांना विषबाधा

By admin | Updated: December 13, 2015 00:25 IST

खेळताना गावालगतच्या शिवारातील झाडाला लागलेले चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने आठ बालकांना विषबाधा झाल्याची घटना चांदमारा येथील शेतशिवारात शुक्रवारला सायंकाळी घडली.

चांदमारा येथील घटना : उपचारार्थ रुग्णालयात दाखलतुमसर : खेळताना गावालगतच्या शिवारातील झाडाला लागलेले चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने आठ बालकांना विषबाधा झाल्याची घटना चांदमारा येथील शेतशिवारात शुक्रवारला सायंकाळी घडली.दुर्गा चिंतामण झोळे (८), पायल संजय झोळे (९), यश उमाशंकर झोडे (५), किरण मदन देशमुख (८), रोहित भारतलाल झोळे (१०), मयुरी धनपाल देशमुख (५), प्रीती शोभाराम देशमुख (९), आचल रोशनलाल इनााते (४) असे विषबाधा झालेल्या बालकांची नावे आहेत. गावात घराशेजारी बच्चे कंपनी शेतशिवारात लागल्या वृक्षाचे फळ तोडण्यासाठी गेले. फळे तोडून झाल्यावर सर्वांनी तिथेच खाणे सुरु केले. त्यानंतर मयुरीला भोवळ आल्याने ती खाली पडली. त्यानंतर मुलांनी आरडाओरड करताच नागरिक धावून आले. त्यावेळी तीनचार मुले खाली पडून होते. त्यांना तुम्ही काही खाल्ले असे विचारताच त्यांनी ते फळ दाखविले. ते फळ चंद्रज्योतीच्या बिया असल्याचे निष्पन्न होताच गावकऱ्यांनी वेळ न घालवता गोबरवाही आरोग्य केंद्रात नेले. तेथील डॉक्टरांनी तुमसरला हलविण्याचा सल्ला दिला. या बालकांना सायंकाळी तुमसरात आणण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)